India AI Impact Summit 2026: मोठा दृष्टीकोन ठेवत एआयचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: देशाची नवीन पिढी वेगाने कृत्रिम बुद्धीमत्तेला म्हणजेच 'एआय'ला स्वीकारत असून ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ मध्ये समावेशक आणि ‘सॉव्हरिन एआय’ याविषयावर ते बोलत होते.



काय म्हणाले पंतप्रधान मोदी?


भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी १.४ अब्ज भारतीयांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. जगातील १०० हून अधिक देशांतील प्रतिनिधी या ऐतिहासिक परिषदेत सहभागी झाल्याचे त्यांनी नमूद केले. भारत हा जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश असून, तंत्रज्ञान कौशल्याचा सर्वात मोठा केंद्रबिंदू असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान म्हणाले की, भारत केवळ नवीन तंत्रज्ञान निर्माण करत नाही, तर ते वेगाने आत्मसातही करतो. देशात तंत्रज्ञान सक्षम करणारी भक्कम परिसंस्था (इकोसिस्टम) निर्माण झाली आहे. काही लोकांना नव्या तंत्रज्ञानाबाबत शंका वाटत असली, तरी भारतीय युवक ज्या वेगाने एआय स्वीकारत आहेत, तो अभूतपूर्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समिटमधील एआय प्रदर्शनाबाबतही मोठा उत्साह दिसून आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.



आपण एआयसोबत काय करतो हा अधिक महत्त्वाचा प्रश्न:


इतिहासातील निर्णायक टप्प्यांचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, काही बदलांनी संपूर्ण शतकांची दिशा बदलली आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हा तसाच एक परिवर्तनबिंदू आहे. एआय केवळ यंत्रांना बुद्धिमान बनवत नाही, तर मानवी क्षमताही अनेक पटींनी वाढवत आहे. भविष्यात एआय काय करू शकते हा खरा प्रश्न नाही; आज आपण एआयसोबत काय करतो हा अधिक महत्त्वाचा प्रश्न असल्याचे मोदी म्हणाले.



जबाबदारीने एआयचा वापर करणे आवश्यक:


मशीन लर्निंगपासून लर्निंग मशीनपर्यंतचा प्रवास वेगवान, सखोल आणि व्यापक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. त्यामुळे मोठा दृष्टीकोन ठेवत जबाबदारीने एआयचा वापर करणे आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला.यासोबतच, पुढील पिढ्यांच्या हाती आपण एआयचे कोणते स्वरूप देणार आहोत, याचीही काळजी घेणे आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

Comments
Add Comment

Amazon CEO Andy Jassy : ॲमेझॉनची भारतात २०३० पर्यंत ४८ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार; अँडी जेसी यांनी पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर केली घोषणा

नवी दिल्ली : जगातील आघाडीची ई-कॉमर्स आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ॲमेझॉनने गुरुवारी भारतात २०२६ ते

Ahmedabad Airport : अहमदाबाद विमानतळावर थरारक प्रसंग! एअर इंडिया आणि इंडिगोची विमाने आली समोरासमोर; मोठा अपघात टळला

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर बुधवार २४ जून रोजी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना टळल्याची घटना समोर आली

Air India Plane : एअर इंडियाचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत! जाणून घ्या नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली : एअर इंडिया (Air India) च्या विमानासंदर्भात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीहून अमृतसरकडे जाणारे

Indian Passport : पासपोर्टधारकांसाठी महत्त्वाची बातमी; MEA ने नागरिकत्वाबाबत दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट (Indian Passport) हा नागरिकत्वाचा (Citizenship) पुरावा नसून तो केवळ आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी (International Travel)

Pharmacy Sector: 'औषधनिर्माता भरती, पदोन्नती आणि सेवा नियम २०२५' लागू

नवी दिल्ली :  देशातील लाखो औषधनिर्मात्यांसाठी (Pharmacists) एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

Kolkata building collapse : भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली

ताराताला परिसरात मोठी दुर्घटना, अनेक जण जखमी कोलकाता : पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकाता (Kolkatta) येथे बुधवारी