राजुरीत एसटी बसेसकडून नियमांचे उल्लंघन

बसस्थानकावर एसटी थांबत नसल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय


पुणे : राजुरी (ता.जुन्नर) येथील बसस्थानकावर लांब पल्ल्याच्या कुठल्याही एसटी बसेस थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी तसेच प्रवाशांनी केली नाराजी व्यक्त केली आहे.
राजुरी येथील गावची लोकसंख्या पंधरा हजारांहुन अधिक असून या ठिकाणी दोन महाविद्यालये तसेच पराशर कृषी पर्यटन केंद्र असल्याने येथील बस स्थानकावर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते; परंतु बसस्थानकावर लांब पल्ल्याच्या कुठल्याही एसटी बसेस थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी तसेच प्रवाशांनी केली नाराजी व्यक्त केली आहे. राजुरी येथील ग्रामपंचायत व ज्येष्ठ नागरीक संघटनेच्या वतीने माजी सभापती दिपक औटी व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहल शेळके, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके यांनी राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना तसेच कुर्ला आगार, कल्याण आगार, नारायणगाव आगार व शिवाजीनगर आगार प्रमुखांना पत्र देऊन राजुरी या ठिकाणी बस थांबत नसल्याचे पत्र देण्यात आले होते.



त्यानंतर वरील तिन्ही आगार प्रमुखांनी येथील बस स्थानकावर पारनेर, जामखेड, श्रीगोंदा, पार्थडी, कल्याण, ठाणे, मुंबई, नारायणगाव, राजगुरूनगर या डेपोच्या एसटी बसेस या ठिकाणी थांबतील अशा सुचना एस.टी.चालक, वाहक यांना दिल्या होत्या. तसेच या संर्दभाचे पत्र देखील येथील ग्रामपंचायत कार्यालयास देण्यात आले होते; परंतु येथील बसस्थानकांवर थांबा परवाना असताना देखील व आगार प्रमुखांनी याबाबतच्या सुचना दिलेल्या असताना देखील एसटी बसेस थांबत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.


दरम्यान येथील ग्रामस्थांनी कल्याण-अहिल्यानगर या मार्गावर राजुरी या ठिकाणी १३ सप्टेंबर २०२४ रोजी ग्रामस्थ व प्रवाशांनी रास्ता-रोको आंदोलन केले होते. त्यावेळी संबंधित आगार प्रमुखांनी यापुढे सर्व बस राजुरी या ठिकाणी थांबतील असे सांगीतले होते. त्यानंतर पुढील काही दिवस सर्व एसटी बसेस थांबत होत्या. मात्र आता पुन्हा तिच परिस्थिती निर्माण झाली आहे.



...अन्यथा लवकरच आंदोलन करू


राजुरी येथील ग्रामस्थ कल्याण या ठिकाणाहून एसटी बसमध्ये बसल्यानंतर त्याला राजुरी या ठिकाणी उतरायचे असेल, तर पुढील बेल्हे गावाचे तिकीट फाडावे लागते व एसटी बस ही राजुरी येथील एसटी स्टँडवर न थांबता ती पुढे काही अंतरावर जाऊन थांबत असल्याचे प्रकार वारंवार होत आहेत. असे प्रकार थांबवावेत तसेच या ठिकाणाहुन जाणाऱ्या सर्व एसटी बसेस थांबविण्यात याव्या, अन्यथा लवकरच कल्याण-अहिल्यानगर या राष्टीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले जाईल, असे सदस्या माजी जिल्हा परिषद, स्नेहल शेळके यांनी म्हटले आहे.



प्रवाशांचे अतोनात हाल


राजुरी या ठिकाणी बस थांबत नसल्याने येथील ग्रामस्थांना, प्रवाशांना आळेफाटापर्यंत तसेच बेल्हा या ठिकाणांपर्यंत खासगी वाहनाने जादा पैसे देऊन जावे लागत होते. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.

Comments
Add Comment

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय