लीड्स कसोटीत कोण जिंकणार ? भारत १० विकेट घेणार की इंग्लंड विजयासाठी आवश्यक ३५० धावा करणार ?

लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांतील पहिला सामना हेडिंग्ले लीड्स येथे सुरू आहे. या सामन्यात चार दिवसांचा खेळ संपला आहे. अखेरच्या दिवशी जिंकण्यासाठी भारताला दहा विकेट घेण्याची तर इंग्लंडला आणखी ३५० धावा करण्याची आवश्यकता आहे. दोन्ही संघांपैकी जो त्यांच्यापुढील आव्हान पूर्ण करेल तो विजयी होणार आहे.

लीड्स येथे सुरू असलेल्या कसोटीत नाणेफेक जिंकून इंग्लडने गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या डावात सर्वबाद ४७१ आणि दुसऱ्या डावात सर्वबाद ३६४ धावा केल्या तर इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद ४६५ धावा केल्या. इंग्लंडने दुसऱ्या डावात चौथ्या दिवसअखेर बिनबाद २१ धावा केल्या आहेत. त्यांना जिंकण्यासाठी अखेरच्या दिवशी आणखी ३५० धावांची आवश्यकता आहे.

पहिल्या डावात भारताकडून सलामीवीर यशस्वी जयस्वाल (१०१ धावा), कर्णधार शुभमन गिल (१४७ धावा) आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (१३४ धावा) या तिघांनी शतकी खेळी केली. इतर फलंदाज त्यांना मोलाची साथ देण्यात अपयशी ठरले. यामुळे तीन फलंदाजांनी शतके करुनही भारताला ५०० धावांचा टप्पा ओलांडणे जमले नाही. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्स आणि जोश टंग यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या. नंतर फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडच्या संघातील ओली पोपने १०६ धावा केल्या. हॅरी ब्रूकने ९९ आणि बेन डकेटने ६२ धावा केल्या. इतर खेळाडूंनी संघाची धावसंख्या वाढवण्यात योगदान दिले. भारताकडून जसप्रीत बुमराहने पाच तर प्रसिद्ध कृष्णाने तीन आणि मोहम्मद सिराजने दोन विकेट घेतल्या.

दुसऱ्या डावात भारताकडून केएल राहुलने १३७ आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने ११८ धावा केल्या. इंग्लडकडून जोश टंग आणि ब्रायडन कार्सेने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. शोएब बशीरने दोन तर ख्रिस वोक्स आणि बेन स्टोक्सने प्रत्येकी एक विकेट घेतली. इंग्लंडची दुसऱ्या डावाची फलंदाजी सुरू आहे. चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद २१ धावा केल्या आहेत. झॅक क्रॉली १२ आणि बेन डकेट ९ धावांवर खेळत आहे. लीड्स कसोटी जिंकणारा संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजयाने शुभारंभ करत आघाडी घेणार आहे. दोन्ही संघ ज्या पद्धतीने खेळत आहेत ते बघता सामना अनिर्णित राहण्याची शक्यता कमी आहे.
Comments
Add Comment

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून

सुपरसंडे : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची दमदार सुरुवात

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून

ICC Women's World Cup 2025 भारत-पाकिस्तान महिला विश्वचषक सामन्यात टॉस दरम्यान गोंधळ, मॅच रेफरीकडून गंभीर घोटाळा

कोलंबो : कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि