ऑगस्टपासून मिळवा ’व्हॉट्सअ‍ॅप’वर सातबारा

शेतकऱ्यांना मोठा दिलासा!


पुणे : महाराष्ट्राच्या भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी निर्णय घेतला असून, १ ऑगस्ट २०२५ पासून सातबारा, ८अ उतारे आणि इतर जमीन कागदपत्रे फक्त १५ रुपये शुल्कात व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध होणार आहेत. महाभूमी पोर्टलवर मोबाईल नोंदणी करून ही डिजिटल सेवा मिळवता येईल, ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा वाचेल आणि फसवणुकीला आळा बसेल. १५ जुलैपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणारी ही योजना संपूर्ण राज्यात पारदर्शक आणि सुरक्षित कागदपत्र सेवा प्रदान करेल.


महाराष्ट्रातील शेतकरी आणि नागरिकांना आता जमिनीशी संबंधित कागदपत्रांसाठी महा ई-सेवा केंद्रांवर रांगा लावण्याची गरज नाही. भूमी अभिलेख विभागाने एक नवीन डिजिटल सुविधा सुरू केली आहे, ज्याद्वारे सातबारा, ८अ उतारे, फेरफार नोंदी आणि ई-रेकॉर्ड थेट व्हॉट्सअ‍ॅपवर मिळतील.


ही सेवा फक्त १५ रुपये शुल्कात उपलब्ध होईल, ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचेल तसेच कागदपत्रांच्या गैरवापराची भीती कमी होईल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना महाभूमी पोर्टल (https://bhumiabhilekh.mahabhumi.gov.in) वर जाऊन आपला मोबाईल क्रमांक नोंदवावा लागेल.


‘महाभूमी’वर करावी लागणार नोंदणी


भूमिअभिलेख विभागाची ही सेवा तीन स्तरांवर देण्यात येणार आहे. त्यात माहिती, सुविधा आणि सूचना यांचा समावेश आहे. यासाठी शेतकऱ्यांना महाभूमी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. त्यात त्याच्या जमिनीशी संबंधित असलेल्या अधिकार अभिलेखाची नोंद आवश्यक असेल. अर्थात जमीनमालक असल्याचा पुरावा असणे आवश्यक असेल. नोंदणीसाठी ५० रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना ही सेवा उपलब्ध होईल. त्याचबरोबर नागरिकांना त्यांच्या जमिनीशी संबंधित विविध शंका व चौकशीसाठी त्वरित मदत मिळणार आहे. प्रश्नोत्तराच्या स्वरूपात ही सेवा देण्यात येणार असून, भूमिअभिलेखाशी संबंधित कायदे, प्रक्रिया, कागदपत्रांची उपयोगिता यांची माहिती देण्यात येईल. तसेच जमिनीच्या नोंदीत बदल झाल्यास, संबंधित मालकाला त्याची सूचना थेट व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार आहे. यामध्ये जमिनीची मोजणी, फेरफार, नकाशा बदल आदीसंबंधीच्या नोटीसांचा समावेश असेल.

Comments
Add Comment

Dhule Crime News : कंपनीवर 'हा' मोठा आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Tribal Reservation : धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या सवलती बंद होणार?

- राज्य सरकार ऍक्शन मोडवर; सर्वसमावेशक धोरणासाठी २७ जणांची समिती मुंबई : धर्मांतरानंतरही अनुसूचित जमातीचे

Nanded Suicide : स्टेटस ठेवलं अन् शिक्षकाची दोन मुलांसह आत्महत्या; पोलीस तपास सुरु

नांदेडमध्ये शिक्षकाची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या; व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे खळबळ नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातून

Jalgaon : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील उमाळा घाटात भीषण अपघात, दोन ठार, चार गंभीर

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गावर (Chhatrapati Sambhajinagar–Jalgaon Highway) भीषण अपघात घडल्याची माहिती समोर

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी