​​PMRDA : ​​शिवाजीनगर ते हिंजवडी ​मेट्रो -३ला आणखी विलंब​!

गारेगार प्रवाससाठी वर्षभर थांबाच!


​आयटी अभियंत्यांना थंडगार व आरामदायी प्रवासासाठी आणखी वर्षभर प्रतिक्षाच करावी लागणार आहे. कारण हिंजवडी ते शिवाजीनगरला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित पुणे मेट्रो लाइन-३ ​चं काम सप्टेंबर २०२५ पर्यंत होणं अपेक्षित होतं. पण ते शक्य नाही. त्याला आणखी वर्षांचा कालावधी लागू शकतो. २३.३ किलोमीटर लांबीच्या ​या उन्नत मार्गिके​चं काम आता ​थेट मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता ​वर्तवली जात आहे.


?si=RzVzy3qFY2_n1b7F

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण ​म्हणजे PMRDAकडून ​ सार्वजनिक-खासगी भागीदारी ​ म्हणजे पीपीपी मॉडेल​ तत्वावर ​हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाईन ३ प्रकल्पाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ७,४२० कोटी रुपये खर्चा​च्या पुणे मेट्रो लाइन-३ चे काम २०१८ मध्ये मंजूर झाले​. मार्च २०२३ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा होती. नंतर ही मुदत सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली, परंतु आता ती मार्च २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या विलंबा​चं प्रमुख कारण म्हणजे राजभवन परिसरातील २६३.७८ चौरस मीटर जमिनीचे हस्तांतरण​. तसेच विद्यापीठ चौकातील ​दुहेरी उड्डाण​पुलाचे अपूर्ण काम​. यामु​ळंही मेट्रो लाईन ३ च्या कामाला उशीर होत असल्याचा दावा केला जात आहे. ​मेट्रो लाईन ३ या प्रकल्पावर २३ स्थान​के असतील.



हा प्रकल्प पुण्यातील मध्यवर्ती भाग आणि हिंजवडीच्या आयटी हबला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. सध्या​ प्रकल्पा​चं ८३ ते ८५ टक्के काम पूर्ण झा​लयं. परंतु ​​ वीज आणि पाण्याच्या लाईन्स​ आणि काही स्थानकांवरील अंतिम कामे बाकी आहेत​, असंही सांगण्यात येतयं. मेट्रो लाईन ३ सुरू होण्यास आणखी एक वर्ष उशीर होत असल्यानं पुणेकरांमध्ये नाराजी पसरली आहे​. कारण​ सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानचा प्रवास​ वाहतूक कोंडीमुळं वेळखाऊ ​होतोय. मात्र एकदा हा मार्ग कार्यान्वित झाला की, ​ पुण्यातील मध्यवर्ती भाग आणि हिंजवडीच्या आयटी हबमधील ​अंतर ३० ते ४० मिनिटांवर येईल. तसेच या भागात ये-जा करणाऱ्यांचा प्रवास गारेगार व आरामदायी होईल.

Comments
Add Comment

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद

हाकेंनी जरांगेंसमोर मांडला ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव, म्हणाले...

"पाटील, ९६ कुळी, क्षत्रिय तुम्ही राहिले नाहीत, तर मग आपल्यात ११ विवाह जाहीर करू": लक्ष्मण हाकेंचा टोला बीड: ओबीसी

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी