BMC News : तातडीच्या कामकाजाच्या प्रस्तावावरून सलग दुसऱ्यांदा महापौरांकडून चूक

सत्ताधारी पक्ष दुसऱ्यांदा आला अडचणीत


घाटकोपरमधील रस्ता रेषेसंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्याची महापौरांना घाई, विरोधकांकडून सभात्याग


मुंबई : मुंबईच्या महापौर (Mumbai Mayor) रितू तावडे (Ritu Tawde) यांनी पुन्हा एकदा पक्षाला अडचणीत आणले. सभागृहामध्ये एकदा तातडीच्या कामकाजाच्या प्रस्तावावरून सत्ताधारी पक्ष नाकीतोंडी आपटल्यानंतर पुन्हा अशाप्रकारचे प्रस्ताव न आणण्याचा निर्धार केल्यनंतरही महापौरांनी पुन्हा तीच चूक केली. घाटकोपर येथील घाटकोपर किरोळ मधील खोत लेनमधील एक रस्ता रेषा संदर्भातील तातडीचा प्रस्ताव सभागृहात मंजुरीला घेण्यात आला. परंतु विरोधकांनी यावर पोलची मागणी केल्यानंतर महापौरच अडचणी आले आणि त्यांनी पोल विचारात न घेता या प्रस्तावासह पुढील सर्व तातडीच्या प्रस्तावांवर विशेष सभेत निर्णय घेतला जाईल असे जाहीर केले. यामुळे विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केला आणि सभात्याग करत याचा निषेध व्यक्त केला.


मुंबई महापालिका (BMC) सभागृहात तातडीचे कामकाज क्रमांक २१ ला प्रशासनाच्यावतीने अग्रक्रम देण्याची प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्तांनी केल्यानंतर महापौरांनी सभागृह नेत्यांना हा प्रस्ताव मांडण्याची अनुमती दिली. त्यानंतर सभागृहनेते गणेश खणकर यांनी हा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात करण्यापूर्वीच विरोधी पक्षाने पोलची मागणी केली.त्यामुळे सभागृहनेत्यांनी घाटकोपर मधील किरोळ यांनी बाधित ऑफ खोत लेन रस्ता जो एका टोकास बंद रस्त्यास ९ मीटर रुंदीची नियमित रस्तारेषा संदर्भातील प्रस्तावाचा विषय वाचून दाखवला. पण विरोधकांनी पोलची मागणी केल्यानंतर महापौरांनी काही क्षण महापालिका सचिव यांच्यासोबत चर्चा करून काही वेळाने पोलची मागणी न स्वीकारता थेट विशेष सभेत हे प्रस्ताव विचारात घेतले जातील असे जाहीर करून टाकले. त्यामुळे विरोधकांनी महापालिका सचिव आणि महापौरांच्या विरेाधात घोषणा देत सभागृहात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महापौरांनी सभागृहनेत्यांचे नाव हरकतीच्या मुद्दा मांडण्यासाठी पुकारल्याने महापौरांकडून झालेले नियमबाह्य कामकाजाचा निषेध म्हणून विरोध करत सभात्याग केला.



तातडीच्या कामकाजाचा प्रस्ताव पुकारल्यानंतर जर कुणी पोलची मागणी केली, तो स्वीकारुन मतदान घेणे बंधनकारक आहे आणि यामध्ये जर तीन तृतीयांश सदस्यांचे मतदान विरोधात गेले तो प्रस्ताव तातडीचे कामकाज म्हणून स्वीकारला जात नाही,तो राखून ठेवावा लागतो. त्यानुसार हा प्रस्ताव अग्रक्रम फेटाळला जावून तो प्रस्ताव राखून ठेवण्याची नामुष्की आली. परंतु पोलचा स्वीकार न केल्यामुळे विरोधक आक्रमक झाले.


विशेष म्हणजे हा प्रस्ताव घाटकोपरमधील रस्ता रेषे संदर्भातील होता आणि महापौर रितू तावडे या घाटकोपरमधील असल्याने तसेच यापूर्वी तातडीचा प्रस्ताव मंजूर करताना सत्ताधारी पक्षाची पोलमुळे अग्रक्रम फेटाळत नामुष्की सहन करावी लागल्यानंतरही महापौरांनी पुन्हा तीच चूक केल्यामुळे महापालिकेतील कामकाज पध्दतीवर शंका उपस्थित होत आहे. तातडीचे कामकाजाचे प्रस्ताव यापुढे स्वीकारु नये अशाप्रकारची भूमिका असतानाही महापौरांनी हे प्रस्ताव कसे स्वीकारले आणि स्वीकारताना सभागृहनेत्यांना याची कल्पना का दिली नाही आणि सभागृहनेत्यांना याची कल्पना दिल्यानंतरही ते राजी कसे झाले असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. त्यामुळे महापौरांकडून सलग दुसऱ्यांना अशाप्रकारची चूक झाल्यामुळे पक्षाला आता महापालिकेच्या कामकाजात झाकून पाहण्याची वेळ आली आहे.

Comments
Add Comment

BMC News : वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ मधील नागरिकांना ३ ते ४ दिवस कचऱ्याची राहणार समस्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat : 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक!

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लोकशाहीत आंदोलनसुद्धा संवादाचेच एक माध्यम मुंबई : "भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही

Air India New CEO : टाटांचा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानकडे जाणारे टेवोल्डे गेब्रेमरियम आता एअर इंडियाचे नवे बॉस

मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अखेर नवे नेतृत्व मिळाले आहे. इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपचे माजी

Mohan Bhagwat : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा 'जेन-झी'शी संवाद

Mumbai : शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक गोष्टी करता येऊ शकतात. मात्र हे सर्व करताना समाजात फूट पाडण्यासाठी नव्हे, तर

Mahalaxmi Dhobi Ghat PNG Gas Connection : महालक्ष्मी धोबीघाट धूरमुक्त होणार! लाकूड-कोळशाला रामराम, १५० पीएनजी गॅस जोडण्यांमुळे प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

मुंबई : मुंबईची ऐतिहासिक आणि जागतिक ओळख असलेल्या महालक्ष्मी धोबीघाटाने (Mahalaxmi Dhobighath) आता वायू प्रदूषणावर मात

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा