लीड्स कसोटीत कोण जिंकणार ? भारत १० विकेट घेणार की इंग्लंड विजयासाठी आवश्यक ३५० धावा करणार ?

लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांतील पहिला सामना हेडिंग्ले लीड्स येथे सुरू आहे. या सामन्यात चार दिवसांचा खेळ संपला आहे. अखेरच्या दिवशी जिंकण्यासाठी भारताला दहा विकेट घेण्याची तर इंग्लंडला आणखी ३५० धावा करण्याची आवश्यकता आहे. दोन्ही संघांपैकी जो त्यांच्यापुढील आव्हान पूर्ण करेल तो विजयी होणार आहे.

लीड्स येथे सुरू असलेल्या कसोटीत नाणेफेक जिंकून इंग्लडने गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या डावात सर्वबाद ४७१ आणि दुसऱ्या डावात सर्वबाद ३६४ धावा केल्या तर इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद ४६५ धावा केल्या. इंग्लंडने दुसऱ्या डावात चौथ्या दिवसअखेर बिनबाद २१ धावा केल्या आहेत. त्यांना जिंकण्यासाठी अखेरच्या दिवशी आणखी ३५० धावांची आवश्यकता आहे.

पहिल्या डावात भारताकडून सलामीवीर यशस्वी जयस्वाल (१०१ धावा), कर्णधार शुभमन गिल (१४७ धावा) आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (१३४ धावा) या तिघांनी शतकी खेळी केली. इतर फलंदाज त्यांना मोलाची साथ देण्यात अपयशी ठरले. यामुळे तीन फलंदाजांनी शतके करुनही भारताला ५०० धावांचा टप्पा ओलांडणे जमले नाही. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्स आणि जोश टंग यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या. नंतर फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडच्या संघातील ओली पोपने १०६ धावा केल्या. हॅरी ब्रूकने ९९ आणि बेन डकेटने ६२ धावा केल्या. इतर खेळाडूंनी संघाची धावसंख्या वाढवण्यात योगदान दिले. भारताकडून जसप्रीत बुमराहने पाच तर प्रसिद्ध कृष्णाने तीन आणि मोहम्मद सिराजने दोन विकेट घेतल्या.

दुसऱ्या डावात भारताकडून केएल राहुलने १३७ आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने ११८ धावा केल्या. इंग्लडकडून जोश टंग आणि ब्रायडन कार्सेने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. शोएब बशीरने दोन तर ख्रिस वोक्स आणि बेन स्टोक्सने प्रत्येकी एक विकेट घेतली. इंग्लंडची दुसऱ्या डावाची फलंदाजी सुरू आहे. चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद २१ धावा केल्या आहेत. झॅक क्रॉली १२ आणि बेन डकेट ९ धावांवर खेळत आहे. लीड्स कसोटी जिंकणारा संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजयाने शुभारंभ करत आघाडी घेणार आहे. दोन्ही संघ ज्या पद्धतीने खेळत आहेत ते बघता सामना अनिर्णित राहण्याची शक्यता कमी आहे.
Comments
Add Comment

WC Semi-Final: पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली दक्षिण आफ्रिका, इंग्लंडला १२५ धावांनी हरवले

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द : दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला!

ऑस्ट्रेलिया : मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला टी२० सामना अखेर सततच्या

टी२० मध्ये पुन्हा पावसाचे विघ्न: २० ऐवजी १८ षटकांचा सामना !

कॅनबेरा : कॅनबेरातील मनुका ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत–ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा

भारताला मोठा धक्का: दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी तीन T20 सामन्यांमधून बाहेर!

कॅनबेरा : भारतीय क्रिकेट संघासाठी धोक्याची घंटा वाजवणारी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने बुधवारी दिलेल्या

७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे

वन डे रँकिंगमध्ये स्मृती मानधनाचे वर्चस्व कायम

मुंबई : आयसीसी महिला एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने चमकदार कामगिरी केली