वारीसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अबू आझमी यांनी मागितली माफी

  46

मुंबई: वारी संदर्भात केलेल्या वादग्रस्त (Abu Azmi Wari Controversy) वक्तव्यानंतर, अबू आझमी यांना आपली चूक लक्षात आली आहे.  "माझ्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावनांना ठेच पोहचली असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. मी माफी मागतो." असे ट्विट करत त्यांनी आपला माफीनामा जाहीर केला आहे.


महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे आझमी यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली. भाजपसह इतर पक्षांनी अबू आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी अबू आझमींना सेक्शन दहा प्रमाणे नोटीस बजावत कारवाईचा इशारा देखील दिला होता. ज्यामुळे हे प्रकरण अंगलट येईल या भीतीने, आता अबू आझमी यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. त्यांनी सोशल मीडियावर म्हटले की, माझ्या वक्तव्यामुळे गैरसमज पसरवण्यात आले. माझे वक्तव्य तोडून मोडून दाखवले गेले. माझ्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावनांना ठेच पोहचली असेल तर मी माझे शब्द मागे घेतो. मी त्यांची जाहीर माफी मागतो. कोणाच्याही धार्मिक भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता, असे आझमी यांनी म्हटले आहे.


"मी नेहमीच प्रत्येक धर्म, संस्कृती, सुफी संत आणि त्यांच्या परंपरांचा आदर करतो. वारी परंपरेचे पालन करणाऱ्या सर्व वारकरी बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो. वारीची परंपरा महाराष्ट्राच्या आंतरधर्मीय, समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचा अभिमानास्पद भाग आहे. मी पालखीचा उल्लेख फक्त मुस्लिम समुदायाविरुद्ध होणाऱ्या भेदभावाच्या आणि त्यांच्या हक्कांच्या संदर्भात केला होता. मी कोणत्याही प्रकारची तुलना केली नव्हती. माझा हेतू आणि माझी मागणी कोणत्याही प्रकारे अयोग्य नव्हती. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मी तसे म्हटले होते. अल्पसंख्याक समुदायाच्या मनात या देशात वेगवेगळे कायदे आहेत, अशी भावना निर्माण होऊ नये, हा माझा हेतू होता, असे आझमी यांनी म्हटले.



काय म्हणाले होते अबू आझमी?


अबू आझमी यांनी नमाज पठणामुळे होणाऱ्या गर्दीची तुलना वारीशी केली, ज्यात ते म्हंटले की, "आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही. पण ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा काही मशिदीतील लोकं 5 ते 10 मिनिटं रस्त्यावर नमाज पठण करतात, त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात रस्त्यावर नमाज पठण केलं तर पासपोर्ट रद्द करु. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं लवकर जाऊ अन्यथा पालख्यामुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही. पण नमाजसाठी तक्रार होते असे अबू आझमी म्हणाले होते.

Comments
Add Comment

Ashadhi Wari 2025 : भोळ्याभाबड्या वारकऱ्यांची फसवणूक! आषाढी वारीत विठ्ठल दर्शनाचे बनावट पास विक्रीचा प्रकार उघड

पालखी सोहळ्यातील ७ वारकऱ्यांची फसवणूक पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने

Pune Suicide Case : भयंकर घटना! कोकण कड्यावर तलाठी अन् अल्पवयीन मुलीचा मृतदेह; १२०० फूट खोल दरीत…

जुन्नर : कधी कोणाला कसा मृत्यू येईल आणि त्याचे परिणाम काय असतील हे सांगता येत नाही. अशातच पुण्यातून एक धक्कादायक

Hindi Language : हिंदी भाषा सक्तीवर सरकारची तुर्तास स्थगिती, राज्य सरकारची नेमकी भूमिका काय ?

मुंबई : राज्यात हिंदी तिसरी भाषा अनिवार्य करण्यासाठी राज्य सरकार आणि विरोधक यांच्यात खडाजंगी पाहायाला मिळाली

संगमनेर खुर्द येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

१० जण ताब्यात, तर ५ लाखांचा मुद्देमाल जप्त संगमनेर : संगमनेर शहरालगत असलेल्या संगमनेर खुर्द येथे प्रवरा नदीच्या

रस्त्यावर बेशिस्तपणे, नो-पार्किंग झोनमध्ये लावलेली वाहने जप्त होणार : यशवंत डांगे

अहिल्यानगर : महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात पे अँड पार्क सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी खासगी संस्थेची

जामखेडमध्ये काळ्या काचा कुणाच्या आश्रयाने ?

पीएसआयच्या धडाकेबाज कारवाईने राजकीय मंडळींच्या भुवया उंचवल्या जामखेड : जामखेड शहरात गेल्या काही