Jalgaon Crime: जळगाव हादरले! 13 वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या, परिसरात खळबळ

शेजारच्या गावात सापडला मृतदेह, नरबळीच्या संशयाने खळबळ


जळगाव: जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खर्ची गावात एका १३ वर्षीय मुलाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत मुलाचा मृतदेह शेजारील गावच्या  शेतात फेकून देण्यात आला होता, ही घटना नरबळीसाठी तर घडवून आणली गेली नाही ना, असा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. तसेच या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अखंड जळगाव यामुळे हादरलं आहे. पोलिसांनी सदर घटनेची तात्काळ नोंद करून पुढील तपासणीला सुरूवात केली आहे.


तेजस महाजन (वय १३) असं मृत मुलाचं नाव असून तो रिंगणगाव येथे राहणारा, तो काल म्हणजेच दिनांक १६ जूनपासून बेपत्ता झाला होता. तेजस अचानक दिसेनासा झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी गावात व परिसरात शोधाशोध सुरू केली होती, मात्र कुठेच त्याचा पत्ता लागला नाही. रात्री उशिरापर्यंत गावकऱ्यांनी शोध घेतला, मात्र त्याचा काहीही मागमूस लागला नाही. अखेर १७ जून रोजी एरंडोल पोलीस ठाण्यात त्याच्या बेपत्ताबाबतची तक्रार दाखल करण्यात आली.


खर्ची गावाजवळील एका शेतात तेजसचा मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात तेजसच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार झाल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमला देखील पाचारण करण्यात आले. सदर घटनेचा पोलीस विविध अंगाने तपास करत असून अद्याप हत्येमागील नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.


Comments
Add Comment

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Devendra Fadnavis : इंधन, परकीय चलन बचत आणि स्वदेशीला प्राधान्य देऊया!

मुंबई : "आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटकाळात इंधन बचत, परकीय चलनाचे जतन आणि स्वदेशी वस्तूंना

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Underwater Tourism : सिंधुदुर्गात भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाळ आणि पाणबुडी पर्यटन प्रकल्प

सिंधुदुर्गनगरी : निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सागरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग