चला... विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला!

  61

पालघर: आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाण्याकरिता एसटी प्रशासनाकडून राज्यात सर्वत्र विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील आठ आगारांमधून सुद्धा ५५ बस पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पालघर जिल्ह्यातील नागरिकांना भाविकांना सुलभतेने पंढरपूरला जाता यावे याकरिता पालघर विभागाच्या आठही आगारातून विशेष ५५ बसेस पंढरपूरला सोडण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.


एखाद्या गाव वाड्यातून एकत्रित बुकिंग असेल तर थेट गावातूनच पंढरपूरला बस सोडण्यात येणार आहेत. ६ जुलै रोजी राज्यात सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त भाविक मोठ्या संख्येने पंढरपूर येथे दर्शनाकरिता जात असतात. पंढरपूरला जाण्याकरिता एसटी प्रशासनाकडून दरवर्षी जादा बसेसची सोय उपलब्ध करून देण्यात येते.


पालघर जिल्ह्यातील पालघर, सफाळा, वसई, अर्नाळा, डहाणू, जव्हार, बोईसर व नालासोपारा या आगारांमधून पंढरपूरकरिता बसचे नियोजन करण्यात आले आहे. एसटी बसमध्ये महिला, वयोवृद्ध व अपंग यांना सवलतीच्या दरात तिकीट आकारण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना

आठ पंचायत समित्यांचीही अधिसूचना प्रसिद्ध पालघर : पालघर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या

वसईत विद्यार्थ्याच्या अंगावर खांब कोसळला; सुदैवाने जीव वाचला, घटना सीसीटीव्हीत कैद

वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना

माजी आयुक्तांसह चौघांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात ६ दिवसाच्या 'ईडी' कोठडीत असलेले पालिकेचे

विरार, वसई, नालासोपारामधील अनेक भाग पाण्याखाली, पाऊस अजूनही कायम, रेड अलर्ट जारी

मुसळधार पावसाने वसई, विरार, नालासोपारा परिसराला झोडपून काढलं आहे. गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस या भागात

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,

लिपी आधी मरते, मग भाषा: दीपक पवार

वसई : "भाषा नंतर मरते, पण लिपी आधी मरते. तिच्या नियमित वापराची आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. माणसं, झाडं