ना. भुजबळांच्या आदेशाला ठेकेदारांची ‘मातीची टोपली’

पिंपळस - येवला रस्त्यावरील खड्ड्यांत माती; अपघातांचा वाढला धोका


निफाड : पिंपळस ते येवला रस्त्यावर सध्या काँक्रीटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या कामाची पाहणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. त्यावेळी त्यांनी संबंधित ठेकेदारांना आदेश दिले होते की, वाहतुकीसाठी खुल्या ठेवलेल्या मार्गावर असलेले खड्डे तात्पुरते का होईना पण बुजवण्यात यावेत, जेणेकरून प्रवाशांना आणि वाहनचालकांना त्रास होणार नाही. मात्र, ठेकेदारांनी या आदेशाची अंमलबजावणी करताना हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे.


खड्डे बुजवण्यासाठी आवश्यक असलेल्या डांबर-खडी किंवा योग्य रस्ते साहित्याचा वापर न करता सरळ माती टाकून खड्डे बुजवले गेले आहेत. परिणामी, पावसाळ्यात ही माती निसटून चिखलात रूपांतरित होत आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना मोठ्या अपघाताचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी वाहन घसरून पडल्याच्या घटना घडल्या असून काही ठिकाणी नागरिक किरकोळ जखमीही झाले आहेत. चिखल साचल्यामुळे रस्त्यांवरून चालणे देखील कठीण झाले आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या वेळी शालेय विद्यार्थ्यांसह नोकरीनिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. धूळ आणि माती उडाल्याने अनेकांना डोळ्यांमध्ये आग होणे, खवखव, आणि इतर आरोग्यविषयक तक्रारी निर्माण होत आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलांना विशेषतः या असुरक्षित रस्त्यांमुळे धोका निर्माण झाला आहे.


स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायतीपासून ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या, परंतु अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. ठेकेदारांचे मनमानी व प्रशासनाची उदासीनता यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.या पार्श्वभूमीवर ठेकेदारांवर योग्य कारवाई करून, खड्डे योग्य साहित्य वापरून बुजवण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. पावसाळा सुरु झालेला असताना, तातडीने योग्य रस्ते डागडुजी न केल्यास भविष्यात मोठ्या अपघातांचे संकट उभे राहू शकते. प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी याची गंभीर दखल घेऊन त्वरित उपाययोजना करावी, हीच जनतेची अपेक्षा आहे.




मंत्री महोदयांनी पाहणी केल्यानंतर काहीसा दिलासा वाटला होता. मात्र कामाच्या दर्जाबाबत आणि तात्पुरत्या उपायांबाबत अजूनही गंभीर दुर्लक्ष होत आहे. माती टाकून खड्डे बुजवले जाणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे.
- संजय पाटोळे, सामाजिक कार्यकर्ते


Comments
Add Comment

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत

Ladki Bahin Yojna : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या ४० लाख महिला अपात्रतेच्या उंबरठ्यावर?

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक