India AI Impact Summit 2026: मोठा दृष्टीकोन ठेवत एआयचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: देशाची नवीन पिढी वेगाने कृत्रिम बुद्धीमत्तेला म्हणजेच 'एआय'ला स्वीकारत असून ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ मध्ये समावेशक आणि ‘सॉव्हरिन एआय’ याविषयावर ते बोलत होते.



काय म्हणाले पंतप्रधान मोदी?


भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी १.४ अब्ज भारतीयांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. जगातील १०० हून अधिक देशांतील प्रतिनिधी या ऐतिहासिक परिषदेत सहभागी झाल्याचे त्यांनी नमूद केले. भारत हा जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश असून, तंत्रज्ञान कौशल्याचा सर्वात मोठा केंद्रबिंदू असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान म्हणाले की, भारत केवळ नवीन तंत्रज्ञान निर्माण करत नाही, तर ते वेगाने आत्मसातही करतो. देशात तंत्रज्ञान सक्षम करणारी भक्कम परिसंस्था (इकोसिस्टम) निर्माण झाली आहे. काही लोकांना नव्या तंत्रज्ञानाबाबत शंका वाटत असली, तरी भारतीय युवक ज्या वेगाने एआय स्वीकारत आहेत, तो अभूतपूर्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समिटमधील एआय प्रदर्शनाबाबतही मोठा उत्साह दिसून आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.



आपण एआयसोबत काय करतो हा अधिक महत्त्वाचा प्रश्न:


इतिहासातील निर्णायक टप्प्यांचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, काही बदलांनी संपूर्ण शतकांची दिशा बदलली आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हा तसाच एक परिवर्तनबिंदू आहे. एआय केवळ यंत्रांना बुद्धिमान बनवत नाही, तर मानवी क्षमताही अनेक पटींनी वाढवत आहे. भविष्यात एआय काय करू शकते हा खरा प्रश्न नाही; आज आपण एआयसोबत काय करतो हा अधिक महत्त्वाचा प्रश्न असल्याचे मोदी म्हणाले.



जबाबदारीने एआयचा वापर करणे आवश्यक:


मशीन लर्निंगपासून लर्निंग मशीनपर्यंतचा प्रवास वेगवान, सखोल आणि व्यापक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. त्यामुळे मोठा दृष्टीकोन ठेवत जबाबदारीने एआयचा वापर करणे आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला.यासोबतच, पुढील पिढ्यांच्या हाती आपण एआयचे कोणते स्वरूप देणार आहोत, याचीही काळजी घेणे आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

Comments
Add Comment

अमेरिकेने रंग दाखवला मग भारतासाठी चीन उभा राहिला, चीनने थेट भारताचा झेंडा पोस्ट करत म्हटले....

Donald Trump on India: बाळ जन्माला येते आणि लगेच अमेरिकन नागरिक होते, 'इथे एका मूलाला लगेच नागरिकत्व मिळते आणि ते संपूर्ण

लग्नाच्या 10 दिवस आधी होणाऱ्या बायकोचं मोठं कांड समोर आलं, बॉयफ्रेंडने नको नको ते सर्वच सांगितलं

मध्यप्रदेश : लग्न हा आयुष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय समजला जातो. जर जोडीदार योग्य असेल तर पुढील आयुष्य

India - Nepal Border : नेपाळकडून सीमेवर नवीन कडक नियम; भारतीय प्रवाशांवर परिणाम

भारत-नेपाळ सीमेवरील प्रवास आणि व्यवहारांमध्ये मोठे बदल झाले असून नेपाळ सरकारने भारतीय प्रवाशांसाठी नवीन व कडक

Heatwave in Odisha : ओडिशात उष्णतेचा कहर; झारसुगुडा ठरले देशातील सर्वाधिक तापमानाचे शहर

देशात सध्या उष्णतेची तीव्र लाट उसळली असून ओडिशा राज्य या उष्णतेच्या तडाख्यात सापडले आहे. किनारपट्टीपासून ते

Online Gaming Sector : ऑनलाइन गेमिंग क्षेत्रासाठी १ मेपासून नवा कायदा

देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑनलाइन गेमिंग क्षेत्राला नियमनात आणण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले

Bengal Election 2026 : बंगाल निवडणुकीला हिंसक वळण : कुठे कार्यकर्त्यांवर हल्ले तर कुठे ईव्हीएम वादामुळे वातावरण तापले

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना