अंधेरीतील आंबोली स्मशानभूमीच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा

मागील सहा महिन्यांपासून पारंपरिक दाहिनीची सेवा आहे बंद


मुंबई : अंधेरी पश्चिम येथील आंबोली स्मशानभूमी मागील डिसेंबर २०२४ पासून तात्पुरत्या स्वरुपात बंद असून येथील नागरिकांना वर्सोवा आणि ओशिवरा हिंदू स्मशानभूमीत पारंपारिक दाहिनीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जावे लागत आहे. अखेर या स्मशानभूमीच्या पारंपारिक दाहिनीच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार असल्याने येथील नागरिकांना अत्यंविधीकरता होणारा त्रास कमी होणार आहे.


अंधेरी पश्चिम येथील सिजर मार्गावरील आंबोली हिंदू स्मशानभुमीचे बांधकाम जुने झाल्याने संरचनात्मक सल्लागार बी. जे. मेहता आर्किटक्चरल आणि स्क्ट्रक्चरल कन्सलटंट यांच्या लेखा परिक्षक अहवालाच्या अनुषंगाने या स्मशानभूमीच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार डिसेंबर २०२४पासून दुरुस्तीच्या कामांसाठी आंबोली हिंदू स्मशानभूमीतील पारंपरिक दहनकक्षाची सेवा रविवारी १ डिसेंबर २०२४ पासून बंद ठेवण्यात आली होती.


दुरूस्तीची ही कामे पूर्ण झाल्यानंतर हे दहन कक्ष पुन्हा उपलब्ध करून देण्यात येईल असे प्रशासनाच्यावतीने कळण्यात आले होते. त्यामुळे येथील स्थानिकांना वेसावे (वर्सोवा) हिंदू स्मशानभूमी आणि ओशिवरा हिंदू स्मशानभूमीत पारंपरिक दाहिनीवर अंत्यसंस्कार करावे लागत आहे.


मात्र, मागील सहा ते सात महिन्यांपासून दुरुस्तीच्या कामांला सुरुवात न झाल्याने काही विकासकासाठी महापालिका येथील पारंपारिक दाहिनीची सेवा बंद करत असल्याचे आरोप स्थानिकांकडून होत होते. परंतु आता खऱ्या अर्थाने या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली जाणार असून सुमारे ३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.


या कामासाठी पालिकेच्यावतीने शाह इन्फ्रा डेव्हलपमेंट्स या कंपनीची निवड केली आहे. त्यानुसारच लवकरच येथील कामाला सुरुवात होणे अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अंबोली स्मशानभूमीत पारंपारिक दाहिनीची सेवा बंद ठेवण्यात आली असली तरी नैसर्गिक वायू दाहिनी पद्धतीची अंत्यविधी सेवा कार्यरत असल्याने नागरिकांनाच याठिकाणी अंत्यविधी करता येत आहे.

Comments
Add Comment

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला

महाराष्ट्रात मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार कारवाई - शिक्षण मंत्री दादाजी भुसे

सर्व माध्यमे, सर्व भाषिक आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी बंधनकारक मुंबई : "महाराष्ट्रातील सर्व

बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र कोकणात करा; आमदार प्रवीण दरेकरांची सरकारकडे मागणी

मुंबई : हिंगोली येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या धर्तीवर कोकणातही या केंद्राचे उपकेंद्र स्थापन