हिंदी भाषेला पर्याय आम्ही दिला आहे, देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण...

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey)  यांनी पत्रकार परिषद घेत पहिली पासून हिंदी भाषा शिकण्यास सक्ती नको. अशी भूमिका मांडली असताना राज्यात भाषावाद आता पाहायाला मिळतोय. महत्वाचं म्हणजे राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आपली महत्वाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलाय. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांमध्ये शैक्षणिक धोरणानुसार सर्व शाळांमध्ये पहिलीपासून तीन भाषा शिकणे अनिवार्य करण्यात आले होते. फडणवीस यांनी स्पष्टीकरण देताना म्हणाले. राज्य सरकारने हिंदी भाषा शिकण्यासाठी अनिवार्य केले होते. मात्र, आम्ही हिंदी भाषेला (Hindi Language) पर्याय दिलेला आहे.

राज्य सरकारने हिंदी भाषेची अनिवार्यता काढून टाकण्यासाठी अधिसूचना जारी केली होती. त्यामुळे ज्यांना जी भाषा आवडते ती तीसरी भाषा शिकू शकतात. त्यामुळे तिसऱ्या भाषेची सूत्रता नव्या शैक्षणिक धोरणात समाविष्ट केली आहे. शैक्षणिक धोरणात मातृभाषेला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना दोन भाषा शिकाव्या लागतील मात्र, मुलं स्वभाविकपणे इंग्रजी भाषा स्विकारतील. मात्र तिसरी भाषा म्हणून कुठल्याही भारतीय भाषेचा पर्याया स्विकारता येईल. अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केली.

शिक्षकांची संख्या कमी असल्याने भाषा शिकवण्यासाठी उपस्थिती असलेल्या शिक्षकांवर अतिरिक्त काम करावं लागेलं अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडल्यानंतर, विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या भाषेच्या शिक्षक उपलब्ध केला जाईल, अशी भूमिका फडणवीस यांनी स्पष्ट केली. तसेच हिंदी भाषेचे शिक्षक सहज उपलब्ध होतात.  २० विद्यार्थ्यांनी त्यांच्या पसंतीनुसार भाषा निवडली तर त्यांच्यासाठी शिक्षक उपलब्ध केला जाईल. त्यांना ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाईल.  असे ही फडणवीस म्हणाले.

 
Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी