कोकणात दरडप्रवण गावांच्या संख्येत मोठी वाढ; रायगड ३९२, रत्नागिरी १८१, सिंधुदूर्ग ६३ दरडप्रवण गावे

  26

रायगड : कोकणात दरड प्रवण गावांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भुवैज्ञानिकांनी केलेल्या पाहणीनंतर ही बाब समोर आली असून, आपत्ती व्यवस्थापन विभागाने नुकतीच संभाव्य दरड प्रवण गावांची यादी प्रसिध्द केली आहे. रायगड मधील ३९२, रत्नागिरी मधील १८१ तर सिंधुदुर्ग मधील ६३ गावांचा यात समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दरडप्रवण गावांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात या गावांना सतर्कता बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.


रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षीपर्यंत १८३ दरडप्रवण गावे होती. मात्र इरशाळवाडी दरड दुर्घटनेतील ८४ जणांच्या मृत्यूनंतर डोंगर माथ्यांवरील दरडप्रवण गावांचे फेरसर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानंतर दरड प्रवण गावांच्या संख्येत जवळपास दुपटीने वाढ झाली असल्याची बाब समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील दरड प्रवण गावांची संख्या १८३ वरून ३९२ वर गेली आहे. यात पोलादपूर तालुक्यातील सर्वाधिक १४० गावांचा समावेश आहे. ज्यातील ७१ गावे ही अतिधोकादायक दरडप्रवण गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत.


रायगड जिल्ह्यात यापुर्वी दरड दुर्घटनांच्या ११ मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. यात जुई, दासगाव, रोहण, कोंडीवते. कोतवाल, केवनाळे, साखर सुतारवाडी, तळीये आणि इरशाळवाडी येथील घटनांचा समावेश आहे. २००५, २०२१,२०२३ मध्ये मोठ्या दरड दुर्घटना घडल्या जात मोठी जिवित हानी आणि वित्त हानी झाली. या घटनांची गंभीर दखल घेऊन भूवैज्ञानिकांकडून संभाव्य दरड प्रवण गावांचे फेर सर्वेक्षण करण्यात आले ज्यात कोकणातील तीनही जिल्ह्यात दरडप्रवण गावांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.


दरड प्रवण गावात उपाय योजना


दरड प्रवण गावांचे पाच श्रेणीमध्ये वर्गीकरण केले आहे. त्यातील अतिधोकादायक गावात ‘पीए सिस्टम’ म्हणजे सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली बसविण्यात आली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षातून एकाच वेळी २१ ठिकाणी हवामान विषयक पूर्व सूचना देण्यात येतील. लाईव्ह अथवा रेकॉर्डेड संदेश देता येईल. या ठिकाणी सायरन वाजविला जाणार आहे. – सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रायगड.

Comments
Add Comment

कोल्हापूरच्या स्मशानभूमीत भानामतीचा भयंकर प्रकार, सीसीटीव्ही फुटेजमुळे उडाली खळबळ 

कोल्हापुर: राज्यातील जयसिंगपूरमधील उदगाव वैकुंठधाम स्मानभूमीत दिवसाढवळ्या भानामतीचा भयंकर प्रकार उघडकीस आला

Maharashtra Startup : महाराष्ट्रातील 'AI' स्टार्टअप्सना आता गुगलचे बळ मिळणार - मंगलप्रभात लोढा

मुंबई : महाराष्ट्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय स्टार्टअप्सना माहिती क्षेत्रातील जागतिक कंपनी गुगलचे बळ

हिंदी भाषा सक्तीला बळी पडू नका, डोंबिवलीतील शाळांना मनसेचे पत्र

डोंबिवली : देशातील इतर राज्यात शाळांमध्ये हिंदी भाषा शक्ती नसताना महाराष्ट्रातच शाळांमध्ये हिंदी भाषा सक्ती का?

वारकऱ्यांच्या सेवेसाठी फिरता दवाखाना, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : विठू नामाच्या गजरात,  ज्ञानोबाची पालखी खांद्यावर घेऊन अभंग गात, वारकरी भक्तीमध्ये भगवंताच्या नामस्मरणात

पर्यटनाच्या नावाखाली गांजाची तस्करी, २५ कोटींचा गांजा जप्त...

मुंबई : भारतात गेल्या काही महिन्यांपासून गांजा विकण्याचं प्रमाण वाढतं चाललेलं आहे.  छत्रपती शिवाजी महाराज

पावसाळ्यात दरड कोसळण्याची शक्यता, संंरक्षित भिंतीसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद...

मुंबई : मुंबईतील अनेक भागात झोपड्या उभ्या आहेत. पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना वारंवर घडत असतात.  त्यात अनेक