राजुरीत एसटी बसेसकडून नियमांचे उल्लंघन

बसस्थानकावर एसटी थांबत नसल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय


पुणे : राजुरी (ता.जुन्नर) येथील बसस्थानकावर लांब पल्ल्याच्या कुठल्याही एसटी बसेस थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी तसेच प्रवाशांनी केली नाराजी व्यक्त केली आहे.
राजुरी येथील गावची लोकसंख्या पंधरा हजारांहुन अधिक असून या ठिकाणी दोन महाविद्यालये तसेच पराशर कृषी पर्यटन केंद्र असल्याने येथील बस स्थानकावर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते; परंतु बसस्थानकावर लांब पल्ल्याच्या कुठल्याही एसटी बसेस थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी तसेच प्रवाशांनी केली नाराजी व्यक्त केली आहे. राजुरी येथील ग्रामपंचायत व ज्येष्ठ नागरीक संघटनेच्या वतीने माजी सभापती दिपक औटी व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहल शेळके, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके यांनी राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना तसेच कुर्ला आगार, कल्याण आगार, नारायणगाव आगार व शिवाजीनगर आगार प्रमुखांना पत्र देऊन राजुरी या ठिकाणी बस थांबत नसल्याचे पत्र देण्यात आले होते.



त्यानंतर वरील तिन्ही आगार प्रमुखांनी येथील बस स्थानकावर पारनेर, जामखेड, श्रीगोंदा, पार्थडी, कल्याण, ठाणे, मुंबई, नारायणगाव, राजगुरूनगर या डेपोच्या एसटी बसेस या ठिकाणी थांबतील अशा सुचना एस.टी.चालक, वाहक यांना दिल्या होत्या. तसेच या संर्दभाचे पत्र देखील येथील ग्रामपंचायत कार्यालयास देण्यात आले होते; परंतु येथील बसस्थानकांवर थांबा परवाना असताना देखील व आगार प्रमुखांनी याबाबतच्या सुचना दिलेल्या असताना देखील एसटी बसेस थांबत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.


दरम्यान येथील ग्रामस्थांनी कल्याण-अहिल्यानगर या मार्गावर राजुरी या ठिकाणी १३ सप्टेंबर २०२४ रोजी ग्रामस्थ व प्रवाशांनी रास्ता-रोको आंदोलन केले होते. त्यावेळी संबंधित आगार प्रमुखांनी यापुढे सर्व बस राजुरी या ठिकाणी थांबतील असे सांगीतले होते. त्यानंतर पुढील काही दिवस सर्व एसटी बसेस थांबत होत्या. मात्र आता पुन्हा तिच परिस्थिती निर्माण झाली आहे.



...अन्यथा लवकरच आंदोलन करू


राजुरी येथील ग्रामस्थ कल्याण या ठिकाणाहून एसटी बसमध्ये बसल्यानंतर त्याला राजुरी या ठिकाणी उतरायचे असेल, तर पुढील बेल्हे गावाचे तिकीट फाडावे लागते व एसटी बस ही राजुरी येथील एसटी स्टँडवर न थांबता ती पुढे काही अंतरावर जाऊन थांबत असल्याचे प्रकार वारंवार होत आहेत. असे प्रकार थांबवावेत तसेच या ठिकाणाहुन जाणाऱ्या सर्व एसटी बसेस थांबविण्यात याव्या, अन्यथा लवकरच कल्याण-अहिल्यानगर या राष्टीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले जाईल, असे सदस्या माजी जिल्हा परिषद, स्नेहल शेळके यांनी म्हटले आहे.



प्रवाशांचे अतोनात हाल


राजुरी या ठिकाणी बस थांबत नसल्याने येथील ग्रामस्थांना, प्रवाशांना आळेफाटापर्यंत तसेच बेल्हा या ठिकाणांपर्यंत खासगी वाहनाने जादा पैसे देऊन जावे लागत होते. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.

Comments
Add Comment

Sharad Pawar : अजित पवारांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंब पहिल्यांदाच एकत्र

पुणे : अजित पवारांच्या मृत्यूवेळी पवार कुटुंब एकत्र आपल्याला पाहायला मिळाले होते, त्यानंतर अनेक राजकीय घटना

लग्नाला जाताना कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश

Amravati accident : अमरावती जिल्हातील वरूड-मोर्शी महामार्गावर रस्ते अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. खडका फाट्याजवळ

नाशिकमध्ये ACB ची मोठी कारवाई, जिल्हा परिषदेचे तीन अधिकारी लाच स्वीकारतांना जाळ्यात

नाशिक Nashik : नाशिकमध्ये ACB पथकाने मोठी कारवाई करत जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ

क्रिकेटची मॅच संपली अन् दोन्ही गट भिडले ; भर मैदानात सांडला रक्ताचा सडा, नेमकं काय घडलं ?

जळगाव : क्रिकेटचं मैदान म्हणजे दोन गट आमने सामने असणारच. इंटरनॅशनल मॅच असो वा गल्लीतल्या पोरांची मॅच, भांडणं

खळबळजनक ! नाशिक, संगमनेर पाठोपाठ आता श्रीरामपूरमध्ये भोंदूबाबाचा प्रताप समोर , गणेश शिंदेला अटक

नाशिकमधील अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर राज्यातील अनेक भोंदूबाबांची धक्कादायक प्रकरण समोर आली आहे. आर्थिक

Kolhapur Women Abuse Case : धक्कादायक! परतवाडा प्रकरणाची कोल्हापुरात पुनरावृत्ती; तरुणीवर अत्याचार करून ...

मुंबई : नाशिक आणि अमरावतीतील घटनांनंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत असतानाच आता कोल्हापूर