Railway ticket price : रेल्वेच्या तिकिट दरात वाढ, तत्काळ बुकिंगसाठी नवीन नियम जारी...

मुंबई : देशभरातील कोट्यावधी लोक रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वेने अनेक कालावधीनंतर भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेचे नवीन नियम १ जुलै २०२५ पासून लागू होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. तसेच रेल्वेने केलेले बदल प्रवाशांच्या सोयीसाठी आहे असं रेल्वे मंत्रालयाने म्हंटलं आहे.  रेल्वे मंत्रालयाने एसी, नॉन एसी, एक्सप्रेस गाड्यांमध्ये रेल्वेने १ रुपये वाढ केली आहे. तर एसी क्लासमध्ये प्रती २ रुपये किलोमीटर भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतू लांब पल्ल्याच्या धावणाऱ्या रेल्वे प्रवाशांकरीता  भाडेवाढीचा परिणाम देखील होणार आहे.  जर रेल्वेतून लांब पल्ल्याचा प्रवास करत असाल तर १४ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. एसी क्लाससाठी २८ रुपये मोजावे लागणार असून ५०० किलोमीटरच्या रेल्वे प्रवासासाठी भाडेवाढ होणार नाही अशी रेल्वे मंत्रालयाने माहिती दिली.


तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधारकार्डाची गरज...


१ जूलै २०२५ पासून तात्काळ तिकिटे बुक करण्यासाठी आधारकार्ड आवश्यक आहे. रेल्वे मंत्रालयाने यापूर्वी १० जून रोजी रेल्वे झोनला माहिती दिली. त्यामुळे दलाल आणि अनधिकृत एजंटला फटका बसणार आहे.


तात्काळ तिकिट वेबसाईट आणि अॅपद्वारे बुक करता येणार... 


इथून पुढे तात्काळ तिकिट बुक करण्यासाठी प्रवाशांना आयआरसीटीसी (IRCTC) च्या वेबसाईट किंवा अॅपद्वारे तिकिट बुक करता येणार. म्हणजेच आधारकार्ड ओटीपी पडताळणीसाठी गरजेचे आहे.सामान्य प्रवाशांसाठी तात्काळ तिकिट बुक करता यावे यासाठी रेल्वे प्रशासनाने घेतलेला निर्णय योग्य असल्याचं प्रवाशांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील

दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव; मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार ब्रिटिशांच्या

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवन येथे "जावे विनोदाच्या गावा" या कार्यक्रमाचे विशेष आयोजन

श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन "लोकसेवेचा लोकजागर" ग्रंथाचे प्रकाशन मुंबई : महाराष्ट्र

मुंबई महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

ग्रीन ब्राँड्ससह सदनिकांची विक्री, करमणूक शुल्क, भूखंडाचा लिलावातून वाढवणार महसूलाची रक्कम मुंबई (विशेष