पर्यटन योजनेतून एसटी बसमधून महाराष्ट्र फिरा

प्रवास, जेवण, निवास सर्व काही मिळणार माफक दरात


मुंबई : तुम्हालाही राज्यभर फिरायचे स्वप्न आहे पण खर्चाचा विचार करून मागे हटता? मग आता टेन्शन घेण्याचे काहीच कारण नाही! कारण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नागरिकांसाठी सुरू केली आहे एक खास पर्यटन योजना, जिच्यामध्ये प्रवास, जेवण आणि निवास सगळे काही अगदी माफक दरात मिळणार आहे.


या योजनेअंतर्गत एसटी महामंडळाने खासगी ट्रॅव्हल कंपन्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळांसाठी नियोजित सहलींचं आयोजन केलं आहे. विशेष म्हणजे या सहलींमध्ये फक्त प्रवास नव्हे, तर राहण्याची आणि जेवणाचीही सोय असणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त बॅग पॅक करा आणि निघा बाकी सगळे एसटी महामंडळ सांभाळेल! ही योजना सर्व वयोगटातील आणि सामाजिक गटांतील नागरिकांसाठी खुली आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण प्रवासी आणि विद्यार्थी सगळ्यांना या सहलीतून फायदे मिळणार आहेत. अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांनाही ही योजना सहज परवडेल. या सहली गर्दीच्या काळात आयोजित केल्या जाणार नाहीत. त्यामुळे मंदिरांमध्ये त्रासदायक रांगा नाहीत, नाहक गडबड नाही फक्त शांत, आरामदायक आणि भक्तीमय अनुभव अनुभवयास मिळणार.

एसटी पर्यटन योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये


धार्मिक स्थळांसाठी नियोजित सहली
प्रवास, भोजन आणि निवासाचा एकत्रित लाभ
सर्व वयोगटांसाठी परवडणारे दर
कमी गर्दीच्या दिवसांत सहलींचं आयोजन
विद्यार्थ्यांसाठी पासची सुविधा आता शाळेतच

Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा