Maruti Chittampalli Passes Away: जंगल प्रत्यक्ष जगलेला माणूस काळाच्या पडद्याआड

अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचं 93 व्या वर्षी निधन


अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले, ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मारुती चित्तमपल्ली हे मराठी वन्यजीव अभ्यासक आणि लेखक म्हणून प्रसिद्ध होते.  जंगल प्रत्यक्ष जगणाऱ्या या व्यक्तिमत्वाने वनाधिकारी म्हणून तब्बल ३६ वर्षे नोकरी केली. निवृत्तीनंतरही त्यांनी अनेक वर्ष जंगलात काढली. यादरम्यान जंगलातील प्राणीजीवन आणि त्याचे बारकावे टिपत त्यासंबंधित त्यांनी अनेक लेखनी देखील केल्या. त्यांना वन्यजीव संवर्धन, साहित्य आणि शिक्षणातील त्यांच्या असाधारण योगदानासाठी "अरण्य ऋषी" - वनऋषी म्हणून ओळखले जात होते. असे हे थोर व्यक्तिमत्व आज अनंतात विलीन झाले.


मारुती चितमपल्ली यांनी वने, वन्यप्राणी, वन्यजीव व्यवस्थापन, आणि पक्षिजगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले. आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग आणि निबंधवाचन केले. सेवाकाळात आणि निवृत्तीनंतर अनेक संस्था, समित्या यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. राज्य वन्यजीव संरक्षण सल्लागार समिती, मराठी अभ्यासक्रम समिती (औरंगाबाद) चे ते सदस्य होते. तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचेही ते संचालक होते.  त्यांच्या या एकंदरीत कारकिर्दीची दखल घेत त्यांना यावर्षी दिनांक १८ एप्रिल, २०२५ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


त्यांच्या निसर्ग क्षेत्रातील अभ्यासामुळेच पक्षितज्ज्ञ व निसर्गलेखक अशी त्यांना ओळख मिळाली.  त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली. रानवाटा, जंगलाची दुनिया, निळावंती, निसर्गवाचन, पक्षिकोश यांसारख्या गाजलेल्या पुस्तकांचा यात समावेश आहे.



सुरुवातीचे जीवन आणि बालपण


मारुती चित्तमपल्ली यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९३२ रोजी महाराष्ट्रातील सोलापूर येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव मारुती भुजंगराव चितमपल्ली असे आहे. त्यांच्या आईच्या निसर्गावरील प्रेमाने प्रेरित होऊन, चितमपल्ली यांना जंगलाबद्दलचे आकर्षण निर्माण झाले. त्यांनी १९५८ मध्ये कोइम्बतूर येथील राज्य वन सेवा महाविद्यालयात औपचारिक प्रशिक्षण घेतले, वन संवर्धनातील त्यांच्या आयुष्यभराच्या प्रवासाचा पाया येथेच रचला गेला.


Comments
Add Comment

Vande Bharat : पुण्यात वंदे भारतचा डबा घसरला

पुणे : पुणे स्टेशनजवळ संध्याकाळी २२२२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा डबा

Land Scam : अमरावती भूखंड घोटाळ्याची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी

मुंबई : अमरावती शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेले भूखंड अन्य व्यक्तींना बेकायदेशीरपणे

Agriculture Minister Dattatray Bharne : "बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

"बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बियाणे उत्पादक

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं चित्र आहे. बीडमध्ये मैत्रीला काळिमा

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बंधनकारकच; परिवहन मंत्र्यांची ठाम भूमिका; आजच्या बैठकीत काय घडलं ?

(Marathi Language Compulsory Taxi-Auto ) : आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य