राजा रघुवंशी हत्येला नवे वळण : हत्येपूर्वी सुरू केली होती कंपनी

  78

शिलॉन्ग : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे , हत्येच्या आधी दोघांनी मिळून कंपनी सुरू केली होती . राजा रघुवंशीचा भाऊ विपीन रघुवंशीने याचा खुलासा दिला आहे .


राजा रघुवंशीची हत्या होण्याच्या काही दिवस आधी राजा आणि सोनमने एक कंपनी सुरू केली होती, ही कंपनी राजाची आई चुन्नी देवी यांच्या नावावर होती. या घटनेआधी कंपनीच्या खात्यात ७ ते ८ लाख रुपये जमा झाले होते . हे जमा झालेले पैसे सोनमने हत्येची सुपारी देण्यासाठी केला आहे असा आरोप विपीनने केला आहे.



हत्येचा कट कधी रचला ?


विपीनच्या सांगण्यावरून , राजा आणि सोनम हानिमूनला जाण्यापूर्वी सोनमने तिचे तीन साथीदार विकास, आकाश आणि आनंद यांना पैसे दिले होते, जे बहुधा त्या कंपनीच्या खात्यातून काढले गेले असावे. त्यामुळे, संपूर्ण हत्येचा कट आधीच रचलेला होता, असा विश्वास राजा रघुवंशीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. आता रघुवंशी कुटुंबीय आरोपींच्या नार्को टेस्टसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत.



आठव्या आरोपीचा शोध सुरू


या प्रकरणात आता आठव्या आरोपीचे नाव लोकेंद्र तोमर समोर आले आहे. शिलॉन्ग पोलिस लोकेंद्र तोमरच्या शोधात आहेत, कारण सोनमने फरार असताना इंदूरच्या देवास नाका परिसरातील फ्लॅटमध्ये त्याच्याकडे आसरा घेतला होता. प्रॉपर्टी ब्रोकर सिलोम जेम्स आणि सिक्युरिटी गार्ड बलवीर अहिरवार यांच्या अटकेनंतर आठव्या आरोपीचा तपास सुरू झाला आहे. सिलोमने चौकशीत कबूल केलं की लोकेंद्र तोमरने त्या फ्लॅटमधून एक काळी बॅग हटवून ती जाळण्याचा दबाव त्याच्यावर टाकला होता. त्या बॅगमध्ये पिस्तूल, रोख रक्कम आणि इतर पुरावे होते. बॅग जाळल्यानंतर पोलिसांनी त्याचे अवशेष जळालेला मोबाइल, प्लास्टिकचे तुकडे इत्यादी जप्त केले आहेत.



आतापर्यंत प्रकरणात मिळालेली माहिती


राजा रघुवंशी याची २३ मे रोजी हत्या करण्यात आली आणि २ जून रोजी त्याचा मृतदेह सापडला. हत्येच्या १७ दिवसांनंतर सोनम पोलिसांसमोर शरण आली, त्यानंतर इतर चार आरोपींनाही अटक करण्यात आली. या हत्येने देशभरात खळबळ उडाली. कुटुंबाला असा संशय आहे की, सोनमने हा गुन्हा एकटीने केला नसेल. पोलीस आता या प्रकरणाकडे केवळ प्रेम प्रकरण किंवा वैयक्तिक शत्रुत्व म्हणून पाहत नाहीत तर यात खोलवरचा कट असण्याची शक्यताही तपासत आहेत. येत्या काळात अलका आणि सोनममधील मैत्रीबाबत धक्कादायक खुलासे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना ५ दिवसांची एनआयए कोठडी

जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्था अर्थातच

जम्मूला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान लँडिंग न करताच दिल्लीला परतले, कारण...

नवी दिल्ली: श्रीनगरला जम्मूमार्गे जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान आयएक्स-२५६४ सोमवारी दिल्लीला माघारी

धक्कादायक! पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी नाडियामध्ये बॉम्बस्फोटात ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाईचे दिले आश्वासन कोलकाता : पश्चिम बंगालच्या नाडिया

Fact Check: इराणवर हल्ल्यासाठी अमेरिकेकडून भारतीय एअरस्पेसचा वापर? भारताने फेटाळला दावा

भारताने फेटाळला दावा नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या इराण आणि इस्त्रायलच्या वादात आता

युद्धनौका ‘तामाल’ नौदलात दाखल होणार

नवी दिल्ली : रशियाच्या कॅलिनिनग्रांड येथे १ जुलै २०२५ रोजी आयोजित समारंभात तमाल युद्धनौका भारतीय नौदलाच्या

पावसाळ्यातही सुरू राहिल नक्षलविरोधी मोहिम- अमित शाह

रायपूर : नक्षलवादी पावसाळ्यात घनदाट जंगलात लपून बसतात. परंतु, यंदा पावसाळ्यातही नक्षलवाद्यांच्या विरोधातील