विजेअभावी पालघरमधील रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ

पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यातील कासा गावात गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होत आहे. याचा फटका रिक्षा चालकांवर बसत असल्याचे दिसून येत आहे. सीएनजी पंपावर वीज पुरवठा खंडित असल्याने रिक्षा चालकांना आठ तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यानंतरही सीएनजी मिळत नसल्याने रिक्षा चालकांचा धंदा होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.


या काही दिवसांपासून रिक्षाचालक सकाळी सीएनजी भरण्यासाठी पंपावर जातात. पण तेथे वीज पुरवठा खंडित असल्याने सीएनजी मिळण्यास अडचण येत आहे. त्यामुळे रिक्षाचालक दिवसभर रिक्षा चालू शकत नाहीत. त्यामुळे अनेकांना उपासमारीचे संकट पडले आहे. रिक्षा चालकांनी रिक्षा कर्ज काढून घेतल्या असल्यामुळे हप्ता कसा भरायचा या विवंचनेत आहेत. सध्या शाळा व कॉलेज सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेकडे पोहोचवणे व घरी पोहोचवणे यासाठी रिक्षा लावल्या आहेत.


विजेचा खोळंबा होत असल्याने सीएनजी वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक विवंचना सुरू झाली आहे. कासा चारोटी परिसरात वीजपुरवठा खंडित होत असल्याने रोज प्रवासी रिक्षा धंद्यावर उदरनिर्वाह करणारे ४०० ते ५०० रिक्षा चालकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य