पिसवली ग्रामस्थांची होणार डम्पिंगच्या दुर्गंधीतून मुक्तता

कल्याण : पिसवली परिसरातील नागरिकांची डम्पिंगच्या दुर्गंधीपासून मुक्तता होणार असून पिसवली देशमुख होम्स परिसरातील कचरा हटविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ मागणी करत होते. ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन डम्पिंग ग्राउडच्या जागेचे बगीच्यात रूपांतरण करण्यासाठी आमदार राजेश मोरे यांनी पुढाकार घेतला आहे.


रस्त्याच्या कडेला सातत्याने कचरा फेकला जात असल्याने पिसवली आणि देशमुख होम्स दरम्यानच्या सुंदर जागेचे भराव भूमीत रुपांतर होत असल्याची बाब कळताच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी तत्काळ या जागेची पाहणी करत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यानंतर हा परिसर स्वखर्चाने स्वच्छ करणार असल्याचे जाहीर केले. तसेच भविष्यात या जागेचे पुन्हा कचरा कुंडीत रुपांतर होऊ नये यासाठी या ठिकाणी वृक्षारोपण करत या परिसराचे सौंदर्यीकरण करण्याचे आश्वासन आमदार मोरे यांनी दिले. तसेच या भूखंडालगत असलेल्या स्मशानभूमीत देखील नागरिकांच्या सोयीसाठी बाकडी बसवून या स्मशान भूमीच्या परिसराचे सुशोभिकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


कल्याण ग्रामीण मतदार संघात येणाऱ्या पिसवली आणि देशमुख होम्स परिसराच्या दरम्यान असलेल्या मोकळ्या जागेवर परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कचरा फेकला जात असल्याच्या तक्रारी आमदार राजेश मोरे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत या परिसराचा आमदार मोरे यांनी दोन दिवसापूर्वी पाहणी दौरा केला. यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना देत या परिसरातील कचऱ्याच्या स्वच्छता स्वखर्चाने सुरु केली. तसेच या परिसरात कचरा टाकून या परिसराचे सौंदर्य नष्ट करू नका असे आवाहन परिसरातील नागरिकांना करताना या जागेत लवकरच वृक्षारोपण करत परिसर सुंदर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर या भूखंडालगत असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करून स्मशान भूमीची देखील डागडुजी करण्याचे आश्वासन आमदार मोरे यांनी दिले.

Comments
Add Comment

ठाण्यात २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

ठाणे: 'ठाणे महानगरपालिकेने' (TMC) जाहीर केले आहे की, ठाणे शहराच्या काही भागांमध्ये २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

गणपत गायकवाड यांना मोठा दिलासा; कोळसेवाडी पोलीस ठाणे राडा प्रकरणात निर्दोष मुक्तता

कल्याण: माजी आमदार गणपत गायकवाड यांना एक मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. २०१४ मध्ये कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस

ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये मुसळधार! हवामान खात्याने दिला रेड अलर्ट

सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई: ठाण्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता, उपमुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर

जड वाहने रात्री १२ नंतर सोडण्याचे शिंदे यांचे आदेश ठाणे: घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत

अंबरनाथ, बदलापुरात यंत्रणा कुचकामी

रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहांमध्ये विषारी रसायने अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूरवासीयांना पाणी व

कल्याणमध्ये मराठीची सक्ती आहे का, विचारत महिलेची अरेरावी

१५ ऑक्टोबरपर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी न करण्याचे आवाहन कल्याण : कल्याण, प. येथील 'पटेल आर मार्ट'मध्ये