रिक्षा चालकांवरील दंडात्मक कारवाई थांबवा

रिक्षा-टॅक्सी संघर्ष कृती समितीतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा


कल्याण  : कल्याण शहर वाहतूक शाखा व पोलीस विभागाच्या माध्यमाने रिक्षा चालकांवर चौथ्या सीट साठी ६६ (ए) १९२ नुसार १० हजार रुपये दंडात्मक कारवाई करून कलम २०७ नुसार रिक्षा जप्त करण्यात येत आहे.


त्यामुळे चालकांना मानसिक त्रास व आर्थिक नुकसान होत आहे. महाराष्ट्र पोलीस ॲप हा सरकारी ॲप असून त्यामध्ये तपासणी केली असता, रिक्षा चालक यांच्यावर ६६ (ए) १९२ ओवर सीट साठी लागू होत नसून त्यासाठी कलम एमव्हीए १२५ / १७७ व १९४ ए लागू होत आहे. त्यामुळे रिक्षा चालकांवर केली जाणारी अन्यायकारक दंडात्मक कारवाई थांबवण्याची मागणी करत ही कारवाई न थांबविल्यास रिक्षा टॅक्सी संघर्ष कृती समितीतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


वाहन चालक यांनी वाहनांची नोंदणी न करता वाहन चालवणे किंवा परवान्याशिवाय चालवणे असा गुन्हा केला तर त्या वाहन चालकावर ६६ ए १९२ कलमानुसार कारवाई होऊ शकते. पण कृती समितीला संलग्न असलेल्या संघटनेचा असा समज होत चाललेला आहे की शासनाला महसूल कमी पडतोय म्हणून अशा पद्धतीने अन्यायकारक कारवाई करून रिक्षा चालकाला ६६ ए १९२ कलमा अंतर्गत कारवाई करून कोर्टात पाठवून दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येतो.


त्यामुळे कृती समिती ने संबंधित विभागास विनंती केली आहे की विभागांच्या कर्मचारी वर्गास मोटर वाहन अधिनियम व नियम नुसार वाहन चालकांनी केलेल्या गुन्ह्यानुसारच योग्य ती आणि सत्य वस्तुस्थिती नुसार कारवाई करण्यात यावी असा समज देण्यात यावा. मुलांची शाळा कॉलेजेस सुरू झालेले आहेत अशावेळी रिक्षा चालकांची गाडी जमा केल्यामुळे त्यांच्या आर्थिक बाजूवर परिणाम होऊन मानसिक त्रास होत आहे.


ही सुरु असलेली अन्यायकारक कारवाई त्वरित थांबवण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने कृती समितीचे अध्यक्ष महेंद्र मिश्रा, संघर्ष ऑटो सेना रिक्षा युनियन ठाणे जिल्हा अध्यक्ष, कृती समितीचे उपाध्यक्ष मोहन पाठारे, रिपब्लिकन रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटना कल्याण शहराध्यक्ष विल्सन काळपुंड, कृती समितीचे कार्याध्यक्ष तथा भाजपा वाहतूक संघटना अध्यक्ष यांच्या नेतृत्वात भिक मागो आंदोलन करून ज्या वाहन चालकांवर अन्याय करत कारवाई झालेली आहे अशा रिक्षा चालकांचा दंड भरून शिल्लक रक्कम वाहतूक विभागाच्या माध्यमाने शासनाला देण्यात येईल असा इशारा रिक्षा टॅक्सी संघर्ष कृती समितीतर्फे देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास ४५ मिनिटांत होणार!

मुंबई : मुंबईसह सर्व उपनगरात मेट्रोचे जाळे पसरले आहे. काही प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे तर काही मेट्रो प्रकल्प

Mira Road News : मुंबईजवळच्या मीरा रोडमध्ये पुन्हा हिंसाचार! 'पार्किंग'च्या किरकोळ वादातून ३० वाहनांची तोडफोड; परिसरात तणाव

मीरा रोड : मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड (Mira Road) परिसरात पुन्हा एकदा एका किरकोळ वादावरून परिस्थिती चिघळल्याची

काशिमीरा परिसरात मोठा राडा, २५ रिक्षांचे नुकसान, मुलींची छेडछाड; मंत्री प्रताप सरनाईकांनी व्यक्त केली बांगलादेशींच्या सहभागाची शंका

ठाणे : राज्यभरात दिवाळीचा जल्लोष सुरू असताना ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मीरा रोडजवळील

मुंबईसह विविध ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

ठाणे : मुंबईतील वाकोला प्रभाग क्रमांक ९१ चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक सगुण नाईक त्यांची कन्या युवासेना कॉलेज कक्ष

नवीन वर्षात कल्याणवासियांची होणार वाहतूक कोंडीतून मुक्तता

कल्याण : कल्याण - डोंबिवली महापालिकेची स्मार्ट सिटी प्रकल्पात निवड झाल्यानंतर कल्याण स्टेशन परिसरात वाहतूक

बदलापुरात आढळला दुर्मीळ मलबार पिट वायपर प्रजातीचा साप

बदलापूर : बदलापुरातील आदर्श विद्यामंदिर शाळेबाहेरील पदपथावर एक सर्प नागरिकांना निदर्शनास आल्यावर 'स्केल्स अँड