हिंदी भाषेला पर्याय आम्ही दिला आहे, देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण...

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey)  यांनी पत्रकार परिषद घेत पहिली पासून हिंदी भाषा शिकण्यास सक्ती नको. अशी भूमिका मांडली असताना राज्यात भाषावाद आता पाहायाला मिळतोय. महत्वाचं म्हणजे राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आपली महत्वाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलाय. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांमध्ये शैक्षणिक धोरणानुसार सर्व शाळांमध्ये पहिलीपासून तीन भाषा शिकणे अनिवार्य करण्यात आले होते. फडणवीस यांनी स्पष्टीकरण देताना म्हणाले. राज्य सरकारने हिंदी भाषा शिकण्यासाठी अनिवार्य केले होते. मात्र, आम्ही हिंदी भाषेला (Hindi Language) पर्याय दिलेला आहे.

राज्य सरकारने हिंदी भाषेची अनिवार्यता काढून टाकण्यासाठी अधिसूचना जारी केली होती. त्यामुळे ज्यांना जी भाषा आवडते ती तीसरी भाषा शिकू शकतात. त्यामुळे तिसऱ्या भाषेची सूत्रता नव्या शैक्षणिक धोरणात समाविष्ट केली आहे. शैक्षणिक धोरणात मातृभाषेला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना दोन भाषा शिकाव्या लागतील मात्र, मुलं स्वभाविकपणे इंग्रजी भाषा स्विकारतील. मात्र तिसरी भाषा म्हणून कुठल्याही भारतीय भाषेचा पर्याया स्विकारता येईल. अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केली.

शिक्षकांची संख्या कमी असल्याने भाषा शिकवण्यासाठी उपस्थिती असलेल्या शिक्षकांवर अतिरिक्त काम करावं लागेलं अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडल्यानंतर, विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या भाषेच्या शिक्षक उपलब्ध केला जाईल, अशी भूमिका फडणवीस यांनी स्पष्ट केली. तसेच हिंदी भाषेचे शिक्षक सहज उपलब्ध होतात.  २० विद्यार्थ्यांनी त्यांच्या पसंतीनुसार भाषा निवडली तर त्यांच्यासाठी शिक्षक उपलब्ध केला जाईल. त्यांना ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाईल.  असे ही फडणवीस म्हणाले.

 
Comments
Add Comment

मेट्रो ३ ने दाखवली ‘स्पीड’ची ताकद : पहिल्याच दिवशी ऐतिहासिक प्रतिसाद!

मुंबई : मुंबईकरांनी मेट्रो ३, म्हणजेच अ‍ॅक्वा लाईनला दिलेला प्रतिसाद पाहता हा प्रकल्प खऱ्या अर्थाने यशस्वी ठरत

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक

डिजिटल क्रांतीद्वारे भारताची जागतिक महासत्तेकडे वाटचाल

मुंबई : डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून भारत आत्मनिर्भरतेकडून जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. या

भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे संयुक्त निवेदन व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण

RBI : RBIचा जबर धक्का! 'या' मोठ्या बँकेचा परवाना रद्द, ठेवीदारांना फटका!

सातारा : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा बँकिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना धक्का! ‘ती’ अट ठरतेय अडचणीची; दिवाळीत पैसे मिळणार की नाही?

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांसाठी आता एक मोठी अडचण निर्माण