Crude Oil News: आपल्याकडे तेल मुबलक प्रमाणात चिंतेचे कारण नाही - हरदीप सिंह पुरी

प्रतिनिधी: जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीकडे चाहूल लागताच त्यांचे पडसाद सगळ्या क्षेत्रात उमटू लागले आहेत. विशेषतः कच्चे तेल (Crude Oil) निर्देशांकात सकाळी १ ते २% वाढ झाल्याने तेलाच्या पुरवठ्याबाबत चिंतेचे वातावरण होते. विशेषतः इराणने तेल पुरवठा बंद करण्याची धमकी दिली होती. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय तेल मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी मोठे विधान केले आहे. 'जगातील सर्वात मोठ्या उर्जा पुरवठा क्षेत्रांमध्ये (मध्यपूर्वेतील) तणावाच्या पार्श्वभूमीवर कुठलीही चिंता करण्याचे कारण नाही कारण आपल्याकडे पुढील अनेक आठवडे चालेल इतके पुरेसे इंधन उपलब्ध आहे' असे विधान केले आहे. या विधानाने नागरिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.


हरदीप सिंह पुरी यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून ' आम्ही गेल्या दोन आठवड्यात मध्यपूर्वेतील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत ' असे संकेत दिले होते. यापुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की,' पंतप्रधान नरेंद्र मोदींजी यांच्या नेतृत्वा खाली आम्ही गेल्या काही वर्षांत तेलाचा पुरवठा मार्गच वळवला आहे. त्यामुळे आता तेलाचा पुरवठा थेट स्ट्रेट ऑफ होरमूझ' येथून होत नाही.याशिवाय व्यक्त होताना पुरी म्हणाले, 'आमच्या तेल विपणन (Oil Marketing) कंपन्यांकडे अनेक आठवड्यांचा पुरवठा असतो आणि त्यांना अनेक मार्गांनी ऊर्जा पुरवठा मिळत राहतो. आमच्या नागरिकांना इंधन पुरवठा स्थिर राहावा यासाठी आम्ही सर्व आवश्यक पावले उचलू ' असे म्हटले.


प्रसारमाध्यमांना सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्ट्रेट ऑफ होरमूझ एक आठवड्याहून अधिक वेळ बंद राहिल्यास तेल बाजारात मोठा व्यत्यय येऊन तेलाच्या किंमती भरमसाठ वाढू शकतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात तेलाच्या किंमती स्थिर होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. तसेच सुत्रांच्या माहितीनुसार, देशभरात तेलाच्या किंमतीत आटोक्यात ठेवण्यासाठी सरकार एक्ससाईज ड्युटीत देखील कपात करू शकते.


भारत जवळपास आपल्या गरजेच्या ८५% अधिक तेल आयात करतो. ज्यामध्ये नैसर्गिक तेलाचा अर्धा हिस्सा समावेश आहे. त्यातील अर्धा गॅस मध्यपूर्वेतून येतो तर ४०% हून अधिक तेलाची आयात मध्यपूर्वेतूनच होते. पेट्रोल व डिझेल रिफायनरीमध्ये लागणारे कच्चे तेल आपल्या देशात रशियाकडून येते. पारंपरिक व्यापारात रशिया स्वस्त दरात तेल देत असल्याने भारत त्यांचा मोठा ग्राहक आहे. सध्या ७७ डॉलर्सहून अधिक पातळी प्रति बॅरेलने गाठली असल्याने भारतीय बाजारात तेलाबाबत चिंता कायम दिसत आहे.

Comments
Add Comment

Ravi Pandit Passes Away : पुण्यातील नामांकित उद्योजक रवी पंडित यांचे निधन; आयटी क्षेत्रातील दूरदर्शी नेतृत्व हरपले...

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि KPIT Technologies चे संस्थापक व अध्यक्ष रवी पंडित यांचे आज (८ मे) पुण्यात निधन झाले. कंपनीने

Chief Minister Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केपीआयटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित यांना श्रद्धांजली

देशातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या पहिल्या फळीतील मार्गदर्शक उद्योजक हरपला मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या

Yuzi Chahal : युजवेंद्र चहलने वापरली ई - सिगरेट ; विमानातला 'तो' व्हिडिओ होतोयं व्हायरल...

आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्पयात आहे. हंगाम संपायला आता काही सामने बाकी आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून रोज

कौतुकास्पद ! पेपर विक्रेत्याच्या मुलीने मिळविले शंभर टक्के, शिकवणी न लावता श्रावणीने गाठले यशाचे शिखर

नाशिक :  मनात जिद्द असेल तर आयुष्यातील कठोर प्रसंगांवरही मात करता येते. याचाच प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. आर्थिक

नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’नंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर

‘पॉश’ कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य; कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले मुंबई : नाशिक येथील

मिरा भाईंदरमधील २५४ एकर जमिनीसाठी; राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार

मुंबई : मिरा भाईंदर येथील मिठागराची तब्बल २५४ एकर मोक्याची शासकीय जमीन एका खासगी कंपनीच्या घशात जाण्याची