काँग्रेस पक्षाचं नेतृत्व दिसतं नाही, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील यांचा भाजपा प्रवेश...

मुंबई : महाराष्ट्राच्या विकासासाठी काँग्रेसचं नेतृत्व दिसत नाही, अशी भूमिका व्यक्त करुन यापूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. ज्यांना देशासाठी आणि समाजासाठी काम करण्याची ईच्छा आहे, त्यांना काँग्रेस पक्षात नेतृत्व दिसत नाही. आपलाच नेता भारतीय  सैन्याबद्दल बोलत असेल तर कार्यकर्त्यांना काय उत्तर द्यायचं, असा प्रश्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पडलेला असतो.  त्यामुळे काँग्रेस पक्षात निराशा आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मत व्यक्त केलं आहे.

माजी मुख्यमंत्री वसंदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यापूर्वी देेखील काँग्रेसमधून बड्या नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.  काँग्रेस आपल्या चुका सुधारत नाही किंवा आपल्या चुकांमधून काही बोध घेण्यास कमी पडत आहे, असे तुम्हाला वाटते का ? असा सवाल फडवीसांनी पत्रकारांना विचारला.

तसेच मुख्यमंत्री फडणवीस पुढे ही म्हणाले, काँग्रेसचं नेतृत्व दिशाहीन झालं आहे.  आम्ही अनेक वर्ष विरोधी पक्षात होतो. सत्तेत होतो, विरोधी पक्षात असताना, देशहिताची लाईन आम्ही कधीच सोडली नाही. त्यामुळे समाजातील लोक आमच्यासोबत आले आहेत. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

तसेच फडणवीस यांनी  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती चांगली कामगिरी करेल. असा विश्वास व्यक्त केला. निवडणुका असो किंवा नसो आम्ही नेहमीच चांगल्या लाकांकडे पाहत असतो, त्यांचं काम चांगलं असेल तर त्यांना पक्षात प्रवेशही देतो.  दरम्यान जयश्री पाटील यांच्या सोबत जे कार्यकर्ते भाजपात आले आहेत. त्यांची सर्वांची काळजी भाजपा पक्षात घेतली जाते. आम्ही बाहेरुन आलो आहोत ही भावना कोणीही बाळगू नका. त्यामुळे सगळ्यांची काळजी घेण आमचं कर्तव्य आहे. अशी हमी फडणवीस यांनी दिली.
Comments
Add Comment

BMC News : तातडीच्या कामकाजाच्या प्रस्तावावरून सलग दुसऱ्यांदा महापौरांकडून चूक

सत्ताधारी पक्ष दुसऱ्यांदा आला अडचणीत घाटकोपरमधील रस्ता रेषेसंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्याची महापौरांना

Chembur Tree Collapse : चेंबूरच्या झाड दुर्घटनेच्या अहवाल सत्ताधाऱ्यांनाच अमान्य

अहवालाची फेर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे महापौरांचे निर्देश सभागृहनेत्यांनी अहवालाची प्रतच सभागृहात फाडत

FDA : मुंबईच्या प्रसिद्ध पारशी डेअरी फार्मवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; परवाना निलंबित

मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' (Safe Food, Safe Maharashtra) या विशेष मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA)

NEET-UG 2026 Result : नीट-यूजी परीक्षेचा निकाल जाहीर; परीक्षेत मुलींनी मारली बाजी

मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency - NTA) ने नीट-यूजी (NEET-UG) २०२६ परीक्षेचा निकाल (Result) जाहीर केला आहे. उत्तरतालिका (Answer

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत