अंधेरीतील आंबोली स्मशानभूमीच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा

मागील सहा महिन्यांपासून पारंपरिक दाहिनीची सेवा आहे बंद


मुंबई : अंधेरी पश्चिम येथील आंबोली स्मशानभूमी मागील डिसेंबर २०२४ पासून तात्पुरत्या स्वरुपात बंद असून येथील नागरिकांना वर्सोवा आणि ओशिवरा हिंदू स्मशानभूमीत पारंपारिक दाहिनीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जावे लागत आहे. अखेर या स्मशानभूमीच्या पारंपारिक दाहिनीच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार असल्याने येथील नागरिकांना अत्यंविधीकरता होणारा त्रास कमी होणार आहे.


अंधेरी पश्चिम येथील सिजर मार्गावरील आंबोली हिंदू स्मशानभुमीचे बांधकाम जुने झाल्याने संरचनात्मक सल्लागार बी. जे. मेहता आर्किटक्चरल आणि स्क्ट्रक्चरल कन्सलटंट यांच्या लेखा परिक्षक अहवालाच्या अनुषंगाने या स्मशानभूमीच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार डिसेंबर २०२४पासून दुरुस्तीच्या कामांसाठी आंबोली हिंदू स्मशानभूमीतील पारंपरिक दहनकक्षाची सेवा रविवारी १ डिसेंबर २०२४ पासून बंद ठेवण्यात आली होती.


दुरूस्तीची ही कामे पूर्ण झाल्यानंतर हे दहन कक्ष पुन्हा उपलब्ध करून देण्यात येईल असे प्रशासनाच्यावतीने कळण्यात आले होते. त्यामुळे येथील स्थानिकांना वेसावे (वर्सोवा) हिंदू स्मशानभूमी आणि ओशिवरा हिंदू स्मशानभूमीत पारंपरिक दाहिनीवर अंत्यसंस्कार करावे लागत आहे.


मात्र, मागील सहा ते सात महिन्यांपासून दुरुस्तीच्या कामांला सुरुवात न झाल्याने काही विकासकासाठी महापालिका येथील पारंपारिक दाहिनीची सेवा बंद करत असल्याचे आरोप स्थानिकांकडून होत होते. परंतु आता खऱ्या अर्थाने या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली जाणार असून सुमारे ३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.


या कामासाठी पालिकेच्यावतीने शाह इन्फ्रा डेव्हलपमेंट्स या कंपनीची निवड केली आहे. त्यानुसारच लवकरच येथील कामाला सुरुवात होणे अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अंबोली स्मशानभूमीत पारंपारिक दाहिनीची सेवा बंद ठेवण्यात आली असली तरी नैसर्गिक वायू दाहिनी पद्धतीची अंत्यविधी सेवा कार्यरत असल्याने नागरिकांनाच याठिकाणी अंत्यविधी करता येत आहे.

Comments
Add Comment

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील