मुसळधार पावसात टिटवाळ्यातील बेकायदा चाळी जमीनदोस्त

  54

कल्याण : बेकायदा चाळींचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिटवाळा, मांडा, बल्याणी, वासुंद्री, उंभार्णी परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून दररोज बेकायदा चाळी, व्यापारी गाळे, जोत्यांवर तोडकामाची कारवाई सुरू आहे. गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी सुमारे अडीच ते तीन हजार बेकायदा बांधकामे भुईसपाट केली आहेत. पालिकेच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामे भुईसपाट करण्यात आली आहेत. या सततच्या कारवाईने भुमाफियांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांमुळे एका साहाय्यक आयुक्ताला सहा महिन्यापूर्वी निलंबित व्हावे लागले.


प्रमोद पाटील यांनी अ प्रभाग साहाय्यक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून दररोज तोडकामाची मोहीम सुरू ठेऊन टिटवाळा परिसरातील बेकायदा बांधकामांची श्रृंखला पूर्णपणे बंद केली आहे. गेल्या आठवड्यात टिटवाळा भागातील वासुंद्री रस्ता, बल्याणी, उंभार्णी भागात मुसळधार पावसात बेकायदा चाळी उभारणीची कामे सुरू आहेत. याच भागात नवीन चाळी उभारणीसाठी नवीन जोत्यांची उभारणी आणि त्यात मातीचे भराव केले जात आहेत, अशी माहिती साहाय्यक आयुक्त पाटील यांना वरिष्ठांकडून मिळाली. या माहितीची खात्री केल्यानंतर वासुंद्री रस्ता, बल्याणी, उंभार्णी येथे नव्याने बेकायदा चाळी, जोत्यांची बांधकामे पाऊस सुरू असताना जेसीबी आणि घणांच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली.


या बांधकामांची उभारणी कोणी केली आहे याची माहिती परिसरातून घेण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला, पण कोणीही रहिवासी याबाबतची माहिती देण्यासाठी पुढे आला नाही. बांधकामांच्या ठिकाणचे मजूर, गवंडी कामाच्या ठिकाणाहून पळून गेले होते. कामाच्या ठिकाणचे सिमेंट, ग्रीट मातीत मिसळून या साहित्याची विल्हेवाट लावण्यात आली, असे पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या