विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

  57

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहेत. त्यात ते तीन वनडे आणि पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहेत.या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही एकत्र खेळताना दिसणार आहे अशी माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेटने दिली आहे. या चार महिन्यांनंतर होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील सिडनी वनडेसाठी सर्व तिकिटे आधीच विकली गेली आहेत.


क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या निवेदनात म्हटले, “सिडनी क्रिकेट ग्राऊंड (एससीजी) येथील वनडे आणि मनुका ओव्हल (कॅनबरा) येथील टी-२० सामन्यांची तिकिटे सामन्यांना चार महिने बाकी असतानाच संपली आहेत, जे या सामन्यांच्या प्रचंड मागणीचे द्योतक आहे. तसेच, एमसीजी टी-२० आणि गाबा टी-२० सामनेही खूप लोकप्रिय होत आहेत.” क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुढे सांगितले की, “अॅशेस सामन्यांसाठी विक्रमी तिकिट विक्री झाल्यानंतर, आता व्हाइट-बॉल सामन्यांनाही प्रचंड मागणी आहे. तिकिट विक्री सुरू झाल्याच्या अवघ्या दोन आठवड्यांत आठ सामन्यांसाठी ९०,००० हून अधिक तिकिटं विकली गेली आहेत.”


त्यांनी पुढे सांगितले की, आतापर्यंत विकल्या गेलेल्या तिकिटांपैकी १६ टक्क्यांहून अधिक तिकिटं भारतीय चाहत्यांच्या क्लबांनी खरेदी केली आहेत. भारत आर्मी हा सर्वात सक्रिय चाहता क्लबांपैकी एक आहे, ज्याने २,४०० हून अधिक तिकिटं खरेदी केली आहेत. फॅन्स इंडिया या क्लबनेही जबरदस्त उत्साह दाखवत १,४०० हून अधिक तिकिटं खरेदी केली आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या मालिकेचे वातावरण आणखी खास केले. त्यांनी एका निवेदनात म्हटले की, हा ऑस्ट्रेलिया दौरा विराट कोहली आणि रोहित शर्माचा शेवटचा दौरा असू शकतो. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना सन्मानित करण्यासाठी ही मालिका खास बनवण्याचा प्रयत्न केला जाईल.


इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ८ नोव्हेंबरला ब्रिस्बेन येथे होईल. वनडे मालिकेत विराट आणि रोहित खेळताना दिसतील, कारण दोघांनीही कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. २०२१७ च्या वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका दोघांसाठीही महत्त्वाची आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेसाठी भारतीय चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल