मुसळधार पावसात टिटवाळ्यातील बेकायदा चाळी जमीनदोस्त

कल्याण : बेकायदा चाळींचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिटवाळा, मांडा, बल्याणी, वासुंद्री, उंभार्णी परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून दररोज बेकायदा चाळी, व्यापारी गाळे, जोत्यांवर तोडकामाची कारवाई सुरू आहे. गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी सुमारे अडीच ते तीन हजार बेकायदा बांधकामे भुईसपाट केली आहेत. पालिकेच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामे भुईसपाट करण्यात आली आहेत. या सततच्या कारवाईने भुमाफियांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांमुळे एका साहाय्यक आयुक्ताला सहा महिन्यापूर्वी निलंबित व्हावे लागले.


प्रमोद पाटील यांनी अ प्रभाग साहाय्यक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून दररोज तोडकामाची मोहीम सुरू ठेऊन टिटवाळा परिसरातील बेकायदा बांधकामांची श्रृंखला पूर्णपणे बंद केली आहे. गेल्या आठवड्यात टिटवाळा भागातील वासुंद्री रस्ता, बल्याणी, उंभार्णी भागात मुसळधार पावसात बेकायदा चाळी उभारणीची कामे सुरू आहेत. याच भागात नवीन चाळी उभारणीसाठी नवीन जोत्यांची उभारणी आणि त्यात मातीचे भराव केले जात आहेत, अशी माहिती साहाय्यक आयुक्त पाटील यांना वरिष्ठांकडून मिळाली. या माहितीची खात्री केल्यानंतर वासुंद्री रस्ता, बल्याणी, उंभार्णी येथे नव्याने बेकायदा चाळी, जोत्यांची बांधकामे पाऊस सुरू असताना जेसीबी आणि घणांच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली.


या बांधकामांची उभारणी कोणी केली आहे याची माहिती परिसरातून घेण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला, पण कोणीही रहिवासी याबाबतची माहिती देण्यासाठी पुढे आला नाही. बांधकामांच्या ठिकाणचे मजूर, गवंडी कामाच्या ठिकाणाहून पळून गेले होते. कामाच्या ठिकाणचे सिमेंट, ग्रीट मातीत मिसळून या साहित्याची विल्हेवाट लावण्यात आली, असे पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक

ठाणाच्या नगरसेवकांचा वेगळाच थाट; ठाणे महापालिकेच्या दारात सजल्या आलिशान गाड्या

ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त

डोंबिवलीत जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी

डोंबिवली : डोंबिवलीत जेसीबीचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची

Thane Municipal Corporation : ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये ठाणे महापालिकेने पटकाविला तिसरा क्रमांक

ठाणे : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’

Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

काँग्रेसच्या सहकार्याने भाजपचे बंडखोर महापौर पदी मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत

भिवंडीतील बंडखोरांवर अपात्रतेची टांगती तलवार

भाजपचा व्हीप पाळावा लागणार; प्रदेश पातळीवरून वेगवान हालचाली सुरू मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या