Astrology: जूनच्या अखेरीस होणार मंगळ-शुक्रची युती, या राशींना मिळणार शुभ लाभ

  106

मुंबई: जूनच्या अखेरीस शुक्र मंगळच्या युतीमुळे धनशक्ती राजयोग बनत आहे. ज्योतिषशास्त्रात शुक्र मंगळ युती असणे हे अतिशय शुभदायी मानले जाते. शुक्र ग्रहाला सुख-समृद्धी, प्रेम आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते. तर मंगळ ग्रहाला सर्व ग्रहांचा सेनापती म्हणून पाहिले जाते. शुक्र मंगळाच्या युतीने धनशक्ती राजयोग निर्माण होत आहे. कारण दोन्ही ग्रह एकमेकांच्या धन आणि लाभ भावात विराजमान आहेत.


जाणून घेऊया शुक्र आणि मंगळच्या युतीने बनत असलेला धनशक्ती राजयोग कोणत्या राशीसाठी लाभदायक असणार आहे.



मिथुन


धनशक्ती राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी अतिशय फायदेशीर असणार आहे. नव्या लोकांशी भेटीगाठी फलदायी ठरतील. बिझनेसमध्ये मोठा फायदा होईल. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्या दूर होतील.


मिथुन राशीच्या लोकांनी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे. शत्रूंपासून सुटका मिळेल. सोबतच समाजात मान-सन्मान प्राप्त होईल.



कर्क


धनशक्ती राजयोग कर्क राशीच्या लोकांसाठीही धनलाभाची शक्यता दर्शवतो. आर्थिक स्थिती चांगली होईल. पैसे कमावण्याचे नवे मार्ग उघडतील. अनेक प्रॉपर्टीही खरेदी करू शकता.



वृश्चिक


धनशक्ती राजयोग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अतिशय चांगला मानला जात आहे. कामामुळे परदेश प्रवास होऊ शकतो. तुम्ही तुमच्या शत्रूंवर भारी पडाल. सोबतच कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांची साथ मिळेल.

Comments
Add Comment

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

गरूड पुराणात सांगितलेली ही ४ कामे माणसाचे झोपलेले नशीब जागे करू शकतात, जाणून घ्या...

मुंबई: हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात केवळ मृत्यू आणि परलोकाचेच नव्हे, तर यशस्वी

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली