​​PMRDA : ​​शिवाजीनगर ते हिंजवडी ​मेट्रो -३ला आणखी विलंब​!

गारेगार प्रवाससाठी वर्षभर थांबाच!


​आयटी अभियंत्यांना थंडगार व आरामदायी प्रवासासाठी आणखी वर्षभर प्रतिक्षाच करावी लागणार आहे. कारण हिंजवडी ते शिवाजीनगरला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित पुणे मेट्रो लाइन-३ ​चं काम सप्टेंबर २०२५ पर्यंत होणं अपेक्षित होतं. पण ते शक्य नाही. त्याला आणखी वर्षांचा कालावधी लागू शकतो. २३.३ किलोमीटर लांबीच्या ​या उन्नत मार्गिके​चं काम आता ​थेट मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता ​वर्तवली जात आहे.


?si=RzVzy3qFY2_n1b7F

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण ​म्हणजे PMRDAकडून ​ सार्वजनिक-खासगी भागीदारी ​ म्हणजे पीपीपी मॉडेल​ तत्वावर ​हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईन ३ प्रकल्पाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ७,४२० कोटी रुपये खर्चा​च्या पुणे मेट्रो लाइन-३ चे काम २०१८ मध्ये मंजूर झाले​. मार्च २०२३ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा होती. नंतर ही मुदत सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली, परंतु आता ती मार्च २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या विलंबा​चं प्रमुख कारण म्हणजे राजभवन परिसरातील २६३.७८ चौरस मीटर जमिनीचे हस्तांतरण​. तसेच विद्यापीठ चौकातील ​दुहेरी उड्डाण​पुलाचे अपूर्ण काम​. यामु​ळंही मेट्रो लाईन ३ च्या कामाला उशीर होत असल्याचा दावा केला जात आहे. ​मेट्रो लाईन ३ या प्रकल्पावर २३ स्थान​के असतील.



हा प्रकल्प पुण्यातील मध्यवर्ती भाग आणि हिंजवडीच्या आयटी हबला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. सध्या​ प्रकल्पा​चं ८३ ते ८५ टक्के काम पूर्ण झा​लयं. परंतु ​​ वीज आणि पाण्याच्या लाईन्स​ आणि काही स्थानकांवरील अंतिम कामे बाकी आहेत​, असंही सांगण्यात येतयं. मेट्रो लाईन ३ सुरू होण्यास आणखी एक वर्ष उशीर होत असल्यानं पुणेकरांमध्ये नाराजी पसरली आहे​. कारण​ सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानचा प्रवास​ वाहतूक कोंडीमुळं वेळखाऊ ​होतोय. मात्र एकदा हा मार्ग कार्यान्वित झाला की, ​ पुण्यातील मध्यवर्ती भाग आणि हिंजवडीच्या आयटी हबमधील ​अंतर ३० ते ४० मिनिटांवर येईल. तसेच या भागात ये-जा करणाऱ्यांचा प्रवास गारेगार व आरामदायी होईल.

Comments
Add Comment

पुण्याच्या आरुषची गगनभरारी, १० व्या वर्षी अवकाशाला गवसणी

पुणे : हल्लीची मुलं ही मुळातच हुशार असतात. लहानग्या वयातच त्यांचा पंखात असणारं बळ हे प्रचंड असतं. थोडक्यात काय तर

Kolhapur Accident : ब्रेकिंग! कोल्हापूरच्या शाहू मिल चौकात भरधाव क्रेटाने दुचाकीला चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहू मिल चौकात (Kolhapur Accident)

जुन्नरमधील शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या लहानग्यांच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला मदतीचा हात

इनामदार कुटुंबाला शिवसेनेकडून पाच लाखांची मदत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉल करून केले मृत

Ladki Bahin Yojana e-KYC: बहिणींसाठी आनंदवार्ता! 'या' दिवसापर्यंत आता करता येणार ई-केवायसी

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता ज्या लाडक्या

Mumbai Mayor : मुंबईच्या महापौरपदाचा उमेदवार आज ठरणार!

महापौर आणि उपमहापौरपदासाठी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईचा महापौर कोण याबाबत

ZP and Panchayat Samiti Elections 2026 : राज्यातील १२ जिल्हा परिषदांसह पंचायत समितीसाठी ७,४३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात…

मुंबई : गेल्या काही काळापासून राज्यात सुरू असलेला निवडणुकांचा धडाका आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. लोकसभा,