उद्धव यांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी असे दिले उत्तर

जळगाव : मराठी माणसांची युती होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी गुरुवारी घेतलेल्या सभेतून केली. या टीकेबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी मार्मिक शब्दात उत्तर दिले. बोल बच्चनना मी उत्तरे देत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री जळगाव येथे सार्वजनिक कार्यक्रमांसाठी म्हणून आले होते. या प्रसंगी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना उद्धव यांच्या भाषणाचा संदर्भ देत प्रश्न विचारले. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांना मार्मिक उत्तर दिले. यानंतर मुख्यमंत्री इतर विषयांवर विस्तर बोलले.

नेमके काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

मुंबईत गुरुवार १९ जून रोजी घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे तिकडे गाठीभेटी घेत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.



काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?

उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारली. यावेळी बोलताना, बोल बच्चनना मी उत्तरे देत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आमदार एकनाथ खडसे कार्यक्रमाला येणार का, या प्रश्नावर माहिती नाही, असे मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.
Comments
Add Comment

अजितदादा पवार यांच्या कार्याला आणि त्यांच्या अविरत परिश्रमांना जनतेने कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली आदरांजली

 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची प्रतिक्रिया मुंबई :

Dada Bhuse : 'परीक्षा ही सुंदर प्रवासाची सुरुवात; आत्मविश्वासाने सामोरे जा', मा.शिक्षण मंत्री श्री .दादाजी भुसे यांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि

LIVE : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मतमोजणी सुरू, बघा कोण आघाडीवर ?

मुंबई : महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारी रोजी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या स्वीकारणार पदभार

मंत्रिमंडळ बैठकीला लावणार हजेरी; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयालाही भेट देणार मुंबई : दिवंगत

ICC T20 World Cup 2026 : भारत-पाक मॅच होणार? ICCने एका झटक्यात विषय संपवला अन्...

दुबई : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ (ICC T20 World Cup 2026) मधील सर्वात बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना अवघ्या सहा दिवसांवर

त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात नरेंद्र जाधव समितीकडून सरकारला अहवाल सादर

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या समितीनं आज