घोडबंदर रोड सिग्लनजवळ वेग नियंत्रक पट्ट्या प्रायोगिक तत्वावर लावा

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश


ठाणे  : घोडबंदर रोडवरील पाच वाहतूक सिग्नलपाशी प्रायोगिक तत्त्वावर रम्बलर (वेग नियंत्रक पट्ट्या) लावण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास घोडबंदर रोडवरील सर्वच सिग्नलपाशी त्यांची अमलबजावणी करण्यात येणार आहे.


अपघात टाळण्यासाठी सिग्नलपाशी वाहनांचा वेग कमी करून अवजड वाहने नियंत्रित करण्याची आवश्यकता असल्याचे मत जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी बैठकीत मांडले. या सूचनेचा अवलंब करण्यासाठी महापालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलीस यांनी संयुक्तपणे पाच ठिकाणांची निवड करावी.


तेथे प्रायोगिक तत्त्वावर ही व्यवस्था करावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. हा प्रयोग करताना वाहन चालकांना दिसेल अशा पद्धतीने त्याचा इशारा देणारी पाटी, रिफ्लेक्टर्स आदी गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीने कराव्यात. इंडियन रोड कॉंग्रेसने निर्धारित केलेल्या सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन करावे, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.


घोडबंदर रस्ता आणि परिसरातील नागरी कामांविषयी चर्चा करण्यासाठी जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचे आयोजन महापालिका आयुक्त कार्यालय येथे नुकतेच करण्यात आले होते. आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वाघबीळ येथील अंतर्गत रस्ता, भाईंदरपाडा आणि साईनगर येथील सेवा रस्त्याची दुरावस्था, रोझा गार्डिनिया येथील प्रस्तावित वाहतूक बेट आदी विषय प्रतिनिधींनी मांडले. त्यावर, कालबद्ध कार्यक्रम घेऊन पूर्तता करण्याचे निर्देश आयुक्त राव यांनी संबंधित विभागांना दिले.


तसेच, रस्त्यावरील राडा रोडा, वायरी, अनावश्यक बॅरिकेड्स आदी काढून टाकरण्यासाठी महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो आणि एमएमआरडीए यांनी संयुक्तपणे सर्वंकष स्वच्छता मोहीम (डीप क्लिन ड्राईव्ह) घ्यावी,असेही आयुक्त राव यांनी सांगितले.


गायमुख आणि परिसरातील कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बहुपर्यायी उपाययोजना करण्याची आवश्यकता प्रतिनिधींनी व्यक्त केली. तसेच, काही मोठ्या गृहसंकुलांनी छोटेखानी कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याची तयारी दर्शवल्याचेही या प्रतिनिधींनी सांगितले. घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी व्यापक लोकसहभागाची आवश्यकता असून त्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे, असे आयुक्त राव यांनी यावेळी स्पष्ट केले.


तसेच, ज्या गृहसंकुलांनी घनकचरा व्यवस्थापनात रस दाखवला आहे, त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा थांब्यांचे वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि महापालिका यांच्यामार्फत संयुक्त पाहणी करण्याचे या बैठकीत ठरले. रिक्षा थांब्यांच्या जागा निश्चित करून त्यांचे नियमन करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी सांगितले.

Comments
Add Comment

सात वर्षांच्या बांधकामांनंतर खड्डेमय ‘पलावा’चे उद्घाटन

७२ कोटींच्या खर्चानंतरही उड्डाणपुलाला ‘निसरडा भागा’ची उपमा मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील कल्याण-शीळ

कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरांचा धुमाकूळ

कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांची नोंद झाली आहे, ज्यात दोन प्रवाशांकडून एकूण

ठाणे जिल्हा परिषदेची 'डोअरस्टेप डिलिव्हरी' योजना आहे तरी काय?

ठाणे: ठाणे जिल्हा परिषदेने 'डोअरस्टेप डिलिव्हरी' (Doorstep Delivery) नावाची नवीन योजना सुरू केली आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील

Navratri 2025 : नवरात्री मंडपामुळे ठाण्यात 'या' भागात वाहतूक कोंडी

ठाणे: नवरात्री सणाच्या तयारीमुळे ठाण्यातील टेंभीनाका चौकात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते. आजपासून येथे

कल्याणमधील रामदेव हॉटेलचा हलगर्जीपणा, फ्राईड राईसमध्ये आढळले झुरळ!

कल्याण: कल्याणमधील रामदेव या नामांकित शाकाहारी हॉटेलसंबंधित एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हॉटेलच्या

पतीकडून पत्नीची हत्या, शरीराचे केले १७ तुकडे

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एका नराधम पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे १७ तुकडे