India AI Impact Summit 2026: मोठा दृष्टीकोन ठेवत एआयचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: देशाची नवीन पिढी वेगाने कृत्रिम बुद्धीमत्तेला म्हणजेच 'एआय'ला स्वीकारत असून ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ मध्ये समावेशक आणि ‘सॉव्हरिन एआय’ याविषयावर ते बोलत होते.



काय म्हणाले पंतप्रधान मोदी?


भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी १.४ अब्ज भारतीयांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. जगातील १०० हून अधिक देशांतील प्रतिनिधी या ऐतिहासिक परिषदेत सहभागी झाल्याचे त्यांनी नमूद केले. भारत हा जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश असून, तंत्रज्ञान कौशल्याचा सर्वात मोठा केंद्रबिंदू असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान म्हणाले की, भारत केवळ नवीन तंत्रज्ञान निर्माण करत नाही, तर ते वेगाने आत्मसातही करतो. देशात तंत्रज्ञान सक्षम करणारी भक्कम परिसंस्था (इकोसिस्टम) निर्माण झाली आहे. काही लोकांना नव्या तंत्रज्ञानाबाबत शंका वाटत असली, तरी भारतीय युवक ज्या वेगाने एआय स्वीकारत आहेत, तो अभूतपूर्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समिटमधील एआय प्रदर्शनाबाबतही मोठा उत्साह दिसून आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.



आपण एआयसोबत काय करतो हा अधिक महत्त्वाचा प्रश्न:


इतिहासातील निर्णायक टप्प्यांचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, काही बदलांनी संपूर्ण शतकांची दिशा बदलली आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हा तसाच एक परिवर्तनबिंदू आहे. एआय केवळ यंत्रांना बुद्धिमान बनवत नाही, तर मानवी क्षमताही अनेक पटींनी वाढवत आहे. भविष्यात एआय काय करू शकते हा खरा प्रश्न नाही; आज आपण एआयसोबत काय करतो हा अधिक महत्त्वाचा प्रश्न असल्याचे मोदी म्हणाले.



जबाबदारीने एआयचा वापर करणे आवश्यक:


मशीन लर्निंगपासून लर्निंग मशीनपर्यंतचा प्रवास वेगवान, सखोल आणि व्यापक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. त्यामुळे मोठा दृष्टीकोन ठेवत जबाबदारीने एआयचा वापर करणे आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला.यासोबतच, पुढील पिढ्यांच्या हाती आपण एआयचे कोणते स्वरूप देणार आहोत, याचीही काळजी घेणे आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी