मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकरांच्या नियुक्तीनं राजकीय खळबळ

  104

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची मुंबै जिल्हा बँकेच्या संचालक पदावर नियुक्ती होताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे त्या भाजपामध्ये प्रवेश करणार का, यावर जोरदार चर्चा रंगू लागली आहे.



घोसाळकर यांचे पती, माजी संचालक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांची पत्नी तेजस्वी यांना संचालक म्हणून नेमण्यात आले आहे. हा निर्णय "सद्भावनेतून" घेतल्याचा दावा बँकेचे अध्यक्ष आणि भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी केला असला, तरी ही नियुक्ती ठाकरे गटासाठी धक्का मानली जात आहे.


दरम्यान, तेजस्वी यांचे भाजपामध्ये जाणे जवळपास ठरलेले असल्याची चर्चा आधीच सुरू होती. गेल्या वर्षभरापासून त्या संचालकपदासाठी प्रयत्नशील होत्या, आणि अखेर कालच्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.


प्रवीण दरेकर यांनी या नियुक्तीचे समर्थन करताना शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकेची झोड उठवली. "मराठी मतदार आमच्यासोबत आहे, तो पाकिस्तानी नाही," असे सांगत त्यांनी ठाकरेंच्या ‘मराठी माणसाच्या मतांवर’च्या दाव्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.


दरेकर पुढे म्हणाले, "बाळासाहेबांचे खरे वारस आम्ही आहोत. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या विचारांना तिलांजली दिली. त्यांचा ब्रँड आज एकनाथ शिंदेंकडे आहे."


दरम्यान, या नेमणुकीने राजकारणातील नवीन समीकरणांची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे गटातून माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर या भाजपात जाणार हे निश्चित झाले असून आता त्यांचे सासरे विनोद घोसाळकर हे काय निर्णय घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

मतदार यादीतून माझे नाव गायब होऊ शकते तर..., तेजस्वी यादवच्या या आरोपावर निवडणूक आयोगाचे आले स्पष्टीकरण

पाटणा : बिहारच्या मतदार यादीतून तेजस्वी यादव यांचे नाव वगळण्यात आलेले नाही. पाटणा जिल्हा प्रशासनाने तेजस्वी

शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, 'या' मुद्यावर झाली सविस्तर चर्चा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी राज्याचे

यवतमाळमध्ये उबाठाला खिंडार, शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा ओघ सुरुच

ठाणे : शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा ओघ सुरुच असून यवतमाळमधील नेर नगपालिकेच्या तीन माजी नगराध्यक्षांसह पाच

Malegaon bomb blast case: जर कोणी दोषी नसेल, तर सहा जणांना कोणी मारलं?: ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सवाल!

मुंबई: २००८ मध्ये घडलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे

काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आता भाजपवासी

मुंबई : जालना जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि तीन टर्मचे आमदार आणि सध्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी

सत्य परेशान हो सकता है पर पराजित नहीं…!

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आला. तब्बल १७ वर्षांनंतर विशेष NIA न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष