Amit Shah : गृहमंत्री शहांचा हल्लाबोल! देशात इंग्रजी बोलणाऱ्यांना स्वतःची लाज वाटेल...

नवी दिल्ली : भारतीय भाषा या देशाच्या आत्म्याचे आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहेत. भारतीय भाषा ही आपली ओळख आहे त्याचा अभिमान बाळगावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. लवकरच इंग्रजीतून संवाद साधणाऱ्यांना स्वतःची लाज वाटेल असा समाज तयार होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. माजी आयएएस अधिकारी आशुतोष अग्निहोत्री यांच्या ‘मैं बूंद स्वयं, खुद सागर हूं’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी अमित शाह बोलत होते. या वेळी त्यांनी भारतीय भाषांचे महत्त्व अधोरेखित केले आणि इंग्रजी भाषेवरील अवलंबित्वावर जोरदार टीका केली. आपण आपल्या भाषिक वारशाचा अभिमान बाळगण्याची आणि त्याचा जागतिक स्तरावर गौरव करण्याची वेळ आली आहे असं अमित शाह म्हणाले. तसेच इंग्रजीवर अवलंबित्व असलेल्यांवर त्यांनी टीका केली.



 

इंग्रजी बोलणाऱ्यांना स्वतःची लाज वाटेल


अमित शाह म्हणाले की, "भारतीय भाषा ही आपली खरी ओळख आहे. लवकरच असा समाज निर्माण होईल ज्यामध्ये इंग्रजी बोलणाऱ्यांना त्यांची स्वतःची लाज वाटेल. ज्यांना वाटते की हा बदल शक्य नाही, त्यांनी लक्षात घ्यावे की बदल दृढनिश्चयी लोकच घडवतात. आपल्या भाषा म्हणजे आपल्या संस्कृतीची शान आहे."

'पंच प्राण' भारताच्या अमृतकालाचे संकल्प


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या 'पंच प्राण' संकल्पांचा उल्लेख करत शहा म्हणाले की, हे १३० कोटी भारतीयांचे ध्येय बनले पाहिजे. या ५ संकल्पांद्वारे २०४७ पर्यंत भारत जगात सर्वोच्च स्थानावर पोहोचेल आणि त्या प्रवासात भाषांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल.

विकसित भारताचे स्वप्न


गुलामगिरीच्या मानसिकतेपासून मुक्ती

आपल्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान

राष्ट्रीय एकता व अखंडतेबद्दल समर्पण

प्रत्येक नागरिकामध्ये कर्तव्यभावना

English Language : भारत समजून घेण्यासाठी इंग्रजी अपुरी


परदेशी भाषा भारत समजून घेण्यासाठी अपुरी आहे असं म्हणत अमित शाहांनी इंग्रजी आणि इतर परदेशी भाषांवर टीका केली. परदेशी भाषा या भारताच्या इतिहास, संस्कृती आणि धार्मिक परंपरा समजून घेण्यासाठी पुरेशा नाहीत असं अमित शाह म्हणाले. अर्धवट परदेशी भाषांद्वारे भारत कधीच समजला जाऊ शकत नाही. ही लढाई सोपी नाही, पण मला विश्वास आहे की आपण ती जिंकू. आपण आपल्या भाषांमध्ये देश चालवू आणि जगाचे नेतृत्वही करू असा आत्मविश्वास अमित शाहांनी व्यक्त केला.
Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने