इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test

लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लंडने मालिकेत १ - ० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना २ जुलै रोजी बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे सुरू होणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने संघ जाहीर केला आहे. या संघात ३० वर्षीय वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची निवड झाली आहे. आर्चर शेवटची कसोटी फेब्रुवारी २०२१ मध्ये खेळला होता. आतापर्यंत १३ कसोटी सामने खेळलेला आर्चर २ जुलैपासून १४ वी कसोटी खेळणार आहे.

पाठीच्या कण्याच्या दुखापतीमुळे दीर्घ काळ आर्चर क्रिकेटपासून दूर होता. २०२१ ते २०२४ या काळात तो मैदानाबाहर होता. पुनरागमन केल्यानंतर आधी एकदिवसीय क्रिकेट खेळलेला आर्चर आता कसोटी क्रिकेटमध्येही पुनरागमन करत आहे. आर्चरचा समावेश वगळता इंग्लंडच्या उर्वरित संघात कोणताही बदल नाही. पहिली कसोटी खेळलेले खेळाडूच दुसऱ्या कसोटीतही खेळणार आहेत.

दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, झॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स.

इंग्लंड विरुद्ध भारत पाच कसोटी सामन्यांची मालिका २०२५

पहिली कसोटी, हेडिंग्ले, लीड्स - इंग्लंड पाच गडी राखून विजयी
दुसरी कसोटी, एजबॅस्टन, बर्मिंगहॅम - २ ते ६ जुलै
तिसरी कसोटी, लॉर्ड्स, लंडन - १० ते १४ जुलै
चौथी कसोटी, एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर - २३ ते २७ जुलै
पाचवी कसोटी, केनिंग्टन ओव्हल, लंडन - ३१ जुलै ते ४ ऑगस्ट
Comments
Add Comment

हर्षित राणाची जागा जाणार? टीम इंडियात आणखी एका खेळाडूचे पुनरागमन !

मुंबई : टीम इंडियामध्ये आणखी एक वरिष्ठ खेळाडू संघात परतण्याच्या तयारीत असून, त्याच्या पुनरागमनामुळे मुख्य

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची प्रकृती सुधारतेय: भारतात कधी परतणार?

ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा एकदा दुखापतीच्या संकटात सापडला आहे. नुकताच

भारत - ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना २९ ऑक्टोबरला, पहा टीम इंडियाची संभाव्य Playing XI

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला. ही मालिका ऑस्ट्रेलियाने २-१

बाईपण भारी देवा ! ७ महिन्यांची गरोदर तरीही १४५ किलो वजन उचलत जिंकली वेटलिफ्टिंग स्पर्धा

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नसत फक्त जिद्द असायला हवी . दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे सिद्ध

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही