पिसवली ग्रामस्थांची होणार डम्पिंगच्या दुर्गंधीतून मुक्तता

  35

कल्याण : पिसवली परिसरातील नागरिकांची डम्पिंगच्या दुर्गंधीपासून मुक्तता होणार असून पिसवली देशमुख होम्स परिसरातील कचरा हटविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ मागणी करत होते. ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन डम्पिंग ग्राउडच्या जागेचे बगीच्यात रूपांतरण करण्यासाठी आमदार राजेश मोरे यांनी पुढाकार घेतला आहे.


रस्त्याच्या कडेला सातत्याने कचरा फेकला जात असल्याने पिसवली आणि देशमुख होम्स दरम्यानच्या सुंदर जागेचे भराव भूमीत रुपांतर होत असल्याची बाब कळताच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी तत्काळ या जागेची पाहणी करत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यानंतर हा परिसर स्वखर्चाने स्वच्छ करणार असल्याचे जाहीर केले. तसेच भविष्यात या जागेचे पुन्हा कचरा कुंडीत रुपांतर होऊ नये यासाठी या ठिकाणी वृक्षारोपण करत या परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचे आश्वासन आमदार मोरे यांनी दिले. तसेच या भूखंडालगत असलेल्या स्मशानभूमीत देखील नागरिकांच्या सोयीसाठी बाकडी बसवून या स्मशान भूमीच्या परिसराचे सुशोभिकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


कल्याण ग्रामीण मतदार संघात येणाऱ्या पिसवली आणि देशमुख होम्स परिसराच्या दरम्यान असलेल्या मोकळ्या जागेवर परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कचरा फेकला जात असल्याच्या तक्रारी आमदार राजेश मोरे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत या परिसराचा आमदार मोरे यांनी दोन दिवसापूर्वी पाहणी दौरा केला. यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना देत या परिसरातील कचऱ्याच्या स्वच्छता स्वखर्चाने सुरु केली. तसेच या परिसरात कचरा टाकून या परिसराचे सौंदर्य नष्ट करू नका असे आवाहन परिसरातील नागरिकांना करताना या जागेत लवकरच वृक्षारोपण करत परिसर सुंदर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर या भूखंडालगत असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करून स्मशान भूमीची देखील डागडुजी करण्याचे आश्वासन आमदार मोरे यांनी दिले.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या