मुसळधार पावसात टिटवाळ्यातील बेकायदा चाळी जमीनदोस्त

  51

कल्याण : बेकायदा चाळींचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिटवाळा, मांडा, बल्याणी, वासुंद्री, उंभार्णी परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून दररोज बेकायदा चाळी, व्यापारी गाळे, जोत्यांवर तोडकामाची कारवाई सुरू आहे. गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी सुमारे अडीच ते तीन हजार बेकायदा बांधकामे भुईसपाट केली आहेत. पालिकेच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामे भुईसपाट करण्यात आली आहेत. या सततच्या कारवाईने भुमाफियांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांमुळे एका साहाय्यक आयुक्ताला सहा महिन्यापूर्वी निलंबित व्हावे लागले.


प्रमोद पाटील यांनी अ प्रभाग साहाय्यक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून दररोज तोडकामाची मोहीम सुरू ठेऊन टिटवाळा परिसरातील बेकायदा बांधकामांची श्रृंखला पूर्णपणे बंद केली आहे. गेल्या आठवड्यात टिटवाळा भागातील वासुंद्री रस्ता, बल्याणी, उंभार्णी भागात मुसळधार पावसात बेकायदा चाळी उभारणीची कामे सुरू आहेत. याच भागात नवीन चाळी उभारणीसाठी नवीन जोत्यांची उभारणी आणि त्यात मातीचे भराव केले जात आहेत, अशी माहिती साहाय्यक आयुक्त पाटील यांना वरिष्ठांकडून मिळाली. या माहितीची खात्री केल्यानंतर वासुंद्री रस्ता, बल्याणी, उंभार्णी येथे नव्याने बेकायदा चाळी, जोत्यांची बांधकामे पाऊस सुरू असताना जेसीबी आणि घणांच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली.


या बांधकामांची उभारणी कोणी केली आहे याची माहिती परिसरातून घेण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला, पण कोणीही रहिवासी याबाबतची माहिती देण्यासाठी पुढे आला नाही. बांधकामांच्या ठिकाणचे मजूर, गवंडी कामाच्या ठिकाणाहून पळून गेले होते. कामाच्या ठिकाणचे सिमेंट, ग्रीट मातीत मिसळून या साहित्याची विल्हेवाट लावण्यात आली, असे पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

रामदास कांबळे यांची युवासेना कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती जाहीर ठाणे: मुंबई महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा

भारत महासत्ता न होण्यासाठी तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा परकीय शक्तींचा डाव

आयआरएस समीर वानखेडे यांचे वक्तव्य कल्याण  : ''आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे

मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या