ठाणे-पालघरमध्ये बुलेट ट्रेनच्या उभारणीत ऐतिहासिक टप्पा

  53

साखरे गावात देशातील सर्वात जड बॉक्स गर्डर यशस्वीरीत्या बसवला


ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील कामांमध्ये एक ऐतिहासिक टप्पा गाठण्यात आला आहे. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील साखरे गावात ४० मीटर लांबीचा पूर्ण लांबीचा प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट (PSC) बॉक्स गर्डर यशस्वीरित्या बसवला आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचा पहिलाच गर्डर बसवण्यात आल्याने हा क्षण अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.


हा गर्डर ९७० मेट्रिक टन वजनाचा असून त्यासाठी ३९० घनमीटर काँक्रीट आणि ४२ मेट्रिक टन स्टील वापरण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे गर्डर्स कोणतेही सांधे न ठेवता, एकसंध स्वरूपात बनवले जातात. प्रकल्पात या प्रकारचे गर्डर्स वापरणे हे कामाच्या जलद गतीसाठी उपयुक्त ठरत असून ते सेग्मेंटल गर्डर्सच्या तुलनेत दहा पट जलद काम पूर्ण करतात. ठाणे ते पालघरपर्यंत बुलेट ट्रेनसाठी उभारण्यात येणाऱ्या उंचावरील मार्गिका (व्हायाडक्ट), डोंगरी बोगदे, विशेष मातीच्या संरचना आणि स्थानकांच्या कामांमध्ये सातत्याने प्रगती होत आहे. शिळफाटा ते झरळी (महाराष्ट्र-गुजरात सीमा) दरम्यान १३५ किमी लांबीच्या उंचावरील मार्गिकेचा समावेश असून यामध्ये १०३ किमी लांबीचा व्हायाडक्ट, २.३ किमी लांबीचे स्टील पूल, १.३ किमी स्थानक परिसर आणि ११ किमी बोगदे व मातीची संरचना यांचा समावेश आहे.


या प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात अनेक कास्टिंग यार्ड्स कार्यान्वित असून गर्डर्सची निर्मिती, साठवणूक व बसवणी तंत्रज्ञानयुक्त स्वदेशी यंत्रसामग्रीच्या सहाय्याने करण्यात येते. अलीकडेच विरार व बोईसर स्थानकांवरील पहिल्या स्लॅबच्या कास्टिंगचे कामही पूर्ण झाले असून, ठाणे-पालघर विभागातून बुलेट ट्रेन प्रकल्पात यशस्वी गतीने पुढे वाटचाल होत आहे.

Comments
Add Comment

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केले ‘लाडकी सून’ अभियान

ठाणे: 'लाडकी बहीण' योजनेच्या यशामुळे उत्साहित होऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी

भिवंडीत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आला स्पायडरमॅन !

ठाणे : भिवंडीत भाजी मार्केटमध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी चक्क स्पायडरमॅन आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर