'मेट्रो १ मार्गिकेवर आठ फेऱ्यांत वाढ

मुंबई : 'मेट्रो १' च्या घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो मार्गिकेवरील गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली. 'मेट्रो १' वर सोमवारपासून प्रतिदिन आठ फेऱ्या वाढविण्यात आल्या असून आता एकूण फेऱ्यांची संख्या ४४४ वरून ४५२ झाली आहे. मेट्रो फेऱ्यांमध्ये वाढ झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.


२०१४ मध्ये 'घाटकोपर-वर्सोवा मेट्रो १' मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाली. आता या मार्गिकेला चांगला प्रतिसाद मिळत असून 'मेट्रो १' मधून प्रतिदिन पाच लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. गाड्यांच्या डब्यांच्या संख्येत मात्र वाढ झाली नाही. त्यामुळे कार्यालयीन वेळेत प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. 'मेट्रो १' मार्गिकेवर दर ३ मिनिटे आणि २५ सेकंदाने एक गाडी सुटत होती. आता मात्र दर ३ मिनिटे २० सेकेंदाने गाडी धावणार आहे. एकूणच गाड्यांची संख्या वाढल्याने आता प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून