हिंदी भाषेला पर्याय आम्ही दिला आहे, देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण...

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey)  यांनी पत्रकार परिषद घेत पहिली पासून हिंदी भाषा शिकण्यास सक्ती नको. अशी भूमिका मांडली असताना राज्यात भाषावाद आता पाहायाला मिळतोय. महत्वाचं म्हणजे राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आपली महत्वाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलाय. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांमध्ये शैक्षणिक धोरणानुसार सर्व शाळांमध्ये पहिलीपासून तीन भाषा शिकणे अनिवार्य करण्यात आले होते. फडणवीस यांनी स्पष्टीकरण देताना म्हणाले. राज्य सरकारने हिंदी भाषा शिकण्यासाठी अनिवार्य केले होते. मात्र, आम्ही हिंदी भाषेला (Hindi Language) पर्याय दिलेला आहे.

राज्य सरकारने हिंदी भाषेची अनिवार्यता काढून टाकण्यासाठी अधिसूचना जारी केली होती. त्यामुळे ज्यांना जी भाषा आवडते ती तीसरी भाषा शिकू शकतात. त्यामुळे तिसऱ्या भाषेची सूत्रता नव्या शैक्षणिक धोरणात समाविष्ट केली आहे. शैक्षणिक धोरणात मातृभाषेला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना दोन भाषा शिकाव्या लागतील मात्र, मुलं स्वभाविकपणे इंग्रजी भाषा स्विकारतील. मात्र तिसरी भाषा म्हणून कुठल्याही भारतीय भाषेचा पर्याया स्विकारता येईल. अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केली.

शिक्षकांची संख्या कमी असल्याने भाषा शिकवण्यासाठी उपस्थिती असलेल्या शिक्षकांवर अतिरिक्त काम करावं लागेलं अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडल्यानंतर, विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या भाषेच्या शिक्षक उपलब्ध केला जाईल, अशी भूमिका फडणवीस यांनी स्पष्ट केली. तसेच हिंदी भाषेचे शिक्षक सहज उपलब्ध होतात.  २० विद्यार्थ्यांनी त्यांच्या पसंतीनुसार भाषा निवडली तर त्यांच्यासाठी शिक्षक उपलब्ध केला जाईल. त्यांना ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाईल.  असे ही फडणवीस म्हणाले.

 
Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या