इस्रायलमधून मायदेशी परतले ५९४ भारतीय

नवी दिल्ली : इस्रायल-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारतीय नागरिकांना त्यांच्या मायदेशी परतण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी इस्रायलमधून ५४९ भारतीय नागरिकांना घेऊन हवाई दलाची तीन विमाने नवी दिल्लीत पोहोचली. पहिल्या विमानात १६१, दुसऱ्या विमानात १६५ आणि तिसऱ्या विमानात २६८ भारतीय नागरिकांना आणण्यात आले. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री (एमओएस) पवित्रा मार्गेरिटा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी विमानतळावर भारतीय नागरिकांचे स्वागत केले. परदेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विट केले की ऑपरेशन सिंधूचा इस्रायल टप्पा २३ जून २०२५ रोजी सुरू झाला. यामध्ये १६१ भारतीय नागरिकांची पहिली तुकडी जॉर्डनमधून मायदेशी परत आणण्यात आली. त्यानंतर, हवाई दलाच्या सी-१७ विमानाने इस्रायलमधून १६५ प्रवाशांना परत आणले. मंगळवारी दुपारी २६८ नागरिकांना घेऊन तिसरे विमान भारतात पोहोचले. मशहादहून नवी दिल्ली येथे पोहोचलेल्या एका विशेष विमानाने २९२ भारतीय नागरिकांना इराणमधून बाहेर काढण्यात आले. आतापर्यंत इराणमधून २२९५ भारतीय नागरिकांना परत आणण्यात आले आहे
Comments
Add Comment

Stray Dogs : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय : शाळा आणि रुग्णालयांंजवळून भटके कुत्रे हटवण्याचे आदेश कायम

नवी दिल्ली : देशात भटक्या कुत्र्यांचा वाढता प्रादुर्भाव (Stray Dogs) आणि त्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटना लक्षात

Uttarakhand Train Accident : ऋषिकेशमध्ये मोठा रेल्वे अपघात टळला! उज्जयनी एक्सप्रेसचे ३ डब्बे रुळावरून घसरले

ऋषिकेश : उत्तराखंडमधील ऋषिकेश (Uttarakhand Train Accident) येथे उज्जयनी एक्सप्रेसशी संबंधित धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेशन

Stray Dog Menace : रस्त्यांवरील कुत्र्यांचा प्रश्न अखेर सुटणार ? नागरिकांची सुरक्षा की प्राण्यांचे हक्क, आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे देशाचे लक्ष

नवी दिल्ली : देशभरातील गल्लीबोळांमध्ये आणि रस्त्यांवर वाढलेली भटक्या कुत्र्यांची संख्या आणि त्यांच्याकडून

Petrol Diesel Price Hike : सर्वसामान्यांना पुन्हा झटका! पेट्रोल-डिझेलच्या दरात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे (Petrol Diesel Price Hike) सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा मोठा फटका बसला आहे.

Mumbai-Ahmedabad Bullet Train : प्रतीक्षा संपली! देशातील पहिल्या 'बुलेट ट्रेन'ची पहिली झलक आली समोर; दिल्लीत झळकावले चित्र

नवी दिल्ली : भारतातील बहुचर्चित आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन' (Mumbai-Ahmedabad Bullet Train)

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक