‘गणरचनेचा बिगुल’: जि. प. निवडणुकांच्या रणशिंगाला सुरुवात

प्रभागांची आखणी सुरू : राजकीय पक्ष मैदानात उतरले !


अ.नगर : ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना प्रक्रियेला प्रशासनिक गती मिळाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यासंदर्भात आदेश काढत जिल्हा आणि तालुकास्तरावर समित्या स्थापन केल्या आहेत.



या समित्यांच्या अध्यक्षपदावर जिल्हाधिकारी राहणार असून जिल्हास्तरीय समितीत उपजिल्हाधिकारी महसूल, तहसीलदार (सामान्य प्रशासन), आणि संगणक तज्ज्ञ यांचा समावेश करण्यात आला आहे. तर तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायक तहसीलदार आणि संगणक तज्ज्ञ सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. ग्रामविकास खात्याच्या निर्देशानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ७५ गट तर पंचायत समितीचे १५० गण निश्चित करण्यात आले आहेत. यानुसार, १४ जुलै रोजी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे, तर १८ ऑगस्ट २०२५ रोजी अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली जाणार आहे.या प्रक्रियेसोबतच जिल्हास्तरावर प्रशासकीय हालचालींना वेग आला असून प्रभाग रचनेची जबाबदारी संबंधित समित्यांवर सोपवण्यात आली आहे. प्रारूप तयार करताना अधिनियम, नियम आणि शासन निर्णयांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. योग्य नकाशे तयार करणे, त्यांची पडताळणी करणे, आणि आवश्यक असल्यास सुधारणा करणे हे काम समितीमार्फत केले जाईल.दरम्यान, या प्रक्रियेसह राजकीय पक्षांनी देखील निवडणुकीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गावागावात बूथ पातळीवर कार्यकर्त्यांची नियुक्ती, बैठका, गणित मांडणी यासारखी तयारी वेग घेत आहे.प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर निवडणुकीच्या घोषणेला चटपटीत सुरुवात होणार, अशी चर्चा आता जिल्हाभर सुरु झाली आहे.




  • जिल्हा परिषद – ७५ गट, पंचायत समिती – १५० गट

  • १४ जुलै – प्रारूप प्रभाग अधिसूचना जाहीर

  • १८ ऑगस्ट – अंतिम मंजुरीसाठी निवडणूक आयोगाकडे अहवाल

  • प्रशासनासोबत राजकीय पक्षही निवडणुकीसाठी सज्ज

Comments
Add Comment

क्रिकेटची मॅच संपली अन् दोन्ही गट भिडले ; भर मैदानात सांडला रक्ताचा सडा, नेमकं काय घडलं ?

जळगाव : क्रिकेटचं मैदान म्हणजे दोन गट आमने सामने असणारच. इंटरनॅशनल मॅच असो वा गल्लीतल्या पोरांची मॅच, भांडणं

खळबळजनक ! नाशिक, संगमनेर पाठोपाठ आता श्रीरामपूरमध्ये भोंदूबाबाचा प्रताप समोर , गणेश शिंदेला अटक

नाशिकमधील अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राज्यातील अनेक भोंदूबाबांची धक्कादायक प्रकरण समोर आली आहे. आर्थिक

Kolhapur Women Abuse Case : धक्कादायक! परतवाडा प्रकरणाची कोल्हापुरात पुनरावृत्ती; तरुणीवर अत्याचार करून ...

मुंबई : नाशिक आणि अमरावतीतील घटनांनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असतानाच आता कोल्हापूर

Vande Bharat : पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

पुणे : पुणे स्टेशनजवळ संध्याकाळी २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा डबा

Land Scam : अमरावती भूखंड घोटाळ्याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

मुंबई : अमरावती शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेले भूखंड अन्य व्यक्तींना बेकायदेशीरपणे

Agriculture Minister Dattatray Bharne : "बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

"बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बियाणे उत्पादक