ना. भुजबळांच्या आदेशाला ठेकेदारांची ‘मातीची टोपली’

पिंपळस - येवला रस्त्यावरील खड्ड्यांत माती; अपघातांचा वाढला धोका


निफाड : पिंपळस ते येवला रस्त्यावर सध्या काँक्रीटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या कामाची पाहणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. त्यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदारांना आदेश दिले होते की, वाहतुकीसाठी खुल्या ठेवलेल्या मार्गावर असलेले खड्डे तात्पुरते का होईना पण बुजवण्यात यावेत, जेणेकरून प्रवाशांना आणि वाहनचालकांना त्रास होणार नाही. मात्र, ठेकेदारांनी या आदेशाची अंमलबजावणी करताना हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे.


खड्डे बुजवण्यासाठी आवश्यक असलेल्या डांबर-खडी किंवा योग्य रस्ते साहित्याचा वापर न करता सरळ माती टाकून खड्डे बुजवले गेले आहेत. परिणामी, पावसाळ्यात ही माती निसटून चिखलात रूपांतरित होत आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना मोठ्या अपघाताचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी वाहन घसरून पडल्याच्या घटना घडल्या असून काही ठिकाणी नागरिक किरकोळ जखमीही झाले आहेत. चिखल साचल्यामुळे रस्त्यांवरून चालणे देखील कठीण झाले आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या वेळी शालेय विद्यार्थ्यांसह नोकरीनिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. धूळ आणि माती उडाल्याने अनेकांना डोळ्यांमध्ये आग होणे, खवखव, आणि इतर आरोग्यविषयक तक्रारी निर्माण होत आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलांना विशेषतः या असुरक्षित रस्त्यांमुळे धोका निर्माण झाला आहे.


स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायतीपासून ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या, परंतु अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. ठेकेदारांचे मनमानी व प्रशासनाची उदासीनता यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर ठेकेदारांवर योग्य कारवाई करून, खड्डे योग्य साहित्य वापरून बुजवण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. पावसाळा सुरु झालेला असताना, तातडीने योग्य रस्ते डागडुजी न केल्यास भविष्यात मोठ्या अपघातांचे संकट उभे राहू शकते. प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी याची गंभीर दखल घेऊन त्वरित उपाययोजना करावी, हीच जनतेची अपेक्षा आहे.




मंत्री महोदयांनी पाहणी केल्यानंतर काहीसा दिलासा वाटला होता. मात्र कामाच्या दर्जाबाबत आणि तात्पुरत्या उपायांबाबत अजूनही गंभीर दुर्लक्ष होत आहे. माती टाकून खड्डे बुजवले जाणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे.
- संजय पाटोळे, सामाजिक कार्यकर्ते


Comments
Add Comment

अमरावती जिल्ह्यात नक्की चाललंय तरी काय? अखेरच्या क्षणी भाजपची मोठी खेळी

अमरावती : राज्यात काही दिवसांपूर्वीच महापालिकांच्या निवडणुकांचा गुलाल हा उधळला गेला. सत्ताधारी आणि विरोधक

Nashik Mayor : ठरलं तर मग! नाशिकमध्ये महापौर भाजपचा होणार, तर उपमहापौर...?

नाशिक : नाशिकच्या राजकारणात आज एक मोठी आणि ऐतिहासिक घडामोड पाहायला मिळाली. नाशिक महानगरपालिकेच्या

मुलतानी बेकरीच्या मालकाने उचलेले टोकाचे पाऊल; सोलापुरात खळबळ

सोलापूर: सोलापुरात एकेकाळी अत्यंत प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीचे मालक सुनील मोतीलाल सदारंगानी यांनी

Mumbai Pune Expressway: तिसऱ्या दिवशीही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे जैसे थे..; प्रवाशी हतबल

मुंबई: आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी पहाटेपासूनच मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी झाल्याने

HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी; HSRP नंबर प्लेट बसवली नाही तर...

वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही जर अजूनही तुमच्या गाडीला नवीन नंबरप्लेट बसवून घेतली नसेल तर तुमचे

Jalna Black Magic News: जालन्यात एका हॉटेलसमोर लिंबू आणि बाहुल्या आढळल्या, काळ्या जादूने गावात खळबळ

जालना: जालना जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोकरदन तालुक्यामध्ये एका अज्ञात महिलेने हॉटेलसमोर