CM Slams Abu Azmi: वारीवरून अबू आझमींचं वादग्रस्त विधान; फडणवीस म्हणाले, 'फालतू वक्तव्यांना उत्तर द्यायचं नाही!'

अबू आझमीच्या वादग्रस्त विधानांवर मुख्यमंत्र्यांची कठोर प्रतिक्रिया


नागपूर : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi Wari Controversy) यांनी वारी संदर्भात रविवारी वादग्रस्त विधान करत वातावरण तापवले. या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर प्रतिक्रिया दिली आहे. (Chief Minister Devendra Fadnavis)


नागपूरमधील मुख्यमंत्री सचिवालयातील हैदराबाद हाऊसमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते विकासासंदर्भात बैठक पार पडली. बैठकीनंतर पत्रकारांनी आझमींच्या विधानाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता त्यांनी सडेतोड उत्तर दिले.



काय म्हणाले मुख्यमंत्री?


वारीवरून अबू आझमी यांच्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अबू आझमी यांना वादग्रस्त विधान करण्याचा शौक आहे. अशा विधानांमुळेच त्यांना प्रसिद्धी मिळते, असं त्यांना वाटतं. पण मला त्यांची विधानं इतकी महत्त्वाची वाटत नाहीत की त्यावर उत्तर द्यावं. त्यामुळे त्यांच्या फालतू विधानाकडे दुर्लक्ष करतो."



आझमी यांच्या वक्तव्याची दखल अल्पसंख्याक आयोगाने घेतली 


महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान अबू आझमींना सेक्शन दहा प्रमाणे नोटीस बजावत कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच वेळ पडली तर आझमी यांना आयोगाच्या समोर हजर राहावे लागेल, असे म्हटले आहे. दोन समाजामध्ये तिढा निर्माण करणाऱ्या आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध अल्पसंख्याक आयोगाने केला आहे. त्यांच्या वारी संदर्भातल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात कुठे दंगल झाली, तर जवळच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये अबू आजमी यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला जाईल, असे प्यारे खान म्हणाले.

काय म्हणाले होते अबू आझमी?


अबू आझमी यांनी नमाज पठणामुळे होणाऱ्या गर्दीची तुलना वारीशी केली, ज्यात ते म्हंटले की, "आजपर्यंत कोणत्याही मुस्लिम व्यक्तीने रस्त्यावर उत्सव का साजरे होतात याची तक्रार केली नाही. पण ज्यावेळी मशीद पूर्ण भरते तेव्हा काही मशिदीतील लोकं 5 ते 10 मिनिटं रस्त्यावर नमाज पठण करतात, त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात रस्त्यावर नमाज पठण केलं तर पासपोर्ट रद्द करु. मी पुण्यातून येताना मला लोकांनी सांगितलं लवकर जाऊ अन्यथा पालख्यामुळे रस्ता जाम होईल. रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही. पण नमाजसाठी तक्रार होते असे अबू आझमी म्हणाले होते.

Comments
Add Comment

Nanded Suicide : स्टेटस ठेवलं अन् शिक्षकाची दोन मुलांसह आत्महत्या; पोलीस तपास सुरु

नांदेडमध्ये शिक्षकाची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या; व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे खळबळ नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातून

Jalgaon : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील उमाळा घाटात भीषण अपघात, दोन ठार, चार गंभीर

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर–जळगाव महामार्गावर (Chhatrapati Sambhajinagar–Jalgaon Highway) भीषण अपघात घडल्याची माहिती समोर

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले