कल्याणच्या स्कायवॉकवर घाणीचे साम्राज्य

डोंबिवली : कल्याण पूर्वेकडे असलेल्या सिद्धार्थ नगरकडून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या स्कायवॉकवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त आहे. दरम्यान जागरूक नेटकऱ्यांनी स्कायवॉकवर पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याचा व्हीडियो समाज माध्यमांवर प्रसारित केला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने स्कायवॉकवर कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे.

या स्कायवॉकवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे पादचारी, रेल्वे प्रवासी, बाजारहाट करण्यासाठी ये-जा करणाऱ्या गृहिणींना नाक मुठीत धरून चालावे लागते. चोहोबाजूंनी थुंकलेल्या भिंती, कोपऱ्या-कोपऱ्यात कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि प्रचंड घाण, याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. स्वच्छ भारत अभियानाची खिल्ली उडविणाऱ्या या स्कायवॉककडे सपशेल दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. महापालिकेला स्वच्छता कर, तर रेल्वे प्रशासनाला प्रवासाचे शुल्क भरूनही कुणालाही स्वच्छतेची जबाबदारी घ्यायची नाही. नेहमीप्रमाणे या भागाची जबाबदारी झटकणाऱ्या संस्था एकमेकांकडे बोट दाखवणार आणि जनतेच्या सहनशीलतेचा फायदा घेत मोकळ्या होणार. दरम्यान प्रशासन जर हात झटकून मोकळे होणार असेल, तर करसंकलन बंद करावे आणि नागरिकांनी स्वतः झाडू घेऊन स्वच्छता करावी का? असा सवाल रेल्वे प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

 
Comments
Add Comment

Thane News : ठाणे हादरलं! 'जीवंत सोडणार नाही' धमकी दिली अन् १७ वर्षीय मुलाने मैत्रिणीला... बंद घरात नेमकं काय घडलं?

ठाणे : प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाने आपल्या १७ वर्षीय मैत्रिणीला पेटवून दिल्याचा अत्यंत

आपला दवाखान्यातील डॉक्टर आणि कर्मचारी यांचा पगार ठाणे महापालिका बॅंक गॅरंटीतून देणार

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आरोग्य विभागाला निर्देश ठाणे : आपला दवाखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड

ठाण्यात वाघीण मैदानात! चित्रा वाघ ॲक्शन मोडवर; वाघ यांच्या एन्ट्रीने अनेकांची धाकधूक वाढली!

कळवा: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज

नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त ठाणे  : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा

सुजाता मडके या शहापूरच्या कन्येची ‘इस्रो’मध्ये थरारक झेप

ठाणे : ‘यशाला शॉर्टकट नसतो, पण जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास असेल तर अवकाशातही भरारी घेता येते,’ या शब्दात

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त

ठाणे (वार्ताहर) : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह