पिसवली ग्रामस्थांची होणार डम्पिंगच्या दुर्गंधीतून मुक्तता

  31

कल्याण : पिसवली परिसरातील नागरिकांची डम्पिंगच्या दुर्गंधीपासून मुक्तता होणार असून पिसवली देशमुख होम्स परिसरातील कचरा हटविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ मागणी करत होते. ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन डम्पिंग ग्राउडच्या जागेचे बगीच्यात रूपांतरण करण्यासाठी आमदार राजेश मोरे यांनी पुढाकार घेतला आहे.


रस्त्याच्या कडेला सातत्याने कचरा फेकला जात असल्याने पिसवली आणि देशमुख होम्स दरम्यानच्या सुंदर जागेचे भराव भूमीत रुपांतर होत असल्याची बाब कळताच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी तत्काळ या जागेची पाहणी करत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यानंतर हा परिसर स्वखर्चाने स्वच्छ करणार असल्याचे जाहीर केले. तसेच भविष्यात या जागेचे पुन्हा कचरा कुंडीत रुपांतर होऊ नये यासाठी या ठिकाणी वृक्षारोपण करत या परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचे आश्वासन आमदार मोरे यांनी दिले. तसेच या भूखंडालगत असलेल्या स्मशानभूमीत देखील नागरिकांच्या सोयीसाठी बाकडी बसवून या स्मशान भूमीच्या परिसराचे सुशोभिकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


कल्याण ग्रामीण मतदार संघात येणाऱ्या पिसवली आणि देशमुख होम्स परिसराच्या दरम्यान असलेल्या मोकळ्या जागेवर परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कचरा फेकला जात असल्याच्या तक्रारी आमदार राजेश मोरे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत या परिसराचा आमदार मोरे यांनी दोन दिवसापूर्वी पाहणी दौरा केला. यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना देत या परिसरातील कचऱ्याच्या स्वच्छता स्वखर्चाने सुरु केली. तसेच या परिसरात कचरा टाकून या परिसराचे सौंदर्य नष्ट करू नका असे आवाहन परिसरातील नागरिकांना करताना या जागेत लवकरच वृक्षारोपण करत परिसर सुंदर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर या भूखंडालगत असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करून स्मशान भूमीची देखील डागडुजी करण्याचे आश्वासन आमदार मोरे यांनी दिले.

Comments
Add Comment

उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

रामदास कांबळे यांची युवासेना कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती जाहीर ठाणे: मुंबई महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा

भारत महासत्ता न होण्यासाठी तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा परकीय शक्तींचा डाव

आयआरएस समीर वानखेडे यांचे वक्तव्य कल्याण  : ''आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे

मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या