डिप्लोमा परीक्षेचा निकाल जाहीर, अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या थेट दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (MSBTE) तंत्रशिक्षण पदविका परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. यामुळे दहावीनंतर पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी (Engineering) आणि फार्मसी (Pharmacy) पदवी अभ्यासक्रमांच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.


निकाल लवकर जाहीर


MSBTE ने हे निकाल २४ जून रोजी जाहीर करण्याची घोषणा केली असली तरी, २० जून रोजीच संध्याकाळी निकाल प्रसिद्ध करण्यात आले. १८ ते २८ एप्रिल या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Exams) आणि २ ते २४ मे या कालावधीत उन्हाळी सत्र परीक्षा (Summer Session Exams) घेण्यात आली होती. विद्यार्थी गेल्या एका महिन्यापासून निकालाची वाट पाहत होते.



निकाल कसा पाहाल?


विद्यार्थी MSBTE च्या msbte.org.in या अधिकृत संकेतस्थळावर (website) जाऊन आपला नोंदणी क्रमांक (Enrollment Number) किंवा आसन क्रमांक (Seat Number) टाकून निकाल पाहू शकतात. तसेच, गुणपत्रिका (Marksheet) ऑनलाइन डाउनलोड करता येणार आहे.


अभियांत्रिकी आणि फार्मसी प्रवेशासाठी संधी


पॉलिटेक्निक (Polytechnic) विषयात पदविका मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण जागांच्या १० टक्के जागांवर अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांच्या पदवीच्या थेट दुसऱ्या वर्षाला 'लॅटर एण्ट्री'द्वारे (Lateral Entry) प्रवेश घेता येतो. अनेक विद्यार्थी हा पर्याय निवडण्याचा प्रयत्न करतात.


प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार


सध्या सीईटी कक्षाने (CET Cell) या थेट दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रिया अद्याप सुरू केलेली नाही, परंतु MSBTE ने निकाल जाहीर केल्यामुळे आता ही प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. ही प्रवेश प्रक्रिया गुणवत्तेवर (Merit) आधारित असेल.


उत्तीर्ण होण्यासाठी निकष


पदविका परीक्षा (प्रात्यक्षिक आणि लेखी) उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी परीक्षेसाठी १०० पैकी ४० गुण आणि प्रात्यक्षिक परीक्षांसाठी ५० पैकी २० गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असल्याचे MSBTE ने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Rajgad Accident : राजगडाच्या वाटेवर भीषण अपघात! पाबे घाटात मिनी बस २५ फूट दरीत कोसळली; दोन पर्यटकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पुणे : किल्ले राजगड (Rajgad Fort) येथे पर्यटनासाठी (Tourism) निघालेल्या मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांच्या मिनी बसचा (Mini Bus) पुणे

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या