​​PMRDA : ​​शिवाजीनगर ते हिंजवडी ​मेट्रो -३ला आणखी विलंब​!

गारेगार प्रवाससाठी वर्षभर थांबाच!


​आयटी अभियंत्यांना थंडगार व आरामदायी प्रवासासाठी आणखी वर्षभर प्रतिक्षाच करावी लागणार आहे. कारण हिंजवडी ते शिवाजीनगरला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित पुणे मेट्रो लाइन-३ ​चं काम सप्टेंबर २०२५ पर्यंत होणं अपेक्षित होतं. पण ते शक्य नाही. त्याला आणखी वर्षांचा कालावधी लागू शकतो. २३.३ किलोमीटर लांबीच्या ​या उन्नत मार्गिके​चं काम आता ​थेट मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता ​वर्तवली जात आहे.


?si=RzVzy3qFY2_n1b7F

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण ​म्हणजे PMRDAकडून ​ सार्वजनिक-खासगी भागीदारी ​ म्हणजे पीपीपी मॉडेल​ तत्वावर ​हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईन ३ प्रकल्पाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ७,४२० कोटी रुपये खर्चा​च्या पुणे मेट्रो लाइन-३ चे काम २०१८ मध्ये मंजूर झाले​. मार्च २०२३ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा होती. नंतर ही मुदत सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली, परंतु आता ती मार्च २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या विलंबा​चं प्रमुख कारण म्हणजे राजभवन परिसरातील २६३.७८ चौरस मीटर जमिनीचे हस्तांतरण​. तसेच विद्यापीठ चौकातील ​दुहेरी उड्डाण​पुलाचे अपूर्ण काम​. यामु​ळंही मेट्रो लाईन ३ च्या कामाला उशीर होत असल्याचा दावा केला जात आहे. ​मेट्रो लाईन ३ या प्रकल्पावर २३ स्थान​के असतील.



हा प्रकल्प पुण्यातील मध्यवर्ती भाग आणि हिंजवडीच्या आयटी हबला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. सध्या​ प्रकल्पा​चं ८३ ते ८५ टक्के काम पूर्ण झा​लयं. परंतु ​​ वीज आणि पाण्याच्या लाईन्स​ आणि काही स्थानकांवरील अंतिम कामे बाकी आहेत​, असंही सांगण्यात येतयं. मेट्रो लाईन ३ सुरू होण्यास आणखी एक वर्ष उशीर होत असल्यानं पुणेकरांमध्ये नाराजी पसरली आहे​. कारण​ सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानचा प्रवास​ वाहतूक कोंडीमुळं वेळखाऊ ​होतोय. मात्र एकदा हा मार्ग कार्यान्वित झाला की, ​ पुण्यातील मध्यवर्ती भाग आणि हिंजवडीच्या आयटी हबमधील ​अंतर ३० ते ४० मिनिटांवर येईल. तसेच या भागात ये-जा करणाऱ्यांचा प्रवास गारेगार व आरामदायी होईल.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये