भारताची भूमिगत एलपीजी साठा यंत्रणा सज्ज

नवी दिल्ली : भारताने मंगळुरू येथे एलपीजीचा साठा युद्धकाळातही सुरक्षित ठेवण्यासाठी एक भूमिगत यंत्रणा उभारली आहे. या यंत्रणेमुळे देशाचा ८० हजार मेट्रिक टन एलपीजी साठा जमिनीखाली सुरक्षित राहू शकेल. जगात अस्तित्वात असलेल्या अनेक घातक बॉम्बपासून हा साठा सुरक्षित राहणार आहे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडने (एमईआयएल) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी (एचपीसीएल) ही यंत्रणा विकसित केली आहे. भारताच्या पेट्रोलियम साठ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी सुरू असलेल्या उपायांपैकी हा एक धोरणात्मक उपाय आहे.

भारतातील ही दुसरी एलपीजीची भूमिगत साठवणूक यंत्रणा आहे. याआधी विशाखापट्टणम येथे ६० हजार मेट्रिक टन द्रवरुप इंधन साठा जमिनीखाली सुरक्षित राहू शकेल अशी यंत्रणा विससित करण्यात आली आहे. विशाखापट्टणम आणि मंगळुरू या दोन ठिकाणी विकसित केलेल्या भूमिगत साठवणूक यंत्रणेमुळे भारत १४० हजार मेट्रिक टन द्रवरुप इंधन साठा जमिनीखाली सुरक्षित ठेवू शकेल.

विशाखापट्टणम येथे दोन स्वतंत्र साठवणूक क्षमता मिळून ६० हजार मेट्रिक टन द्रवरुप इंधन साठा जमिनीखाली सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. सरकार आवश्यकतेनुसार विशाखापट्टणम येथे एलपीजी ऐवजी ४० हजार मेट्रिक टन प्रोपेन आणि ६० हजार मेट्रिक टन ब्युटेन जमिनीखाली साठवून ठेवू शकते.

मंगळुरू येथे समुद्रसपाटीपासून सरासरी १४१ मीटर खाली असलेल्या ग्रॅनाइटिक गनीस खडकात खोलवर कोरुन साठवणूक यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे भूजलाचा दाब एलपीजीला खडकांच्या चेंबरमध्ये सुरक्षितपणे सीलबंद ठेवण्यास मदत करेल. शाफ्ट १६४.५ मीटर पर्यंत पसरतो, ज्यामुळे गॅस साठवण्यासाठी तसेच गॅसची वाहतूक करण्यासाठी एक सुरक्षित यंत्रणा उपलब्ध होते. हे बांधकाम ड्रिल-अँड-ब्लास्ट पद्धतीने केले गेले. यासाठी उच्च-स्तरिय भूगर्भीय मूल्यांकन आणि अचूक अभियांत्रिकी कौशल्य यांचा वापर झाला आहे. जमिनीखाली असलेला कचरा काढून टाकण्यासाठी आणि साठवणूक यंत्रणेपर्यंत प्रवेश सुकर व्हावा याकरिता १.१ किलोमीटरचा प्रवेश बोगदा तयार करण्यात आला आहे. मंगळुरू येथील प्रकल्पासाठी आठशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला.

Comments
Add Comment

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या