पालखी सोहळ्यादरम्यान वाल्हेनगरीत वैष्णवांचा लोटला अलोट महासागर

पालखी खांद्यावर घेत ग्रामस्थांकडून विसाव्याला प्रदक्षिणा


पुणे : नाम गाऊ नाम घेऊ।।
नाम विठोबाला वाऊ।।
आमि दहिवाचे दहिवाचे दास पंढरीरायाचे।।


ही भावना मनी ठेवून कपाळी बुक्का, गंध लावून खांद्यावर भगव्या पताका उंचावत लाखो वैष्णवांनी टाळ-मृदंगांच्या गजरात आद्य रामायणकार महर्षी वाल्मीकी ऋषींच्या वाल्हेनगरीत (ता. पुरंदर) माउलींचा पालखी सोहळा विसावला. ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा जयघोष करीत आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान आद्य रामायणकारांच्या वाल्हेनगरीत बुधवारी (दि. २५ ) वैष्णवांचा अलोट महासागर लोटला होता.


अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीनगरीचा निरोप घेऊन पहाटे सहाच्या सुमारास टाळ-मृदंगांचा गजर व हरिनामाच्या जयघोषामध्ये पालखी सोहळा वाल्हेनगरीकडे मार्गस्थ झाला. सकाळी साडेदहाच्या सुमारास दौंडज ग्रामपंचायतीच्या वतीने व ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. दुपारी ११.४० वाजेच्या सुमारास पालखीचा नगारखाना व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा वाल्हेनगरीच्या वेशीवर दाखल झाला. या वेळी वाल्हेचे सरपंच अतुल गायकवाड, वागदरवाडीचे सरपंच सुनील पवार आदींसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि तरुणांनी पुष्पवृष्टी करीत ‘माउली माउली’चा जयघोष करीत जोरदार स्वागत केले. यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळाप्रमुख डॉ. भावार्थ देखणे, तहसीलदार विक्रम रजपूत आदींसह पुरंदर तालुक्यातील अनेक प्रशासकीय अधिकारीवर्ग उपस्थित होते.


आज पालखीचा लोणंदला मुक्काम
स्वागतानंतर पोलिस प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजनामुळे एक तासाच्या आत सुकलवाडी फाट्याजवळील पालखीतळावर हा सोहळा पोहोचला. रथामधून पालखी काढून ग्रामस्थांच्या खांद्यावर देण्यात आली. ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन नाचवत पालखी विसाव्याला प्रदक्षिणा घातली. आरतीनंतर भाविकांनी दुतर्फा रांगा लावून माउलींचे दर्शन घेण्यास सुरुवात केली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा गुरुवारी (दि. २६) सकाळी साडे सहा वाजता निरा स्नानासाठी मार्गस्थ होणार असून, संध्याकाळी लोणंद येथे मुक्कामी जाणार आहे.


पुढील वर्षी तरी व्हावी ‘वाल्हे’ची ग्रामप्रदक्षिणा
वाल्हे गावची श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची परंपरा असलेली ग्रामप्रदक्षिणा आळंदी देवस्थानकडून मागील काही वर्षांपासून पालखीतळावर पोहचण्यास उशीर होत असल्याचे तसेच दुपारच्या जेवणाचे कारण देत बंद करण्यात आली आहे. यावर्षी पालखी सोहळा लवकरच महर्षी वाल्मीकी विद्यालयाजवळ सकाळी ११.४० वाजताच पोहचला होता. यावर्षीही ग्रामप्रदक्षिणा झाली नसल्याने ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर व्यक्त होत होता. पुढील वर्षी पालखी महामार्गाचे काम पूर्णत्वास जाईल व या वर्षापेक्षाही पुढील वर्षी पालखी सोहळा लवकर वाल्हे गावच्या वेशीवर पोहचेल, असा अंदाज वर्तवीत वाल्हे गावची ग्रामप्रदक्षिणा सुरू होईल, अशी आशा ग्रामस्थांना आहे.

Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०