पर्यटन योजनेतून एसटी बसमधून महाराष्ट्र फिरा

  54

प्रवास, जेवण, निवास सर्व काही मिळणार माफक दरात


मुंबई : तुम्हालाही राज्यभर फिरायचे स्वप्न आहे पण खर्चाचा विचार करून मागे हटता? मग आता टेन्शन घेण्याचे काहीच कारण नाही! कारण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नागरिकांसाठी सुरू केली आहे एक खास पर्यटन योजना, जिच्यामध्ये प्रवास, जेवण आणि निवास सगळे काही अगदी माफक दरात मिळणार आहे.


या योजनेअंतर्गत एसटी महामंडळाने खासगी ट्रॅव्हल कंपन्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळांसाठी नियोजित सहलींचं आयोजन केलं आहे. विशेष म्हणजे या सहलींमध्ये फक्त प्रवास नव्हे, तर राहण्याची आणि जेवणाचीही सोय असणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त बॅग पॅक करा आणि निघा बाकी सगळे एसटी महामंडळ सांभाळेल! ही योजना सर्व वयोगटातील आणि सामाजिक गटांतील नागरिकांसाठी खुली आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण प्रवासी आणि विद्यार्थी सगळ्यांना या सहलीतून फायदे मिळणार आहेत. अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांनाही ही योजना सहज परवडेल. या सहली गर्दीच्या काळात आयोजित केल्या जाणार नाहीत. त्यामुळे मंदिरांमध्ये त्रासदायक रांगा नाहीत, नाहक गडबड नाही फक्त शांत, आरामदायक आणि भक्तीमय अनुभव अनुभवयास मिळणार.

एसटी पर्यटन योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये


धार्मिक स्थळांसाठी नियोजित सहली
प्रवास, भोजन आणि निवासाचा एकत्रित लाभ
सर्व वयोगटांसाठी परवडणारे दर
कमी गर्दीच्या दिवसांत सहलींचं आयोजन
विद्यार्थ्यांसाठी पासची सुविधा आता शाळेतच

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही