लालबाग पुलावरील गळती आता कायमचीच थांबली

खराब पर्जन्य जलवाहिन्या मनपाच्या वतीने बदलण्यात आल्या


मुंबई: लालबाग उड्डाणपूलावर मागील काही दिवसांपासून पावसाचे पाणी साचून राहण्याचे प्रकार घडत असल्याने तसेच पादचाऱ्यांसह गणेश भक्तांच्या अंगावर पुलावरील पाणी पडण्याचा प्रकार घडत असल्याने लालबागकर त्रस्त होते. अखेर ही समस्या आता दूर झाली असून लालबाग पुलावरील खराब झालेल्या पर्जन्य जलवाहिनी बदलण्यात आल्याने गणेश भक्तांसह इतर पादचाऱ्यांवर होणाऱ्या पाण्याचा अभिषेक आता थांबला जाणार आहे.


माटुंगा येथील नानालाल मेहता उड्डाणपुलावरील रस्त्यामधील भाग खराब झाला असून या भागाचे पृष्ठीकरण करण्याचीही मागणी होत आहे. याशिवाय लालबाग उड्डाणपुलावर पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याबाबतही निष्कर्ष समोर आला होता. यामध्ये या पुलावरील पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्या बहुतेक ठिकाणी खराब झाल्या होत्या.


त्यामुळे पावसाळ्यामध्ये त्यामधून होणाऱ्या पाणी गळतीमुळे खालून जाणाऱ्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांवर तसेच गणेशोत्सवादरम्यान जमणाऱ्या भाविकांच्या अंगावर साचलेले पाणी पडले जात होते. परिणामी पुलाखालून जाणाऱ्या वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो तसेच बऱ्याच वेळा पुलावर पाणी साचले जात होते.


त्यामुळे लालबाग पुलावरील खराब झालेल्या पर्जन्य जलवाहिनी आणि इतर पुलांवरील रस्त्यांचे बांधकाम आदींचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे.


यासाठी सुमारे पावणेपाच कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. याबाबत पुल विभागाचे प्रमुख अभियंता उत्तम श्रोते यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांनी सांगितले की, या खराब पर्जन्य जलवाहिनी आता बदलण्यात आल्या असून यामुळे पुलावर पाणी साचणार नाही आणि खाली लोकांच्याही अंगावर पडणार नाही असे त्यांनी
स्पष्ट केले.

Comments
Add Comment

मुंबईकरांनी दिवाळीत फटाक्यांसह केला कचरा, महापालिकेने तब्बल ३,००० टन जमा केला..

मुंबई (खास प्रतिनिधी): दीपावलीच्या पूर्वी करण्यात आलेली साफसफाई आणि या सणाच्या काळात भेटवस्तू तसेच फटाक्यांचा

हवामान खात्याचा महाराष्ट्राला आज आणि उद्यासाठी पावसाचा इशारा

मुंबई : यंदा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अती पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी उभी पिकं वाहून गेली. केंद्र

आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करी करणाऱ्या मोहम्मद सलीम शेखला दुबईतून अटक, मुंबई पोलीस क्राइम ब्रॅंचची मोठी कामगिरी!

मुंबई: मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करी करणाऱ्या एका मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश

मध्य रेल्वेचा ९ दिवस मेगाब्लॉक! 'या' स्थानकांदरम्यान वाहतूक राहणार बंद, लांबपल्ल्याच्या लोकल ट्रेनला फटका

मुंबई: कर्जत स्थानकाच्या पुनर्रचना कामासाठी मध्य रेल्वेने ९ दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. हा मेगाब्लॉक २४

छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढा यांच्यासह भाजप नेते घेणार तयारीचा आढावा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय लोक राहतात. त्यामुळे येत्या २७ आणि २८ ऑक्टोबरला

वरळी कोळीवाड्याची किनारपट्टी होणार चकाचक, दिवसाला किती खर्च होतो माहीत आहे का?

मुंबई (खास प्रतिनिधी) : वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखण्याकरता यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या