कल्याणच्या स्कायवॉकवर घाणीचे साम्राज्य

डोंबिवली : कल्याण पूर्वेकडे असलेल्या सिद्धार्थ नगरकडून रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या स्कायवॉकवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त आहे. दरम्यान जागरूक नेटकऱ्यांनी स्कायवॉकवर पसरलेल्या घाणीच्या साम्राज्याचा व्हीडियो समाज माध्यमांवर प्रसारित केला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने स्कायवॉकवर कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे.

या स्कायवॉकवरून पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे पादचारी, रेल्वे प्रवासी, बाजारहाट करण्यासाठी ये-जा करणाऱ्या गृहिणींना नाक मुठीत धरून चालावे लागते. चोहोबाजूंनी थुंकलेल्या भिंती, कोपऱ्या-कोपऱ्यात कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि प्रचंड घाण, याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. स्वच्छ भारत अभियानाची खिल्ली उडविणाऱ्या या स्कायवॉककडे सपशेल दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. महापालिकेला स्वच्छता कर, तर रेल्वे प्रशासनाला प्रवासाचे शुल्क भरूनही कुणालाही स्वच्छतेची जबाबदारी घ्यायची नाही. नेहमीप्रमाणे या भागाची जबाबदारी झटकणाऱ्या संस्था एकमेकांकडे बोट दाखवणार आणि जनतेच्या सहनशीलतेचा फायदा घेत मोकळ्या होणार. दरम्यान प्रशासन जर हात झटकून मोकळे होणार असेल, तर करसंकलन बंद करावे आणि नागरिकांनी स्वतः झाडू घेऊन स्वच्छता करावी का? असा सवाल रेल्वे प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

 
Comments
Add Comment

Kalyan Crime News : धक्का लागला अन्...हिंदी-मराठी' वाद जीवावर! ४-५ जणांकडून कल्याणच्या अर्णव खैरेला बेदम मारहाण, घरी येऊन जीवन संपवलं

कल्याण : कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या

ठाणे रुग्णालयाच्या पाडकामात आढळली शेकडो वर्षे दडलेली शिल्पकला

कोरीव प्रतिमा असलेल्या प्राचीन शिल्पांनी सर्वसामान्यांत उत्सुकता ठाणे : इतिहासाच्या पाऊलखुणा आजही जुन्या

बदलापूर काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

बदलापूर  : ''माझ्या नेत्याला जर कोणत्या पदावरून राजीनामा द्यावा लागत असेल, तर त्यांच्या सन्मानार्थ मीसुद्धा

ये पब्लिक है, सब जानती है!

केडीएमसीच्या महापौरपदावर खा. श्रीकांत शिंदे यांचे उत्तर कल्याण  : ''ये पब्लिक है, सब जानती है. कुणीही काहीही बोलो,

ठाणे-बोरिवली भूमिगत रस्त्याच्या कामासाठी सहा महिने वाहतुकीत बदल

ठाणे : ठाणे-बोरिवली दुहेरी भुयारी मार्गाच्या निर्माणाचे काम सध्या घोडबंदर येथील मुल्लाबाग भागात सुरू झाले आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेचे इलेक्शन गणित ठरले! ९५ पैकी ४८ जागांवर महिलांना संधी

ओबीसीच्या २५ जागा; 'या' प्रभागांत दोन महिला नगरसेविका निवडल्या जाणार भाईंदर: मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी