जम्मूला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान लँडिंग न करताच दिल्लीला परतले, कारण...

नवी दिल्ली: श्रीनगरला जम्मूमार्गे जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान आयएक्स-२५६४ सोमवारी दिल्लीला माघारी परतले. श्रीनगरला जाण्यापूर्वी विमान दुपारी जम्मूमध्ये उतरणार होते. मात्र, काही काळ जम्मू विमानतळावर फिरल्यानंतर वैमानिकाने लँडिंग न करताच दिल्लीला परतण्याचा निर्णय घेतला. परत जाण्यापूर्वी विमानाने जम्मू हवाई क्षेत्रात अनेक फेऱ्या मारल्या होत्या, दरम्यान हवामान स्वच्छ देखील होते, पण तरीही ते दिल्लीला परतले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विमान दुपारी १२ वाजता जम्मू विमानतळावर उतरणार होते, त्यानंतर ते श्रीनगरला रवाना होणार होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे विमान जम्मूत उतरवू शकले नाही.



विमान दिल्लीला परत का आले?


दिल्लीहून जम्मूमार्गे श्रीनगरला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान सोमवारी तांत्रिक बिघाडामुळे जम्मू शहरात न उतरताच पुन्हा दिल्लीला वळवण्यात आले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विमान IX-2564 दुपारी जम्मूमध्ये उतरण्याची अपेक्षा होती, परंतु वैमानिकाने दिल्लीला परत जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी ते काही वेळ विमानतळावरच घिरट्या घालत राहिले.


दरम्यान, अनेक प्रवाशांचे नातेवाईकही जम्मू विमानतळावर त्यांना घेण्यासाठी आले होते, परंतु नंतर त्यांना निराश होऊन परतावे लागले. दिल्लीला परतल्यानंतर विमानातील प्रवाशांना पर्यायी विमान किंवा मार्गाची वाट पहावी लागली.


आयएएनएसला दिलेल्या निवेदनात, एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, "तांत्रिक समस्येमुळे मूळ विमान दिल्लीला परतल्यानंतर आमच्या दिल्ली-जम्मू उड्डाणासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही प्रवाशांची दिलगिरी व्यक्त करतो."


यापूर्वी, एअर इंडिया एक्सप्रेसच्या दुसऱ्या विमानाबाबतही मोठा गोंधळ उडाला होता, १८० प्रवाशांसह बेंगळुरूहून पाटणाला जाणारे फ्लाइट IX2936 रविवारी सकाळी ८:३० वाजता पोहोचले. त्यानंतर एका दिवसातच ही दुसरी घटना घडली आहे.


प्रवाशांच्या मते, विमान पुन्हा त्याच जागी उतरल्यानंतर, त्यांचे सामान कुठे उपलब्ध असेल याची बॅगेज बेल्ट नंबर नमूद करून घोषणा करण्यात आल्या.मात्र अनेक प्रवाशांना त्यांचे चेक-इन केलेले सामान गहाळ झाल्याचे पाहून धक्काच बसला. विमान उतरल्यानंतर, सर्व प्रवाशांना बेल्ट क्रमांक ४ वरून त्यांचे सामान घेण्यास सांगण्यात आले होते. मात्र कोणतेही सामान आले नाही. चौकशी केल्यावर, विमान कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले की विमानातील वजनाच्या मर्यादेमुळे सामान भरलेच गेले नाही. या स्पष्टीकरणामुळे प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि त्यांनी विमानतळावर निदर्शने सुरू केली, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले आहे. विमानतळावर तैनात असलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या ग्राउंड स्टाफ आणि सीआयएसएफ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून त्रस्त प्रवाशांना शांत केले.


अहवालात असेही म्हटले आहे की, अनेक प्रवाशांची यामुळे गैरसोय झाली,  खास करून ज्यांना कनेक्टिंग फ्लाइट पकडायच्या होत्या, त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एअरलाइन कर्मचाऱ्यांनी सर्व बाधित प्रवाशांचे संपर्क तपशील गोळा केले आणि त्यांना आश्वासन दिले की त्यांच्या बॅगा त्यांच्या घरी पोहोचवल्या जातील.


Comments
Add Comment

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी