Pune Suicide Case : भयंकर घटना! कोकण कड्यावर तलाठी अन् अल्पवयीन मुलीचा मृतदेह; १२०० फूट खोल दरीत…

जुन्नर : कधी कोणाला कसा मृत्यू येईल आणि त्याचे परिणाम काय असतील हे सांगता येत नाही. अशातच पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तलाठी आणि एका मुलीचा मृतदेह खोल दरीत आडला आहे. या दोघांनीही आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय. असं असलं तरी दोघांच्याही मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कोकण कड्याहून साधारण १२०० फूट खोल दरीत हे दोन्ही मृतदेह आढळले आहेत. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात एक तलाठी आणि एका मुलीचा मृतदेह दरीत आढळला आहे. या दोघांनीही आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. पुण्याच्या जुन्नरमध्ये हे दोन्ही मृतदेह आढळून आले आहेत. आंबे-हातवीज येथील कोकण कड्यावरून उडी मारून या दोघांनी स्वत:चं आयुष्य संपवलं असा प्राथमिक अंदाज बांधला जातोय. त्यांच्या कथित आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत पुरुष हा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथं तलाठी म्हणून कार्यरत होता. रामचंद्र साहेबराव पारधी (वय ४०) असं या मृत तलाठ्याचं नाव आहे. तर या तलाठ्यासोबत ज्या मुलीचा मृतदेह आढळला आहे ती जुन्नरमधीलच रहिवासी आहे.




 

कोकण कड्यावर ३-४ दिवस उभी होती गाडी


हे दोघे गेल्या आठवड्याभरापासून गायब होते. संबंधित मुलगी ही अल्पवयीन असल्याचं बोललं जातंय. ती रामचंद्र यांची नात्यातील होती. अशातच रामचंद्र यांची गाडी ३-४ दिवसांपासून जुन्नरमधील कोकण कड्यावर उभी असल्याचे तेथील ग्रामस्थांना दिसले. तसेच याच गाडीजवळ पायातील चपलांचा जोड आढळून आल्याने ग्रामस्थांचा संशय बळावला होता.



मुलीचा मृतदेह १२०० फुटांवर


त्यानंतर कोकण कड्याच्या खोल दरीत शोध घेण्यात आला. या शोधानंतर सुमारे १२०० फुटावर मृतदेह दोन आढळले आहेत. याबाबत जुन्नर पोलिसांना कळविण्यात आले आहे. जुन्नर येथील शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमच्या १६ जणांच्या पथकाने दोन्ही मृतदेह खोल दरीतून बाहेर काढले आहेत. यात मुलीचा मृतदेह १२०० फुटांवर, तर रामचंद्र यांचा मृतदेह १३५० फुटांवर सापडला.



दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज


दरम्यान, मुलीचं अपहरण झाले असल्याची तक्रार नातेवाईकांनी १५ जून रोजी जुन्नर पोलिसांकडे केली होती. त्या अनुषंगाने पोलीस तपास करत होते. एकीकडे पोलीस तपास करत असताना दुसरीकडे या दोघांचेही मृतदेह दरीत आढळले आहेत. या दोघांनी आत्महत्या केली असावी असा प्रथमदर्शनी अंदाज आहे. मात्र पोलीस सर्व बाबी पडताळण्याचे काम करत आहेत.

Comments
Add Comment

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे