Pune Suicide Case : भयंकर घटना! कोकण कड्यावर तलाठी अन् अल्पवयीन मुलीचा मृतदेह; १२०० फूट खोल दरीत…

जुन्नर : कधी कोणाला कसा मृत्यू येईल आणि त्याचे परिणाम काय असतील हे सांगता येत नाही. अशातच पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तलाठी आणि एका मुलीचा मृतदेह खोल दरीत आडला आहे. या दोघांनीही आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय. असं असलं तरी दोघांच्याही मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कोकण कड्याहून साधारण १२०० फूट खोल दरीत हे दोन्ही मृतदेह आढळले आहेत. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात एक तलाठी आणि एका मुलीचा मृतदेह दरीत आढळला आहे. या दोघांनीही आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. पुण्याच्या जुन्नरमध्ये हे दोन्ही मृतदेह आढळून आले आहेत. आंबे-हातवीज येथील कोकण कड्यावरून उडी मारून या दोघांनी स्वत:चं आयुष्य संपवलं असा प्राथमिक अंदाज बांधला जातोय. त्यांच्या कथित आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत पुरुष हा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथं तलाठी म्हणून कार्यरत होता. रामचंद्र साहेबराव पारधी (वय ४०) असं या मृत तलाठ्याचं नाव आहे. तर या तलाठ्यासोबत ज्या मुलीचा मृतदेह आढळला आहे ती जुन्नरमधीलच रहिवासी आहे.




 

कोकण कड्यावर ३-४ दिवस उभी होती गाडी


हे दोघे गेल्या आठवड्याभरापासून गायब होते. संबंधित मुलगी ही अल्पवयीन असल्याचं बोललं जातंय. ती रामचंद्र यांची नात्यातील होती. अशातच रामचंद्र यांची गाडी ३-४ दिवसांपासून जुन्नरमधील कोकण कड्यावर उभी असल्याचे तेथील ग्रामस्थांना दिसले. तसेच याच गाडीजवळ पायातील चपलांचा जोड आढळून आल्याने ग्रामस्थांचा संशय बळावला होता.



मुलीचा मृतदेह १२०० फुटांवर


त्यानंतर कोकण कड्याच्या खोल दरीत शोध घेण्यात आला. या शोधानंतर सुमारे १२०० फुटावर मृतदेह दोन आढळले आहेत. याबाबत जुन्नर पोलिसांना कळविण्यात आले आहे. जुन्नर येथील शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमच्या १६ जणांच्या पथकाने दोन्ही मृतदेह खोल दरीतून बाहेर काढले आहेत. यात मुलीचा मृतदेह १२०० फुटांवर, तर रामचंद्र यांचा मृतदेह १३५० फुटांवर सापडला.



दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज


दरम्यान, मुलीचं अपहरण झाले असल्याची तक्रार नातेवाईकांनी १५ जून रोजी जुन्नर पोलिसांकडे केली होती. त्या अनुषंगाने पोलीस तपास करत होते. एकीकडे पोलीस तपास करत असताना दुसरीकडे या दोघांचेही मृतदेह दरीत आढळले आहेत. या दोघांनी आत्महत्या केली असावी असा प्रथमदर्शनी अंदाज आहे. मात्र पोलीस सर्व बाबी पडताळण्याचे काम करत आहेत.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद