भारतीय कसोटी क्रिकेट संघाने पाच दिवसांत तीन वेळा खांद्याला का बांधली काळी पट्टी ?

लीड्स : लीड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले लीड्स येथे सुरू आहे. या सामन्यात पाच दिवसांत तीन वेळा भारतीय क्रिकेट संघाने खांद्याला काळी पट्टी बांधलेली दिसली. तीन वेगवेगळ्या कारणांसाठी पाच दिवसांत तीन वेळा भारतीय क्रिकेट संघाने खांद्याला काळी पट्टी बांधली. भारतीय संघासोबतच इंग्लंडच्या क्रिकेट संघानेही पाच दिवसांत तीन वेळा खांद्याला काळी पट्टी बांधली. खेळाडूंच्या या कृतीचे कारण समोर आले आहे.

अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. या अपघातात भारतीयांसह परदेशी नागरिकांचाही मृत्यू झाला. मृतांमध्ये ५० पेक्षा जास्त इंग्लंडचे नागरिक होते. या दुर्दैवी घटनेबाबत शोक व्यक्त करण्यासाठी भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेट संघाने लीड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी खांद्याला काळी पट्टी बांधली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचे माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड लॉरेनेस यांच्या निधनाची माहिती मिळाली म्हणून भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी खांद्याला काळी पट्टी बांधली. यानंतर सामन्याच्या पाचव्या दिवशी भारताचे माजी गोलंदाज दिलीप दोशी यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली म्हणून भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी खांद्याला काळी पट्टी बांधली. या पद्धतीने भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी लीड्स कसोटीत पाच दिवसांत तीन वेळा खांद्याला काळी पट्टी बांधली.



लीड्स कसोटी, पाचव्या दिवशी उपहारापर्यंत

भारत
पहिला डाव सर्वबाद ४७१ धावा
दुसरा डाव सर्वबाद ३६४ धावा

इंग्लंड
पहिला डाव सर्वबाद ४६५ धावा
दुसरा डाव बिनबाद ११७ धावा (उपहाराला खेळ थांबला)

इंग्लंडला विजयासाठी हव्या २५४ धावा
भारताला विजयासाठी हव्या दहा विकेट

 
Comments
Add Comment

WC Semi-Final: पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली दक्षिण आफ्रिका, इंग्लंडला १२५ धावांनी हरवले

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द : दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला!

ऑस्ट्रेलिया : मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला टी२० सामना अखेर सततच्या

टी२० मध्ये पुन्हा पावसाचे विघ्न: २० ऐवजी १८ षटकांचा सामना !

कॅनबेरा : कॅनबेरातील मनुका ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत–ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा

भारताला मोठा धक्का: दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी तीन T20 सामन्यांमधून बाहेर!

कॅनबेरा : भारतीय क्रिकेट संघासाठी धोक्याची घंटा वाजवणारी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने बुधवारी दिलेल्या

७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे

वन डे रँकिंगमध्ये स्मृती मानधनाचे वर्चस्व कायम

मुंबई : आयसीसी महिला एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने चमकदार कामगिरी केली