नवी दिल्ली : लंडन येथे सुरू असलेल्या FIDE वर्ल्ड रॅपिड अँड ब्लिट्झ टीम चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने कमाल केली. दिव्याने ...
इंग्रजी बोलणाऱ्यांना स्वतःची लाज वाटेल
अमित शाह म्हणाले की, "भारतीय भाषा ही आपली खरी ओळख आहे. लवकरच असा समाज निर्माण होईल ज्यामध्ये इंग्रजी बोलणाऱ्यांना त्यांची स्वतःची लाज वाटेल. ज्यांना वाटते की हा बदल शक्य नाही, त्यांनी लक्षात घ्यावे की बदल दृढनिश्चयी लोकच घडवतात. आपल्या भाषा म्हणजे आपल्या संस्कृतीची शान आहे."
'पंच प्राण' भारताच्या अमृतकालाचे संकल्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या 'पंच प्राण' संकल्पांचा उल्लेख करत शहा म्हणाले की, हे १३० कोटी भारतीयांचे ध्येय बनले पाहिजे. या ५ संकल्पांद्वारे २०४७ पर्यंत भारत जगात सर्वोच्च स्थानावर पोहोचेल आणि त्या प्रवासात भाषांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल.
विकसित भारताचे स्वप्न
गुलामगिरीच्या मानसिकतेपासून मुक्ती
आपल्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान
राष्ट्रीय एकता व अखंडतेबद्दल समर्पण
प्रत्येक नागरिकामध्ये कर्तव्यभावना
English Language : भारत समजून घेण्यासाठी इंग्रजी अपुरी
परदेशी भाषा भारत समजून घेण्यासाठी अपुरी आहे असं म्हणत अमित शाहांनी इंग्रजी आणि इतर परदेशी भाषांवर टीका केली. परदेशी भाषा या भारताच्या इतिहास, संस्कृती आणि धार्मिक परंपरा समजून घेण्यासाठी पुरेशा नाहीत असं अमित शाह म्हणाले. अर्धवट परदेशी भाषांद्वारे भारत कधीच समजला जाऊ शकत नाही. ही लढाई सोपी नाही, पण मला विश्वास आहे की आपण ती जिंकू. आपण आपल्या भाषांमध्ये देश चालवू आणि जगाचे नेतृत्वही करू असा आत्मविश्वास अमित शाहांनी व्यक्त केला.