भारतीय कसोटी क्रिकेट संघाने पाच दिवसांत तीन वेळा खांद्याला का बांधली काळी पट्टी ?

लीड्स : लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले लीड्स येथे सुरू आहे. या सामन्यात पाच दिवसांत तीन वेळा भारतीय क्रिकेट संघाने खांद्याला काळी पट्टी बांधलेली दिसली. तीन वेगवेगळ्या कारणांसाठी पाच दिवसांत तीन वेळा भारतीय क्रिकेट संघाने खांद्याला काळी पट्टी बांधली. भारतीय संघासोबतच इंग्लंडच्या क्रिकेट संघानेही पाच दिवसांत तीन वेळा खांद्याला काळी पट्टी बांधली. खेळाडूंच्या या कृतीचे कारण समोर आले आहे.

अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. या अपघातात भारतीयांसह परदेशी नागरिकांचाही मृत्यू झाला. मृतांमध्ये ५० पेक्षा जास्त इंग्लंडचे नागरिक होते. या दुर्दैवी घटनेबाबत शोक व्यक्त करण्यासाठी भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेट संघाने लीड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी खांद्याला काळी पट्टी बांधली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचे माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड लॉरेनेस यांच्या निधनाची माहिती मिळाली म्हणून भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी खांद्याला काळी पट्टी बांधली. यानंतर सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताचे माजी गोलंदाज दिलीप दोशी यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली म्हणून भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी खांद्याला काळी पट्टी बांधली. या पद्धतीने भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी लीड्स कसोटीत पाच दिवसांत तीन वेळा खांद्याला काळी पट्टी बांधली.



लीड्स कसोटी, पाचव्या दिवशी उपहारापर्यंत

भारत
पहिला डाव सर्वबाद ४७१ धावा
दुसरा डाव सर्वबाद ३६४ धावा

इंग्लंड
पहिला डाव सर्वबाद ४६५ धावा
दुसरा डाव बिनबाद ११७ धावा (उपहाराला खेळ थांबला)

इंग्लंडला विजयासाठी हव्या २५४ धावा
भारताला विजयासाठी हव्या दहा विकेट

 
Comments
Add Comment

Womens Worldcup 2026 : क्रिकेटचा महाकुंभ उद्यापासून इंग्लंडमध्ये; भारताच्या सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक!

क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, आयसीसी

India U19 : राहुल द्रविडचा मुलगा अन्वयची १९ वर्षांखालील भारतीय संघात निवड

MUMBAI : भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा 'द्रविड' आडनावाचा दबदबा पाहायला मिळणार आहे. भारताचे दिग्गज फलंदाज आणि माजी

Ben Stokes : नाईटक्लब वादानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय; बेन स्टोक्सचे कर्णधारपद गेले, दुसऱ्या कसोटीतूनही बाहेर

लंडन : इंग्लंडमध्ये झालेल्या नाईटक्लब वादानंतर आता इंग्लंड बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. वेल्स क्रिकेट

PM MODI : "भारताची क्रीडा क्षेत्रातील घोडदौड थक्क करणारी"; युवा खेळाडूंना दिले 'ऑलिम्पिक'चे मोठे लक्ष्य

NEW DELHI : भारतीय खेळाडूंची जागतिक स्तरावरील कामगिरी आणि देशातील क्रीडा संस्कृतीचा वाढता विस्तार, यावर पंतप्रधान

FIFA World Cup 2026 : भारतीय चाहत्यांसाठी खुशखबर! कुठे पाहता येणार सामने, किती आहे सबस्क्रिप्शन फी? जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : फुटबॉल विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच फिफा वर्ल्ड कप. फिफा वर्ल्ड कप २०२६ आज (११ जून ) पासून सुरु

ICC ODI Rankings : भारत पुन्हा नंबर वन ! टी-२० आणि एकदिवसीय मध्ये वर्चस्व कायम

मुंबई :आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने नुकताच आयसीसी रँकिंग जाहिर केली आहे.यात भारतीय संघाने