पर्यटन योजनेतून एसटी बसमधून महाराष्ट्र फिरा

प्रवास, जेवण, निवास सर्व काही मिळणार माफक दरात


मुंबई : तुम्हालाही राज्यभर फिरायचे स्वप्न आहे पण खर्चाचा विचार करून मागे हटता? मग आता टेन्शन घेण्याचे काहीच कारण नाही! कारण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नागरिकांसाठी सुरू केली आहे एक खास पर्यटन योजना, जिच्यामध्ये प्रवास, जेवण आणि निवास सगळे काही अगदी माफक दरात मिळणार आहे.


या योजनेअंतर्गत एसटी महामंडळाने खासगी ट्रॅव्हल कंपन्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळांसाठी नियोजित सहलींचं आयोजन केलं आहे. विशेष म्हणजे या सहलींमध्ये फक्त प्रवास नव्हे, तर राहण्याची आणि जेवणाचीही सोय असणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त बॅग पॅक करा आणि निघा बाकी सगळे एसटी महामंडळ सांभाळेल! ही योजना सर्व वयोगटातील आणि सामाजिक गटांतील नागरिकांसाठी खुली आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण प्रवासी आणि विद्यार्थी सगळ्यांना या सहलीतून फायदे मिळणार आहेत. अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांनाही ही योजना सहज परवडेल. या सहली गर्दीच्या काळात आयोजित केल्या जाणार नाहीत. त्यामुळे मंदिरांमध्ये त्रासदायक रांगा नाहीत, नाहक गडबड नाही फक्त शांत, आरामदायक आणि भक्तीमय अनुभव अनुभवयास मिळणार.

एसटी पर्यटन योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये


धार्मिक स्थळांसाठी नियोजित सहली
प्रवास, भोजन आणि निवासाचा एकत्रित लाभ
सर्व वयोगटांसाठी परवडणारे दर
कमी गर्दीच्या दिवसांत सहलींचं आयोजन
विद्यार्थ्यांसाठी पासची सुविधा आता शाळेतच

Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत