ना. भुजबळांच्या आदेशाला ठेकेदारांची ‘मातीची टोपली’

पिंपळस - येवला रस्त्यावरील खड्ड्यांत माती; अपघातांचा वाढला धोका


निफाड : पिंपळस ते येवला रस्त्यावर सध्या काँक्रीटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या कामाची पाहणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. त्यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदारांना आदेश दिले होते की, वाहतुकीसाठी खुल्या ठेवलेल्या मार्गावर असलेले खड्डे तात्पुरते का होईना पण बुजवण्यात यावेत, जेणेकरून प्रवाशांना आणि वाहनचालकांना त्रास होणार नाही. मात्र, ठेकेदारांनी या आदेशाची अंमलबजावणी करताना हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे.


खड्डे बुजवण्यासाठी आवश्यक असलेल्या डांबर-खडी किंवा योग्य रस्ते साहित्याचा वापर न करता सरळ माती टाकून खड्डे बुजवले गेले आहेत. परिणामी, पावसाळ्यात ही माती निसटून चिखलात रूपांतरित होत आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना मोठ्या अपघाताचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी वाहन घसरून पडल्याच्या घटना घडल्या असून काही ठिकाणी नागरिक किरकोळ जखमीही झाले आहेत. चिखल साचल्यामुळे रस्त्यांवरून चालणे देखील कठीण झाले आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या वेळी शालेय विद्यार्थ्यांसह नोकरीनिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. धूळ आणि माती उडाल्याने अनेकांना डोळ्यांमध्ये आग होणे, खवखव, आणि इतर आरोग्यविषयक तक्रारी निर्माण होत आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलांना विशेषतः या असुरक्षित रस्त्यांमुळे धोका निर्माण झाला आहे.


स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायतीपासून ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या, परंतु अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. ठेकेदारांचे मनमानी व प्रशासनाची उदासीनता यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर ठेकेदारांवर योग्य कारवाई करून, खड्डे योग्य साहित्य वापरून बुजवण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. पावसाळा सुरु झालेला असताना, तातडीने योग्य रस्ते डागडुजी न केल्यास भविष्यात मोठ्या अपघातांचे संकट उभे राहू शकते. प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी याची गंभीर दखल घेऊन त्वरित उपाययोजना करावी, हीच जनतेची अपेक्षा आहे.




मंत्री महोदयांनी पाहणी केल्यानंतर काहीसा दिलासा वाटला होता. मात्र कामाच्या दर्जाबाबत आणि तात्पुरत्या उपायांबाबत अजूनही गंभीर दुर्लक्ष होत आहे. माती टाकून खड्डे बुजवले जाणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे.
- संजय पाटोळे, सामाजिक कार्यकर्ते


Comments
Add Comment

Shet Panand Raste Yojana : शेतकऱ्यांनो नियम पाळा, नाहीतर...आधार ब्लॉक होणार, ५ वर्षे सरकारी योजना बंद; शेतरस्ता योजनेची नवीन नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बळीराजाला बळ देण्यासाठी राज्य सरकारने 'मुख्यमंत्री

धक्कादायक! हॉस्पिटलच्या टीमनेच केला नवजात बाळाचा ३ महिन्यापेक्षा अधिक सांभाळ

सांगली : सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हॉस्पिटलमध्ये २६ नोव्हेंबर २०२५

Dr. Jaysingrao Pawar : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

- मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली मुंबई : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव

जालन्यात इंधन वितरणावर निर्बंध; पोलीस बंदोबस्तात पेट्रोल-डिझेल वाटप

जालना: जालना शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. साठा कमी पडत असल्यामुळे शहरातील

रामनवमीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते बंद राहतील

पुणे: देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या उत्सहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. प्रभू श्रीरामचंद्र

Ashok Kharat: व्हायरल व्हिडीओने खळबळ, अशोक खरात एचआयव्ही पॉझिटिव्ह?

मुंबई: महिलांवरील अत्याचार आणि फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाब अशोक खरात प्रकरणी दररोज नवे धक्कादायक