रिक्षात चौथी सीट बसविली तर दहा हजार रुपये दंड नको !

डोंबिवली : शहरात रिक्षा प्रवासात चालकाने चौथी सीट बसविल्यास त्याला दहा हजार रुपये दंड आकराला जात आहे. आधीच हातावर पोट असणाऱ्या रिक्षाचालकांवर एवढा मोठी दंडरक्कम आकारून अन्याय होत आहे. रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन व रिक्षा चालक संघटना यांनी डोंबिवली वाहतूक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांची भेट घेऊन रिक्षात चौथी सीट बसविल्यास रिक्षाचालकाला तब्बल दहा हजार रुपयांचा दंङ अशी कारवाई नको अशी मागणी केली. याबाबत पोलिसांनी गंभीर्याने विचार करून कारवाई करू नये अशी पोलिसांना विनंती करून निवेदन देण्यात आले.

रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन अध्यक्ष (कोकण विभाग) प्रणव पेणकर यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली शहर अध्यक्ष महेश पाटील, विजय बाकडे, दत्ता वाठोरे, गजानन पाटील, प्रदीप ढवळे, समाधान पवार, शंकर यादव विलास चौधरी यांनी डोंबिवली वाहतुक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांची भेट घेतली.

यावेळी डोंबिवली शहरअध्यक्ष महेश पाटील म्हणाले, डोंबिवलीतील 80 टक्के नागरिक कामानिमित्त मुंबईला जातात. सायंकाळी परत डोंबिवलीत आल्यावर घरी जाणारे प्रवासी रिक्षा प्रमाण कमी असल्याने आणि वेळेत घर गाठायचे असल्याने चौथ्या सीटवर बसतात. मात्र रिक्षाचालकांना दंड भरावा लागतो. दंडाची रक्कम मोठी असल्याने दंङ भरणे शक्य होत नाही. डोंबिवलीतील अनेक रिक्षाचालक कर्जबाजारी आहेत.

रिक्षाचालक संघटना डोंबिवली अध्यक्ष राजा चव्हाण, सरचिटणीस भगवान मोरजकर, सचिव विजय गावकर यांनीही फ्रंट सीट प्रवासी घेणाऱ्या रिक्षाचालकाला दहा हजार रुपये दंड आकारला जात असल्याबद्दल प्रश्न विचारून आंदोलनाचा इशारा दिला आहे. याविषयी मोरजकर यांनी सांगितले की, वाहतूक विभागाने 66 व 192 कलमानुसार रिक्षाच्या फ्रंट सीट प्रवासी घेणाऱ्या रिक्षाचालकाला दहा हजार रुपये दंड आकारला आहे. हा दंड सर्वस्वी अमानुष आहे. रिक्षाचालक रोज रस्त्यावरच्या त्रासाला तोंड देत कसाबसा आपला व्यवसाय करत आहेत. ते म्हणाले कसेबसे मासिक उत्पन्न पोटापाण्यापुरते मिळवत आहेत. अशावेळी रिक्षा चालकाला दहा हजार रुपये दंड कसा पुरवडेल त्याचे जगणे मुश्किल होईल. आधीच दबगाईला आलेला व्यवसाय कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा शासन पुरवत नाही आणि म्हणून या दंडास आमचा कडकडून विरोध आहे. आपण रिक्षाचालकांच्या भवितव्याचा विचार करून लवकरात लवकर याबाबत काहीतरी चांगला मार्ग काढावा अशी मागणी केली आहे.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या