पर्यटन योजनेतून एसटी बसमधून महाराष्ट्र फिरा

प्रवास, जेवण, निवास सर्व काही मिळणार माफक दरात


मुंबई : तुम्हालाही राज्यभर फिरायचे स्वप्न आहे पण खर्चाचा विचार करून मागे हटता? मग आता टेन्शन घेण्याचे काहीच कारण नाही! कारण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नागरिकांसाठी सुरू केली आहे एक खास पर्यटन योजना, जिच्यामध्ये प्रवास, जेवण आणि निवास सगळे काही अगदी माफक दरात मिळणार आहे.


या योजनेअंतर्गत एसटी महामंडळाने खासगी ट्रॅव्हल कंपन्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळांसाठी नियोजित सहलींचं आयोजन केलं आहे. विशेष म्हणजे या सहलींमध्ये फक्त प्रवास नव्हे, तर राहण्याची आणि जेवणाचीही सोय असणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त बॅग पॅक करा आणि निघा बाकी सगळे एसटी महामंडळ सांभाळेल! ही योजना सर्व वयोगटातील आणि सामाजिक गटांतील नागरिकांसाठी खुली आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण प्रवासी आणि विद्यार्थी सगळ्यांना या सहलीतून फायदे मिळणार आहेत. अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांनाही ही योजना सहज परवडेल. या सहली गर्दीच्या काळात आयोजित केल्या जाणार नाहीत. त्यामुळे मंदिरांमध्ये त्रासदायक रांगा नाहीत, नाहक गडबड नाही फक्त शांत, आरामदायक आणि भक्तीमय अनुभव अनुभवयास मिळणार.

एसटी पर्यटन योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये


धार्मिक स्थळांसाठी नियोजित सहली
प्रवास, भोजन आणि निवासाचा एकत्रित लाभ
सर्व वयोगटांसाठी परवडणारे दर
कमी गर्दीच्या दिवसांत सहलींचं आयोजन
विद्यार्थ्यांसाठी पासची सुविधा आता शाळेतच

Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर