जिल्ह्यातील शेतकरी अद्याप नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

अलिबाग : रायगड जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या ६५ हजार १९१ शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाई प्रशासनाकडे जमा झाली होती. मात्र, ५३ हजार शेतकऱ्यांची नुकसानभरपाई आजपर्यंत मिळालेली नाही. शेतकऱ्यांचे बँक खाते केवायसी अपडेट नसल्याने पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्यात अडचणी येत आहेत.


प्रशासनातर्फे शेतकऱ्यांनी केवायसी अपडेट करण्याबाबत आवाहन करण्यात आले. मात्र, शेतकरी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.


२०२२-२४ या कालावधीत ६५ हजार १९१ शेतकऱ्यांचे २२ हजार ३०९.१९ हेक्टर क्षेत्र नैसर्गिक आपत्तीने बाधित झाले. या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईपोटी २६ कोटी ७२ लाख ९८ हजार रुपये निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला होता.


यापैकी १२ हजार १३५ शेतकऱ्यांना ११ कोटी २९ लाख ५३ हजार रुपये निधी वितरित करण्यात आला. मात्र, ५३ हजार ५६ शेतकरी अद्याप नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. जिल्हा प्रशासनाकडे १५ कोटी ४३ लाख ४५ हजार रुपये निधी शिल्लक असूनही नुकसानभरपाईचे पैसे वितरित झाले नसल्याचे मागील आढावा बैठकीत समोर आले होते.


रायगड जिल्ह्यात अवेळी पाऊस, वादळ, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती, फळबागांचे नुकसान झाले. २०२२ मध्ये ऑक्टोबर, २०२३ मध्ये मार्च, जून, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, २०२४ मध्ये मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर या कालावधीत ६५,१९१ शेतकऱ्यांच्या २२,३०९.१९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. दरम्यान, नुकसान झाल्यानंतर कृषी विभागातर्फे नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनाला पाठविण्यात आला होता. त्यानुसार, शासनाने २६ कोटी ७२ लाख ९८ हजार रुपये निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला होता.


निधी प्राप्त होताच जिल्हा प्रशासनाने ज्यांचे बँक खाते केवायसी अपडेट होते अशा १२ हजार १३५ शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी वर्ग केला आहे. मात्र, उर्वरित ५३ हजार ५६ शेतकऱ्यांचे बँक खाते केवायसी अपडेट केले नसल्यामुळे अनुदान निधीपासून वंचित राहिल्याचे सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग