Pandharpur Wari : वारकऱ्यांचं जेवणाचं मॅनेजमेंट कसं असतं?

कशी केली जाते खाणपानची तयारी?


काही जणी कणिक मळतात. कुणी ​ चपात्या लाट​तय. कोण भाजी निवडतयं​, असं चित्र तुम्हाला वारीच्या मुक्कांमी असलेल्या तंबूत दिसतयं. आपापल्या दिंडीमधल्या वारकऱ्यांसाठी दिंडीप्रमुखांनी अचूक नियोजन केलेलं असतं. लाखो वैष्णावात कोणीही उपाशी राहत नाही. कारण स्वयंपाक साहित्य ट्रक सोबत असतं. ​मुक्कामा स्थळी वारकरी पोहोचण्यासाठी जेवण म्हणजे खाण्या पिण्याची ​आधीच तयारी करून ठेवलेली असते.



वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला संप्रदाय आहे. वारकरी म्हणजे नित्यनियमाने वारी करणारा भक्त. ​राज्याच्या कानाकोपऱ्यांतून वारकरी आपल्या पालख्यासह आळंदी ते पंढरपूर पायी चालत आहेत. भर पावसात चालणाऱ्या वारकऱ्यांच्या जेवणाची कशी होते व्यवस्था? याबद्दल अनेकांना कुतूहल असतं. प्रत्येक मार्गावर अंदाजे २०० दिंड्या ​ असतात​. ज्यात ४००-५०० ट्रक असतात. मिरवणुकीच्या मध्यभागी मुख्य पालखी असते, प्रत्येक गटाचा एक निश्चित क्रमांक आणि क्रम असतो जो काटेकोरपणे पाळला जातो.



प्रत्येक गटाकडे एक ट्रक असतो जिथे त्यांचे सामान आणि अन्न साहित्य ठेवले जाते. पहाटेच्या वेळी या ट्रकना शांतपणे बाहेर पडावे लागते... लवकर झोपणे आणि लवकर उठणे, हे त्यांच्यासाठी गुप्त ऊर्जा सूत्र ​असतं. ​​तंबूमध्ये मुक्काम करणाऱ्या वारकऱ्यांना पहाटे तीनच्या सुमारास उठावे लागते. लवकर उठून, तंबू पाडून, सर्व सामान भरून ट्रक पुढे पाठवले जातात. ​या ट्रक किंवा ट्रेम्पोमध्ये ​ दिंडीप्रमुख स्वतःचा​ जीवनावश्यक साठा सोबत ​ठेवतात. त्यामध्ये गहू, तांदूळ, डाळ, मसाले, तेल​ या गोष्टींचा समावेश असतो.



वारीतील खानपान व्यवस्थेचे स्वरूप​ कसं असतं ते पाहूया



  • प्रत्येक दिंडी आपल्या वारकऱ्यांसाठी जेवण, निवास आणि इतर आवश्यक सोयींची व्यवस्था करते.

  • ज्या गावात वारीतील दिंड्या मुक्काम करतात, त्या गावचे लोक वारकऱ्यांसाठी जेवण, पाणी आणि इतर सोयी पुरवतात.

  • वारीच्या मार्गावर अनेक ठिकाणी स्वयंपाकासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. तिथे वारकरी स्वतःचे जेवण बनवतात किंवा स्थानिक लोक जेवण बनवून देतात.

  • अनेक ठिकाणी वारकऱ्यांसाठी प्रसाद​ म्हणजे ​जेवणाची​ व्यवस्था केलेली असते. तिथे वारकऱ्यांना फराळ किंवा जेवण दिले जाते.

  • वारीतील खानपान व्यवस्था ही एक सामुदायिक जबाबदारी आहे. दिंडी, स्थानिक लोक आणि वारकरी मिळून ही व्यवस्था यशस्वीपणे पार पाडतात.

  • वारीमध्ये सहभागी होणारे सर्व वारकरी आनंदाने आणि उत्साहाने वारीचा आनंद घेतात.

Comments
Add Comment

Agriculture Minister Dattatray Bharne : "बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

"बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बियाणे उत्पादक

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं चित्र आहे. बीडमध्ये मैत्रीला काळिमा

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बंधनकारकच; परिवहन मंत्र्यांची ठाम भूमिका; आजच्या बैठकीत काय घडलं ?

(Marathi Language Compulsory Taxi-Auto ) : आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ₹१५०० येणार की ₹३००० येणार? अपडेट काय ?

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अनेक गरजू

Maharashtra Heat Wave : राज्यभर उष्णतेचा कहर; अकोल्यात ४५.६ अंशांची नोंद, पुढील दोन दिवसांत आणखी वाढीचा अंदाज

महाराष्ट्रात सध्या उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत असून राज्यभर तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठला आहे. मराठवाडा,