Amit Shah : गृहमंत्री शहांचा हल्लाबोल! देशात इंग्रजी बोलणाऱ्यांना स्वतःची लाज वाटेल...

  56

नवी दिल्ली : भारतीय भाषा या देशाच्या आत्म्याचे आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहेत. भारतीय भाषा ही आपली ओळख आहे त्याचा अभिमान बाळगावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. लवकरच इंग्रजीतून संवाद साधणाऱ्यांना स्वतःची लाज वाटेल असा समाज तयार होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. माजी आयएएस अधिकारी आशुतोष अग्निहोत्री यांच्या ‘मैं बूंद स्वयं, खुद सागर हूं’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी अमित शाह बोलत होते. या वेळी त्यांनी भारतीय भाषांचे महत्त्व अधोरेखित केले आणि इंग्रजी भाषेवरील अवलंबित्वावर जोरदार टीका केली. आपण आपल्या भाषिक वारशाचा अभिमान बाळगण्याची आणि त्याचा जागतिक स्तरावर गौरव करण्याची वेळ आली आहे असं अमित शाह म्हणाले. तसेच इंग्रजीवर अवलंबित्व असलेल्यांवर त्यांनी टीका केली.



 

इंग्रजी बोलणाऱ्यांना स्वतःची लाज वाटेल


अमित शाह म्हणाले की, "भारतीय भाषा ही आपली खरी ओळख आहे. लवकरच असा समाज निर्माण होईल ज्यामध्ये इंग्रजी बोलणाऱ्यांना त्यांची स्वतःची लाज वाटेल. ज्यांना वाटते की हा बदल शक्य नाही, त्यांनी लक्षात घ्यावे की बदल दृढनिश्चयी लोकच घडवतात. आपल्या भाषा म्हणजे आपल्या संस्कृतीची शान आहे."

'पंच प्राण' भारताच्या अमृतकालाचे संकल्प


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या 'पंच प्राण' संकल्पांचा उल्लेख करत शहा म्हणाले की, हे १३० कोटी भारतीयांचे ध्येय बनले पाहिजे. या ५ संकल्पांद्वारे २०४७ पर्यंत भारत जगात सर्वोच्च स्थानावर पोहोचेल आणि त्या प्रवासात भाषांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल.

विकसित भारताचे स्वप्न


गुलामगिरीच्या मानसिकतेपासून मुक्ती

आपल्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान

राष्ट्रीय एकता व अखंडतेबद्दल समर्पण

प्रत्येक नागरिकामध्ये कर्तव्यभावना

English Language : भारत समजून घेण्यासाठी इंग्रजी अपुरी


परदेशी भाषा भारत समजून घेण्यासाठी अपुरी आहे असं म्हणत अमित शाहांनी इंग्रजी आणि इतर परदेशी भाषांवर टीका केली. परदेशी भाषा या भारताच्या इतिहास, संस्कृती आणि धार्मिक परंपरा समजून घेण्यासाठी पुरेशा नाहीत असं अमित शाह म्हणाले. अर्धवट परदेशी भाषांद्वारे भारत कधीच समजला जाऊ शकत नाही. ही लढाई सोपी नाही, पण मला विश्वास आहे की आपण ती जिंकू. आपण आपल्या भाषांमध्ये देश चालवू आणि जगाचे नेतृत्वही करू असा आत्मविश्वास अमित शाहांनी व्यक्त केला.
Comments
Add Comment

Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाचा ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी अमेरिकेला पाठणार

अहमदाबाद: एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासासाठी अमेरिकेला पाठवला जाऊ शकतो. अपघातग्रस्त

विमान अपघात, असे सुरू आहे DNA द्वारे मृतांची ओळख पटवण्याचे काम

अहमदाबाद : एअर इंडियाच्या AI 171 या अहमदाबाद - लंडन विमानाला अपघात झाला. या अपघातात विमानातील २४२ जणांपैकी २४१ जणांचा

Air India To Cut Flights : विमान अपघातानंतर एअर इंडियाने १५% आंतरराष्ट्रीय उड्डाणे केली कमी!

नवी दिल्ली : अहमदाबादमध्ये ड्रीमलायनर विमानाच्या अपघातानंतर आणि इराण-इस्रायल संघर्ष सुरू असल्याने, एअर

इराणमध्ये अडकलेल्या ११० भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या आणले, आर्मेनियाच्या रस्त्याने दिल्लीला पोहोचले

नवी दिल्ली: इराणमध्ये अडकलेले ११० भारतीय विद्यार्थी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले

केदारनाथच्या मार्गावर अपघात, दोघांचा मृत्यू

रुद्रप्रयाग : उत्तराखंडमधील रुद्रप्रयागमध्ये केदारनाथ धामला जाणाऱ्या ट्रेक मार्गावर भूस्खलन झाले. भूस्खलन

भारतीय अंतराळवीर २२ जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने रवाना होणार

नवी दिल्ली : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणारे अ‍ॅक्सिओम-४ मिशन