BMC News : तातडीच्या कामकाजाच्या प्रस्तावावरून सलग दुसऱ्यांदा महापौरांकडून चूक

सत्ताधारी पक्ष दुसऱ्यांदा आला अडचणीत


घाटकोपरमधील रस्ता रेषेसंदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्याची महापौरांना घाई, विरोधकांकडून सभात्याग


मुंबई : मुंबईच्या महापौर (Mumbai Mayor) रितू तावडे (Ritu Tawde) यांनी पुन्हा एकदा पक्षाला अडचणीत आणले. सभागृहामध्ये एकदा तातडीच्या कामकाजाच्या प्रस्तावावरून सत्ताधारी पक्ष नाकीतोंडी आपटल्यानंतर पुन्हा अशाप्रकारचे प्रस्ताव न आणण्याचा निर्धार केल्यनंतरही महापौरांनी पुन्हा तीच चूक केली. घाटकोपर येथील घाटकोपर किरोळ मधील खोत लेनमधील एक रस्ता रेषा संदर्भातील तातडीचा प्रस्ताव सभागृहात मंजुरीला घेण्यात आला. परंतु विरोधकांनी यावर पोलची मागणी केल्यानंतर महापौरच अडचणी आले आणि त्यांनी पोल विचारात न घेता या प्रस्तावासह पुढील सर्व तातडीच्या प्रस्तावांवर विशेष सभेत निर्णय घेतला जाईल असे जाहीर केले. यामुळे विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केला आणि सभात्याग करत याचा निषेध व्यक्त केला.


मुंबई महापालिका (BMC) सभागृहात तातडीचे कामकाज क्रमांक २१ ला प्रशासनाच्यावतीने अग्रक्रम देण्याची प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्तांनी केल्यानंतर महापौरांनी सभागृह नेत्यांना हा प्रस्ताव मांडण्याची अनुमती दिली. त्यानंतर सभागृहनेते गणेश खणकर यांनी हा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात करण्यापूर्वीच विरोधी पक्षाने पोलची मागणी केली.त्यामुळे सभागृहनेत्यांनी घाटकोपर मधील किरोळ यांनी बाधित ऑफ खोत लेन रस्ता जो एका टोकास बंद रस्त्यास ९ मीटर रुंदीची नियमित रस्तारेषा संदर्भातील प्रस्तावाचा विषय वाचून दाखवला. पण विरोधकांनी पोलची मागणी केल्यानंतर महापौरांनी काही क्षण महापालिका सचिव यांच्यासोबत चर्चा करून काही वेळाने पोलची मागणी न स्वीकारता थेट विशेष सभेत हे प्रस्ताव विचारात घेतले जातील असे जाहीर करून टाकले. त्यामुळे विरोधकांनी महापालिका सचिव आणि महापौरांच्या विरेाधात घोषणा देत सभागृहात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महापौरांनी सभागृहनेत्यांचे नाव हरकतीच्या मुद्दा मांडण्यासाठी पुकारल्याने महापौरांकडून झालेले नियमबाह्य कामकाजाचा निषेध म्हणून विरोध करत सभात्याग केला.



तातडीच्या कामकाजाचा प्रस्ताव पुकारल्यानंतर जर कुणी पोलची मागणी केली, तो स्वीकारुन मतदान घेणे बंधनकारक आहे आणि यामध्ये जर तीन तृतीयांश सदस्यांचे मतदान विरोधात गेले तो प्रस्ताव तातडीचे कामकाज म्हणून स्वीकारला जात नाही,तो राखून ठेवावा लागतो. त्यानुसार हा प्रस्ताव अग्रक्रम फेटाळला जावून तो प्रस्ताव राखून ठेवण्याची नामुष्की आली. परंतु पोलचा स्वीकार न केल्यामुळे विरोधक आक्रमक झाले.


विशेष म्हणजे हा प्रस्ताव घाटकोपरमधील रस्ता रेषे संदर्भातील होता आणि महापौर रितू तावडे या घाटकोपरमधील असल्याने तसेच यापूर्वी तातडीचा प्रस्ताव मंजूर करताना सत्ताधारी पक्षाची पोलमुळे अग्रक्रम फेटाळत नामुष्की सहन करावी लागल्यानंतरही महापौरांनी पुन्हा तीच चूक केल्यामुळे महापालिकेतील कामकाज पध्दतीवर शंका उपस्थित होत आहे. तातडीचे कामकाजाचे प्रस्ताव यापुढे स्वीकारु नये अशाप्रकारची भूमिका असतानाही महापौरांनी हे प्रस्ताव कसे स्वीकारले आणि स्वीकारताना सभागृहनेत्यांना याची कल्पना का दिली नाही आणि सभागृहनेत्यांना याची कल्पना दिल्यानंतरही ते राजी कसे झाले असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. त्यामुळे महापौरांकडून सलग दुसऱ्यांना अशाप्रकारची चूक झाल्यामुळे पक्षाला आता महापालिकेच्या कामकाजात झाकून पाहण्याची वेळ आली आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि