SBI Report : CRR रेशोत कपात केल्यामुळे मिळणार अर्थव्यवस्थेत चालना कर्जपुरवठा 'इतक्या' टक्क्याने वाढणार - एसबीआयचा अहवाल

  42

प्रतिनिधी: नुकताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दर (Repo Rate) व कॅश रिझर्व्ह रेशो (Cash Reserve Ratio CRR) मध्ये कपात केली होती. वित्तीय पतधोरण समितीचा (Monetary Policy) हा निर्णय गर्व्हनर संजय मल्हो त्रा यांनी जाहीर केला होता. त्यामुळे सीआरआर (CRR) मध्ये घट केल्याने अर्थव्यवस्थेतील कर्जपुरवठा (Credit) मध्ये १.४ ते १.५% वाढ होणार असल्याचा अहवाल स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रसिद्ध केला आहे. पतपुरवठा सुधारल्याने एक प्रकारे अर्थव्यवस्थेतील तरलता (Liquidity) वाढण्यास मदत होणार असल्याचे या एसबीआय अहवालात म्हटले गेले आहे.

'सीआरआर दर कपात केल्याने कर्जदेय संसाधन पुरवण्यात वाढ होणार आहे. ज्यामुळे कर्ज वितरणात याचा फायदा होऊन अतिरिक्त १.४ ते १.५ क्रेडिट वाढेल 'असे निरिक्षण या अहवालात व्यक्त केले गेले. यापूर्वी सेंट्रल बँकेने रेपो दरात ०.५०% बीपीएस बेसिसने कपात केल्याने रेपो दरात ६ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर पोहोचले होते. तर सीआरआर दर १% कमी केल्याने ३% झाला होता.'

याशिवाय सीआरआर घटला म्हणून याचा संबंध कर्जपुरवठ्यातील दरात (Lending Rates) अथवा ठेवी (Deposits) यांच्या बदलातील नसून हा बँकेच्या नफ्यात वाढ करणारा ठरणार आहे. ज्यामुळे बँकेच्या नेट इंटरेस्ट मार्जिन (Net Inte rest Margin NIM) मध्ये ३ ते ५ पूर्णांक बेसिसने वाढ होईल असे अहवालात म्हटले गेले आहे. अहवालातील माहितीनुसार, या दर कपातीमुळे तरलता वाढून बँकाना मुबलक कर्ज पुरवठा करण्यात मदत होणार आहे त्यामुळे बँकेच्या कोस्ट फंडिग (Cost Funding) मध्ये घट होत तरलताही निर्माण होईल.

एसबीआय रिपोर्टनुसार,कर्ज वाढीला १.४ ते १.५ टक्क्यांनी चालना देण्यासाठीच नाही तर आरबीआय रोख राखीव दर (CRR) हा तरलता व्यवस्थापनासाठी केवळ उपयुक्तच नाही तर बाजारातील पुरवठ्याचे नियमन, कालावधी चक्र (Peri od Cycle) यामध्ये सुसुत्रता आणण्यास कामी येईल.बाजारातील सीआरआर हा विशेषतः टर्म मनी मार्केट (Money Market) नियंत्रित करण्यासाठी कामी येऊ शकतो. आरबीआयच्या निर्देशांनतर या दरांची सुसत्रता बाजारात एकत्रित परिणाम दाखवू शकते असे निरिक्षण अहवालात दर्शविले गेले आहे.
Comments
Add Comment

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

Vastu Tips: कात्री वापरताना 'या' चुका टाळा, नाहीतर घरात येईल नकारात्मकता आणि गरिबी!

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरात प्रत्येक वस्तू ठेवण्याचं आणि वापरण्याचं एक योग्य स्थान आणि पद्धत असते. जर या

स्वातंत्र्यदिनी युक्रेनचा रशियाच्या अण्वस्त्र प्रकल्पावर ड्रोन हल्ला; मोठा स्फोट होऊन आग

मॉस्को: युक्रेनने रशियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर पुन्हा एकदा मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्य

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

E-buses in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच एसटीच्या ताफ्यात ई-बसेस

रत्नागिरी: एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा एसटी

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं